शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

विश्वचषकातील भारत - पाक सामन्याचा इतिहास

By admin | Updated: March 19, 2016 09:34 IST

विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे. त्या आठवणींवर एक नजर..
 
१९९२ सिडनी, ऑस्ट्रेलिया 
१९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा हिरो ठरला सचिन तेंडुलकर. सचिननं या मॅचमध्ये ५४ रन केल्या, तसंच १ विकेटही काढली. भारतानं ही मॅच ४३ रननं जिंकली. 
 
१९९६ बंगळुरू, भारत
आमिर सोहेल आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींमुळे हा सामना क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. भारतानं ही मॅच ३७ धावांनी जिंकली. 
 
१९९९ मॅन्चेस्टर, इंग्लंड
२२७ रन्सचे माफक आव्हान पार करणं पाकिस्तानला अवघड झालं ते व्यंकटेश प्रसादमुळे. या मॅचमध्ये प्रसादनं पाकिस्तानच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, आणि भारतानं ही मॅच ४७ धावांनी जिंकली. 
 
२००३ सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका
भारतानं ही मॅच जिंकली ती सचिन तेंडुलकरच्या अविस्मरणीय खेळीमुळे. या मॅचमध्ये सचिनचे शतक फक्त २ धावांनी हुकले, तरी सचिनची ही खेळी क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. या मॅचमध्ये भारताचा ६ गडी आणि २६ चेंडू राखून विजय झाला. 
 
२००७ डर्बन, दक्षिण आफ्रिका
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले, आणि हा सामना टाय झाला. अखेर बॉल आऊटच्या माध्यमातून भारताचा या मॅचमध्ये विजय झाला.
 
२००७ जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका 
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला तो फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून. जोगिंदर शर्मानं मिसबाहची विकेट घेतली आणि भारतानं टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
 
२०११ मोहाली, भारत
जेव्हा तुम्ही सचिनचे ४ कॅच सोडाल, तेव्हा मॅच जिंकणं अशक्यच होऊन बसेल. पाकिस्ताननं हे केलं २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये आणि त्यामुळे पाकिस्तानचा या मॅचमध्ये २९ रन्सने पराभव झाला. 
 
२०१२ कोलंबो, श्रीलंका
विराट कोहलीच्या ७८ रनच्या खेळीमुळे टी २० वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. ही मॅच भारतानं ८ विकेट आणि ३ ओव्हर राखून अगदी सहज जिंकली.
 
२०१४ मिरपूर,  बांगलादेश
२०१४ साली बांगलादेशात झालेल्या विश्वचषकात टीम इंडियानं उपविजेतेपद मिळवलं. त्या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानवर मात केली होती. मिरपूरच्या मैदानात टीम इंडियानं पाकिस्तानला सात विकेट्सनी सहज लोळवलं आणि पाकिस्तानवर ट्वेन्टी२० विश्वचषकातला चौथा विजय साजरा केला.
 
२०१५ अॅडलेड, ऑस्ट्रेलिया
या मॅचमध्येही भारताचा संकटमोचक ठरला विराट कोहली. या मॅचमध्ये कोहलीने १०७ धावांची खेळी केली, आणि भारताला विजय मिळवून दिला.