शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

85 वर्षाच्या भारतीय क्रिकेट विश्वातील विराटसेनेचा ऐतिहासिक विक्रम

By admin | Updated: March 28, 2017 13:35 IST

अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली.

ऑनलाइन लोकमतधरमशाला, दि. 28 - गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली बॉर्डर-गावस्कर मालिका खेळाडूंनी ठोकलेली शतकं, बळींची रास आणि त्यापेक्षा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील बाचाबाची, स्लेजिंगमुळे चर्चेचा विषय ठरली. पण अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली. कसोटी क्रमवारीतील नंबर एकवर असलेल्या टीम इंडियाने यंदाच्या हंगामात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारताच्या कसोटी इतिहासाच्या 85 वर्षात पहिल्यांदाच असा पराक्रम विराटसेने केला आहे. 2015मध्ये भारतीय संघाची श्रीलंका विरोधात विजयी रथाला सुरुवात झाली होती, अद्याप ती कायम आहे. ऑस्ट्रेलियाला पराभव करत सलग सातव्या वेळीस भारताने विजय मिळवला. हा भारताच्या कसोटी इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. जागतिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासाचा विचार केल्यास रिकी पॉटिंगने आतापर्यंत सलग सर्वात जास्त विजय मिळवले आहेत. पॉटिंगने सलग 9 वेळा मालिका विजय मिळवला आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पुणे येथे खेळलेल्य़ा पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 333 धांवानी पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली. आणि तिसरा कसोटी अनिर्णीत राखण्यात कांगारुंना यश आले होते. मालिकेत पहिला कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने चौथ्या वेळेस कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.

विराटसेनेचे सलग सात मालिकाविजय

  1. - भारत विरुद्ध श्रीलंका 2-1 (3 टेस्ट) : 2015
  2. - भारत विरुद्ध द. अफ्रीका 3-0 (4) : 2015-16
  3. - भारत विरुद्ध वेस्टइंडीज 2-0 (4) : 2016
  4. - भारत विरुद्ध न्युझीलंड 3-0 (3) : 2016-17
  5. - भारत विरुद्ध इंग्लैंड 4-0 (5) : 2016-17
  6. - भारत विरुद्ध बांग्लादेश 1-0 (1) : 2016-17
  7. - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2-1 (4) : 2016-17