शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

हरमनप्रीत कौरची झुंझार खेळी, भारत अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:29 IST

अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरच्या शानदार दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 21 - अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरच्या शानदार दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत आता भारताचा इंग्लंडबरोबर सामना होणार आहे. 
आज झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 36 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडविली. हरमनप्रीत कौरने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 171 धावांची तुफान खेळी केली. दरम्यान, या सामन्यात भारताने दिलेल्या 282 धावांचा पाठलाग करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली. ठराविक धावांच्या अंतराने ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले.  फलंदाज अॅलेक्स ब्लॅकवेलने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली. मात्र, ती अपयशी ठरली. तर, संघाची कर्णधार मेग लेनिग अवघ्या शून्य धावेवर तंबूत परतली. तर, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल हिने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटच्या फळीतील फलंदाजी लवकर ढासळली. अ‍ॅलिस विलानीने 75 धावा केल्या. निकोल बोल्टन (14), अ‍ॅलिस पेरी (38), बेथ मूनी (1), अ‍ॅश्ले गार्डनर (1), जेस जोनासेन (1), मेगान शट (2) आणि ख्रिस्टीन बीम्स नाबाद 11 धावा केल्या.  या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 40.1 षटकात 245 धावा केल्या. 
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारीत 42 षटकात 4 बाद 281 धावा केला होत्या. भारताची फलंदाज हरमनप्रीत कौरने हिने धडाकेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडविली. हरमनप्रीत कौरने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 171 धावांची तुफानी खेळी केली. तर, स्मृती मंधना (6) आणि पूनम राऊत (14) हे सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार मिताली राज (36) व हरमनप्रीत यांनी डाव सावरला. दिप्ती शर्माने 25 आणि वेदा कृष्णामूर्तीने नाबाद 16 धावांची खेळी केली. 
भारताकडून गोलंदाज दिप्ती शर्मा, झूलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतले. तर, ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज अ‍ॅलिस विलानी, ख्रिस्टीन बीम्स, अ‍ॅश्ले गार्डनर आणि मेगान शट यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.