शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

विजय मिळत नसेल, तर शतक अर्थहीन

By admin | Updated: January 14, 2016 03:13 IST

शतक ठोकूनही संघाला विजय मिळत नसेल, तर सर्वोत्कृष्ट खेळीलाही अर्थ नसतो, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले आहे. मागच्या तीन शतकांनंतरही भारतीय संघाला तो विजय मिळवून देऊ

पर्थ : शतक ठोकूनही संघाला विजय मिळत नसेल, तर सर्वोत्कृष्ट खेळीलाही अर्थ नसतो, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले आहे. मागच्या तीन शतकांनंतरही भारतीय संघाला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. काल आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डेत रोहितने नाबाद १७१ धावा ठोकल्यानंतरही यजमानांनी सामना पाच गड्यांंनी सहजरीत्या जिंकला होता.रोहित म्हणाला, ‘‘मालिकेची सुरुवात सकारात्मक होणे महत्त्वाचे असते. माझी खेळीदेखील सकारात्मक आणि उत्कृष्ट होती. इतक्या धावा काढूनही विजय मिळत नसेल, तर निराशा येणारच. किती धावा काढल्या यापेक्षा सामना जिंकला का, याला मोठा अर्थ असतो. चांगली खेळी करणे हे वैयक्तिक हितासाठी चांगले आहे; पण संघ जिंकला नाही, याची सल आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात माझी धावा काढण्याची पद्धत चांगली असल्याचे अनेकांचे मत आहे. कामगिरीवर मी सुखावलो, पण संघ पराभूत झाल्याने दु:ख झाले.खेळपट्टीवर स्थिरावणे आणि अधिकाधिक धावा काढणे फलंदाजांसाठी महत्त्वपूर्ण ठरते, असे संघ व्यवस्थापनाच्या बैठकीत आम्ही नेहमी ऐकतो. स्थिरावलेला फलंदाज अखेरपर्यंत टिकला, तर विजय खेचून आणता येतो. मागच्या काही सामन्यांत मी शतक तर ठोकत आहे. पण संघाकडेही पाहावे लागेल. संघ विजयी होत नाही, हीदेखील चिंता आहे. (वृत्तसंस्था)