शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषकातील भारत - पाक सामन्याचा इतिहास

By admin | Updated: March 19, 2016 09:34 IST

विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे. त्या आठवणींवर एक नजर..
 
१९९२ सिडनी, ऑस्ट्रेलिया 
१९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा हिरो ठरला सचिन तेंडुलकर. सचिननं या मॅचमध्ये ५४ रन केल्या, तसंच १ विकेटही काढली. भारतानं ही मॅच ४३ रननं जिंकली. 
 
१९९६ बंगळुरू, भारत
आमिर सोहेल आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींमुळे हा सामना क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. भारतानं ही मॅच ३७ धावांनी जिंकली. 
 
१९९९ मॅन्चेस्टर, इंग्लंड
२२७ रन्सचे माफक आव्हान पार करणं पाकिस्तानला अवघड झालं ते व्यंकटेश प्रसादमुळे. या मॅचमध्ये प्रसादनं पाकिस्तानच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, आणि भारतानं ही मॅच ४७ धावांनी जिंकली. 
 
२००३ सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका
भारतानं ही मॅच जिंकली ती सचिन तेंडुलकरच्या अविस्मरणीय खेळीमुळे. या मॅचमध्ये सचिनचे शतक फक्त २ धावांनी हुकले, तरी सचिनची ही खेळी क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. या मॅचमध्ये भारताचा ६ गडी आणि २६ चेंडू राखून विजय झाला. 
 
२००७ डर्बन, दक्षिण आफ्रिका
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले, आणि हा सामना टाय झाला. अखेर बॉल आऊटच्या माध्यमातून भारताचा या मॅचमध्ये विजय झाला.
 
२००७ जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका 
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला तो फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून. जोगिंदर शर्मानं मिसबाहची विकेट घेतली आणि भारतानं टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
 
२०११ मोहाली, भारत
जेव्हा तुम्ही सचिनचे ४ कॅच सोडाल, तेव्हा मॅच जिंकणं अशक्यच होऊन बसेल. पाकिस्ताननं हे केलं २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये आणि त्यामुळे पाकिस्तानचा या मॅचमध्ये २९ रन्सने पराभव झाला. 
 
२०१२ कोलंबो, श्रीलंका
विराट कोहलीच्या ७८ रनच्या खेळीमुळे टी २० वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. ही मॅच भारतानं ८ विकेट आणि ३ ओव्हर राखून अगदी सहज जिंकली.
 
२०१४ मिरपूर,  बांगलादेश
२०१४ साली बांगलादेशात झालेल्या विश्वचषकात टीम इंडियानं उपविजेतेपद मिळवलं. त्या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानवर मात केली होती. मिरपूरच्या मैदानात टीम इंडियानं पाकिस्तानला सात विकेट्सनी सहज लोळवलं आणि पाकिस्तानवर ट्वेन्टी२० विश्वचषकातला चौथा विजय साजरा केला.
 
२०१५ अॅडलेड, ऑस्ट्रेलिया
या मॅचमध्येही भारताचा संकटमोचक ठरला विराट कोहली. या मॅचमध्ये कोहलीने १०७ धावांची खेळी केली, आणि भारताला विजय मिळवून दिला.