शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

विश्वचषकातील भारत - पाक सामन्याचा इतिहास

By admin | Updated: March 19, 2016 09:34 IST

विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे. त्या आठवणींवर एक नजर..
 
१९९२ सिडनी, ऑस्ट्रेलिया 
१९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा हिरो ठरला सचिन तेंडुलकर. सचिननं या मॅचमध्ये ५४ रन केल्या, तसंच १ विकेटही काढली. भारतानं ही मॅच ४३ रननं जिंकली. 
 
१९९६ बंगळुरू, भारत
आमिर सोहेल आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींमुळे हा सामना क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. भारतानं ही मॅच ३७ धावांनी जिंकली. 
 
१९९९ मॅन्चेस्टर, इंग्लंड
२२७ रन्सचे माफक आव्हान पार करणं पाकिस्तानला अवघड झालं ते व्यंकटेश प्रसादमुळे. या मॅचमध्ये प्रसादनं पाकिस्तानच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, आणि भारतानं ही मॅच ४७ धावांनी जिंकली. 
 
२००३ सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका
भारतानं ही मॅच जिंकली ती सचिन तेंडुलकरच्या अविस्मरणीय खेळीमुळे. या मॅचमध्ये सचिनचे शतक फक्त २ धावांनी हुकले, तरी सचिनची ही खेळी क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. या मॅचमध्ये भारताचा ६ गडी आणि २६ चेंडू राखून विजय झाला. 
 
२००७ डर्बन, दक्षिण आफ्रिका
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले, आणि हा सामना टाय झाला. अखेर बॉल आऊटच्या माध्यमातून भारताचा या मॅचमध्ये विजय झाला.
 
२००७ जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका 
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला तो फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून. जोगिंदर शर्मानं मिसबाहची विकेट घेतली आणि भारतानं टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
 
२०११ मोहाली, भारत
जेव्हा तुम्ही सचिनचे ४ कॅच सोडाल, तेव्हा मॅच जिंकणं अशक्यच होऊन बसेल. पाकिस्ताननं हे केलं २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये आणि त्यामुळे पाकिस्तानचा या मॅचमध्ये २९ रन्सने पराभव झाला. 
 
२०१२ कोलंबो, श्रीलंका
विराट कोहलीच्या ७८ रनच्या खेळीमुळे टी २० वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. ही मॅच भारतानं ८ विकेट आणि ३ ओव्हर राखून अगदी सहज जिंकली.
 
२०१४ मिरपूर,  बांगलादेश
२०१४ साली बांगलादेशात झालेल्या विश्वचषकात टीम इंडियानं उपविजेतेपद मिळवलं. त्या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानवर मात केली होती. मिरपूरच्या मैदानात टीम इंडियानं पाकिस्तानला सात विकेट्सनी सहज लोळवलं आणि पाकिस्तानवर ट्वेन्टी२० विश्वचषकातला चौथा विजय साजरा केला.
 
२०१५ अॅडलेड, ऑस्ट्रेलिया
या मॅचमध्येही भारताचा संकटमोचक ठरला विराट कोहली. या मॅचमध्ये कोहलीने १०७ धावांची खेळी केली, आणि भारताला विजय मिळवून दिला.