शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

या प्रकरणात मला अडकविण्यात आले

By admin | Updated: February 22, 2017 01:17 IST

भारताचा अव्वल दर्जाचा रायफल नेमबाज संजीव राजपूतने आपल्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाचे खंडन

नवी दिल्ली : भारताचा अव्वल दर्जाचा रायफल नेमबाज संजीव राजपूतने आपल्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाचे खंडन करताना, या प्रकरणामध्ये मला अडकविण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी राजपूतने मौन धरले होते, मात्र अखेर त्याने याबाबत आपली बाजू स्पष्ट केली.विश्वचषक, आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेता असलेल्या राजपूतवर राष्ट्रीय स्तरावरील सहकारी महिला नेमबाजने बलात्काराचा आरोप केला होता. त्या महिला खेळाडूने भारतीय दंड संहिता अंतर्गत ३७६ आणि ३२८ या कलमांतर्गत प्राथमिक तक्रार नोंदवली होती.दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये सराव सूत्रानंतर सांगितले, की ‘तुम्हा सर्वांनाच माहितीय, की माझ्यासाठी मागील काही महिने खूप त्रासदायक होते. माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता.’ दरम्यान, मोसमातील पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज असलेला राजपूत या कठीण काळातून स्वत:ला सावरत आहे. जेव्हा त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाची बातमी पसरली तेव्हा राजपूतने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. याबाबत विचारले असता राजपूत म्हणाला, ‘मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. कोणतीही व्यक्ती याप्रकारच्या प्रसंगातून जाताना नक्कीच चिंतीत होईल. मात्र, मी या प्रसंगाला एक आव्हान म्हणून सामोरे जात असून भविष्यात चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा घेत पुढे जात आहे.’त्याचप्रमाणे, ‘कोणतीही व्यक्ती कितीही मजबूत असो, अशा प्रकारच्या घटनाने ती व्यक्ती निश्चित हादरते. मी देखील हादरलो होतो. परंतु, मला माहित आहे की मी निर्दोष आहे. न्यायव्यस्थेवर माझा विश्वास असून सत्य सर्वांसमोर येईल,’ असेही राजपूतने सांगितले. (वृत्तसंस्था)