शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

आयसीसी

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

२०१६ ची टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात

२०१६ ची टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात
दुबई : २०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. आज आयसीसीने बोर्डाच्या बैठकीनंतर याची अधिकृत घोषणा केली.
आयसीसीच्या मुख्यालयात एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वर्षातील पहिल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आयसीसीने २०१९ पर्यंतच्या कार्यक्रमाला मंजुरी प्रदान केली. २०१६ च्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद २०१३ मध्येच निश्चित झाले होते, पण कालावधीची घोषणा या बैठकीमध्ये करण्यात आली. आयसीसी बोर्डाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा कालवधी निश्चित केला. इंग्लंडमध्ये १ जून ते १९ जून २०१७ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. २०१९ च्या विश्वकप स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडला सोपविण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये ३० मे ते १५ जून २०१९ या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. महिला विश्वकप स्पर्धा २०१७ मध्ये ४ ते २७ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंडमध्ये होणार असून महिला टी-२० विश्वकप स्पर्धा २०१८ मध्ये विंडीजमध्ये २ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. (वृत्तसंस्था)