शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

हुश्श... पोहोचलो एकदाचे बाद फेरीत

By admin | Updated: February 10, 2015 01:56 IST

कर्नाटक विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या २१ धावांची आघाडी निर्णायक ठरवताना मुंबईने अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात

मुंबई : कर्नाटक विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या २१ धावांची आघाडी निर्णायक ठरवताना मुंबईने अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात ३ गुणांची कमाई करून रणजी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला तामिळनाडूने बडोदाचा पराभव केला, तर मध्य प्रदेशने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालवर वर्चस्व गाजवले. या दोन्ही सामन्यांचा फायदा झाल्याने बलाढ्य मुंबईने धडपडत का होईना, आपले आव्हान कायम राखले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या मुंबईने कर्नाटकसमोर मोठे लक्ष्य ठेवण्याच्या निर्धाराने आक्रमक फलंदाजीचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार विनय कुमारने खेळपट्टीचा रंग ओळखून दोन्ही बाजूने श्रेयश गोपाळ व उदीत पटेल या फिरकीपटूंचा मारा सुरू केला. विनय कुमारची ही चाल यशस्वी ठरली. ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत राहिल्याने मुंबईने अखेर आपला दुसरा डाव ८ फलंदाजांच्या मोबदल्यात २२३ धावांवर घोषित केला आणि पाहुण्यांसमोर विजयासाठी २४४ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ९८ चेंडू खेळताना ७ चौकार व २ षटकार खेचून सर्वाधिक ७७ धावांची नाबाद खेळी केली. निखिल पाटीलने ४८ चेंडूंत ४८ धावा फटकावल्या. यजमानांच्या आक्रमकतेला मुरड घालण्याचे काम केले ते उदीत पटेलने. त्याने ५५ धावांत ४ खंदे फलंदाज माघारी धाडले. यानंतर आधीच बाद फेरीतील प्रवेश निश्चित झालेला असल्याने कोणताही धोक न पत्करता कर्नाटकने सामन्याची औपचारिकता पूर्ण केली. कर्नाटकच्या फलंदाजांनी संयमी खेळ करत दिवसअखेर १ बाद ११० अशी मजल मारली. (क्रीडा प्रतिनिधी)