शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ICC Champions Trophy : महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ भारतीय गोलंदाजीने प्रभावित

By admin | Updated: June 1, 2017 14:48 IST

अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन अव्वल फलंदाजांच्या नाकीनऊ आणणारा ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ भारतीय गोलंदाजीने प्रभावित झाला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 1 - अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन अव्वल फलंदाजांच्या नाकीनऊ आणणारा ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ भारतीय गोलंदाजीने प्रभावित झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणा-या भारतीय गोलंदाजांच्या चमूचे मॅग्राथने कौतुक केले आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीमुळे भारतीय टीम अन्य संघांपेक्षा वरचढ ठरेल असे मत मॅग्राथने व्यक्त केले. 47 वर्षीय मॅग्राथ सध्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे. 
 
दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारानेही भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक असल्याचे म्हटले होते. मागच्या दोन-तीन वर्षात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. भारताची गोलंदाजीची बाजू सशक्त आहे. वेगवान आणि फिरकी मा-यामुळे भारतीय संघ जास्त वरचढ ठरेल असे मॅग्राथने म्हटले आहे. 
 
आणखी वाचा 
 
रविवारी पारंपारिक पाकिस्तान विरुद्ध होणा-या पहिल्या सामन्यात भारताला विजयाची संधी जास्त असल्याचे त्याने म्हटले आहे. भारत-पाकिस्तान मॅच नेहमीच मोठी असते. पाकिस्तानकडेही चांगले दर्जेदार गोलंदाज आणि अनुभवी फलंदाज आहेत. तुम्ही सांगू शकत नाही पण पाकिस्तानही आश्चर्यकारक निकालाची नोंद करु शकतो असे मॅग्राथने म्हटले आहे. 
 
भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहोचेल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या तीन टीम्स सेमीफायनल खेळतील असा अंदाज मॅग्राथने वर्तवला असून, चौथा संघ न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिका असेल. मॅग्राथला जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या दोन गोलंदाजांनी जास्त प्रभावित केले आहे. बुमराह एकदिवसीय क्रिकेटसाठी चांगला गोलंदाज असून उमेशही चांगली गोलंदाजी करतोय.  
 
खासकरुन हाणामारीच्या षटकांमध्ये दोघांची गोलंदाजी वाखाणण्याजोगी असते असे मॅग्राथने म्हटले आहे. गतविजेता भारतच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारताकडे जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले होते.  रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा हे भारताचे फिरकी गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपयुक्त कामगिरी करत असून, कर्णधार विराट कोहली भले आयपीएलमध्ये अपयशी ठरला असेल पण इथे तो दमदार कामगिरी करेल असा संगकाराला विश्वास वाटतो.