शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

इतिहास घडविला..!

By admin | Updated: May 23, 2014 02:00 IST

सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला बॅडमिंटन संघाने इतिहास घडविला.

नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला बॅडमिंटन संघाने इतिहास घडविला. गुरुवारी त्यांनी इंडोनेशियाला ३-0 ने हरवून उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. येथील सिरी फोर्ट स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये आठवी मानांकित सायना नेहवालने पहिल्या एकेरी सामन्यात २३ वी मानांकित लिंडावेनी फानेत्रीला २१-१७, २१-१० अशा सरळ सेटमध्ये हरवून भारताला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. परंतु भारताच्या पीव्ही सिंधूला बेलाट्रिक्स मानुपट्टीविरुध्द २१-१६, १0-२१, २५-२३ असा विजय मिळविण्यासाठी सुमारे दीड तास घाम गाळावा लागला. सिंधूने पहिला गेम जिंकला मात्र दुसर्‍या गेममध्ये ती सहज हरली. शेवटच्या आणि तिसर्‍या निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये एका एका पॉर्इंटसाठी जबरदस्त संघर्ष पहायला मिळाला. परंतु स्थानिक प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे विजय मिळविण्यास सिंधूला यश आले. भारतीय संघ आपल्या गटात अपराजित राहीला आहे. त्यांनी कॅनडा, हाँगकॉग आणि थायलंडला पराभूत केले आहे. इंडोनेशियाचा संघ त्यांच्या गटात दुसर्‍या क्रमांकावर राहीला. भारताचा संघ स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. गेल्या स्पर्धेत भारताला या स्पर्धेची पात्रताही मिळविता आली नव्हती. २0१0 साली उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाकडून 0-३ ने पराभूत व्हावे लागले होते. (वृत्तसंस्था)