शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

हार्दिकचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट’

By admin | Updated: July 6, 2017 01:42 IST

चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे.

- सौरव गांगुली चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे. पाहुणा संघ १९० धावांचे सहज लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. या पराभवास जबाबदार खेळाडूृंना धारेवर धरले गेले. कुमकुवत विंडीजविरुद्ध सामना गमविल्यामुळे टीका होणे स्वाभाविक आहे. अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर हे लक्ष्य लहान वाटत असले तरी अवघड होते. प्रामाणिकपणे बोलायचे तर हे लक्ष्य मुळीच सोपे नव्हते. विकेटवर पाय रोवणे आणि नंतर लक्ष्य गाठणे असे विजयाचे समीकरण होते. हे काम पूर्ण करण्यासाठी अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी हे दोन फलंदाज होते. दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले पण विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. धोनीने चांगली सुरुवात केली पण लक्ष्य भेदण्यात तो देखील अपयशीच ठरला. वन डे क्रिकेटमध्ये धोनीचे तंत्र वेगळेच आहे. अनेकदा तो आपल्या तंत्रात यशस्वी ठरला पण या सामन्यात तो स्वत:च्या चक्रव्यूहात अडकला असावा. अशा परिस्थितीत यश आणि अपयशामध्ये पुसटशी रेषा असते. धोनीला स्वत:चा प्रयत्न यशस्वी करता आला नाही. माझ्यामते हार्दिक पांड्याचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट ’ ठरला. तो चांगला फलंदाज आहे शिवाय धोनीच्या सोबतीने दडपण झुगारण्यात पटाईत मानला जातो. त्यानंतर रवींद्र जडेजा हा देखील धोनीची साथ देण्यात अपयशी ठरला. या पराभवामुळे कितीही टीका झाली झाली तरी अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग खरोखर कठीण होता, हे मान्य करावे लागेल. या खेळपट्टीवर चेंडू जुना झाला की अधिक धोकादायक ठरतो. चेंडू कधी उसळी घेईल, याचा वेध घेणे कठीण होते शिवाय वेगवान आॅफ ब्रेक मारा खेळणे अधिक कठीण होऊन बसते. धोनी लवकर बाद झाला असता तर सामना देखील फार आधी संपला असता.भारताला अखेरचा वन डे जमैकाच्या मैदानावर खेळायचा आहे. येथील खेळपट्टी अँटिग्वाच्या तुलनेत चांगली आहे. हा सामना भारताने जिंकायलाच हवा. भारतीय संघात काही बदल होऊ शकतील. पण जे बदल होतील त्या स्थितीतही विंडीजवर विजय नोंदवायलाच हवा. (गेमप्लान)