शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

हार्दिकचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट’

By admin | Updated: July 6, 2017 01:42 IST

चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे.

- सौरव गांगुली चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे. पाहुणा संघ १९० धावांचे सहज लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. या पराभवास जबाबदार खेळाडूृंना धारेवर धरले गेले. कुमकुवत विंडीजविरुद्ध सामना गमविल्यामुळे टीका होणे स्वाभाविक आहे. अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर हे लक्ष्य लहान वाटत असले तरी अवघड होते. प्रामाणिकपणे बोलायचे तर हे लक्ष्य मुळीच सोपे नव्हते. विकेटवर पाय रोवणे आणि नंतर लक्ष्य गाठणे असे विजयाचे समीकरण होते. हे काम पूर्ण करण्यासाठी अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी हे दोन फलंदाज होते. दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले पण विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. धोनीने चांगली सुरुवात केली पण लक्ष्य भेदण्यात तो देखील अपयशीच ठरला. वन डे क्रिकेटमध्ये धोनीचे तंत्र वेगळेच आहे. अनेकदा तो आपल्या तंत्रात यशस्वी ठरला पण या सामन्यात तो स्वत:च्या चक्रव्यूहात अडकला असावा. अशा परिस्थितीत यश आणि अपयशामध्ये पुसटशी रेषा असते. धोनीला स्वत:चा प्रयत्न यशस्वी करता आला नाही. माझ्यामते हार्दिक पांड्याचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट ’ ठरला. तो चांगला फलंदाज आहे शिवाय धोनीच्या सोबतीने दडपण झुगारण्यात पटाईत मानला जातो. त्यानंतर रवींद्र जडेजा हा देखील धोनीची साथ देण्यात अपयशी ठरला. या पराभवामुळे कितीही टीका झाली झाली तरी अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग खरोखर कठीण होता, हे मान्य करावे लागेल. या खेळपट्टीवर चेंडू जुना झाला की अधिक धोकादायक ठरतो. चेंडू कधी उसळी घेईल, याचा वेध घेणे कठीण होते शिवाय वेगवान आॅफ ब्रेक मारा खेळणे अधिक कठीण होऊन बसते. धोनी लवकर बाद झाला असता तर सामना देखील फार आधी संपला असता.भारताला अखेरचा वन डे जमैकाच्या मैदानावर खेळायचा आहे. येथील खेळपट्टी अँटिग्वाच्या तुलनेत चांगली आहे. हा सामना भारताने जिंकायलाच हवा. भारतीय संघात काही बदल होऊ शकतील. पण जे बदल होतील त्या स्थितीतही विंडीजवर विजय नोंदवायलाच हवा. (गेमप्लान)