शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

85 वर्षाच्या भारतीय क्रिकेट विश्वातील विराटसेनेचा ऐतिहासिक विक्रम

By admin | Updated: March 28, 2017 13:35 IST

अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली.

ऑनलाइन लोकमतधरमशाला, दि. 28 - गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली बॉर्डर-गावस्कर मालिका खेळाडूंनी ठोकलेली शतकं, बळींची रास आणि त्यापेक्षा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील बाचाबाची, स्लेजिंगमुळे चर्चेचा विषय ठरली. पण अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली. कसोटी क्रमवारीतील नंबर एकवर असलेल्या टीम इंडियाने यंदाच्या हंगामात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारताच्या कसोटी इतिहासाच्या 85 वर्षात पहिल्यांदाच असा पराक्रम विराटसेने केला आहे. 2015मध्ये भारतीय संघाची श्रीलंका विरोधात विजयी रथाला सुरुवात झाली होती, अद्याप ती कायम आहे. ऑस्ट्रेलियाला पराभव करत सलग सातव्या वेळीस भारताने विजय मिळवला. हा भारताच्या कसोटी इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. जागतिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासाचा विचार केल्यास रिकी पॉटिंगने आतापर्यंत सलग सर्वात जास्त विजय मिळवले आहेत. पॉटिंगने सलग 9 वेळा मालिका विजय मिळवला आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पुणे येथे खेळलेल्य़ा पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 333 धांवानी पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली. आणि तिसरा कसोटी अनिर्णीत राखण्यात कांगारुंना यश आले होते. मालिकेत पहिला कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने चौथ्या वेळेस कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.

विराटसेनेचे सलग सात मालिकाविजय

  1. - भारत विरुद्ध श्रीलंका 2-1 (3 टेस्ट) : 2015
  2. - भारत विरुद्ध द. अफ्रीका 3-0 (4) : 2015-16
  3. - भारत विरुद्ध वेस्टइंडीज 2-0 (4) : 2016
  4. - भारत विरुद्ध न्युझीलंड 3-0 (3) : 2016-17
  5. - भारत विरुद्ध इंग्लैंड 4-0 (5) : 2016-17
  6. - भारत विरुद्ध बांग्लादेश 1-0 (1) : 2016-17
  7. - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2-1 (4) : 2016-17