शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

पराभव वेदनादायी

By admin | Updated: August 11, 2014 02:12 IST

मोठ्या फरकाने विजय मिळविल्यानंतर हुरळून जायचे नाही आणि पराभव स्वीकारावा लागला तरी राग व्यक्त करायचा नाही

मँचेस्टर : मोठ्या फरकाने विजय मिळविल्यानंतर हुरळून जायचे नाही आणि पराभव स्वीकारावा लागला तरी राग व्यक्त करायचा नाही, ही कॅप्टन कुल धोनीची विशेषता आहे. मात्र मँचेस्टरमध्ये मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्याला आपली निराशा लपवता आली नाही. या मालिकेत सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पत्रकार परिषदेत धोनी हसऱ्या चेहऱ्याने आला. मात्र त्याला आपल्या नेहमीच्या शैलीने संघांच्या पराभवाचे समर्थन करता येत नव्हते. तसेच त्याला आपली निराशाही लपवता आली नाही. पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘हा पराभव आम्हाला जास्तच झोंबला आहे. खेळपट्टी चांगली असताना कसोटी सामन्यांत तीन दिवसांत पराभव स्वीकारावा लागणे निराशाजनक आहे. पहिल्या दिवशीची सुरुवातीचीे ४५ मिनिटे निर्णायक ठरली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे यजमान संघाला वर्चस्व गाजविण्याची संधी मिळाली. दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली नाही, असे तुम्हाला म्हणता येईल; पण पहिल्या दिवशी पहिल्या तासाचा खेळच महत्त्वाचा ठरला.’धावफलकावर धावा असणे महत्त्वाचे असते. लॉर्डस् कसोटीत तळाच्या फलंदाजांचे योगदान उल्लेखनीय ठरले. या मालिकेत तळाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आघाडीच्या फलंदाजांचे अपयश संघासाठी चिंतेचा विषय आहे. पाचव्या गोलंदाजाने अधिक धावा फटकाविल्या आहेत, असेही धोनी म्हणाला.संघातील काही फलंदाज फॉर्मात नाहीत, हे सत्य असले तरी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करण्यासाठी धावफलकावर पुरेशा धावा असणे आवश्यक आहे. जर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळाली तर प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्याची भारतीय गोलंदाजांमध्ये क्षमता आहे, ही सकारात्मक बाब या कसोटी सामन्यातून सिद्ध झाली.