शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्यांनी गुडघे टेकले

By admin | Updated: November 14, 2015 23:08 IST

आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन आणि डावखुरा रवींद्र जडेजा यांच्या भेदक माऱ्यापुढे द. आफ्रिकेने म. गांधी-नेल्सन मंडेला मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अक्षरश: गुडघे टेकले.

बंगळुरू : आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन (७० धावांत चार बळी) आणि डावखुरा रवींद्र जडेजा (५० धावांत चार बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे द. आफ्रिकेने म. गांधी-नेल्सन मंडेला मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अक्षरश: गुडघे टेकले. भारताने पाहुण्या संघाला अवघ्या २१४ धावांत गारद केल्यानंतर दिवसअखेर बिनबाद ८० धावा करीत सामन्यावर पकड निर्माण केली आहे.भारतीय फिरकीपटूंनी मोहालीतील कामगिरीची पुनरावृत्ती चिन्नास्वामी स्टेडियमवर करीत आफ्रिकेला ५९ षटकांत गुंडाळले. मोहालीत आठ गडी बाद करणाऱ्या आश्विन आणि जडेजा यांनी पुन्हा एकदा पाहुण्यांची दमछाक करीत नतमस्तक होण्यास भाग पाडले. द. आफ्रिकेकडून शंभरावी कसोटी खेळणारा एबी डीव्हिलियर्स याने भारतीय फिरकीचा प्रतिकार करीत सर्वाधिक १०५ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह ८५ धावा केल्या. भारताने दमदार सुरुवात केली. मुरली विजय आणि शिखर धवन यांनी ८० धावांची भागीदारी केली. शानदार फॉर्ममध्ये असलेला विजय ७३ चेंडूंत पाच चौकारांसह २८ आणि धवन ६२ चेंडूंत सात चौकारांसह ४५ धावांवर नाबाद आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि व्हर्नोन फिलँडर या दोन्ही वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत अन्य गोलंदाज निष्प्रभ ठरले. भारत द. आफ्रिकेच्या तुलनेत १३४ धावांनी मागे असून दहा गडी शिल्लक आहेत.आश्विनने पाहुण्यांना सलग धक्के दिले. स्टियान वान झिल (१०), फाफ डू प्लेसिस (००), जेपी ड्युमिनी (१५)आणि मोर्ने मोर्केल (२२) हे आश्विनचे बळी ठरले. वरुण अ‍ॅरॉनने कर्णधार हाशिम आमलाची दांडी गुल केली, तर काइल एबोट (१४) याला यष्टिरक्षक वृद्धिमान साहा आणि शिखर धवन यांनी धावबाद केले. चहापानाच्या आधी डीव्हिलियर्सच्या रूपात आफ्रिकेला जबर धक्का बसला. जडेजाच्या चेंडूवर साहाने त्याचा झेल घेतला. हा झेल फार खाली असल्याने पंचांना निर्णय देताना तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली. बराच वेळ रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिले. डीव्हिलियर्स- एल्गर यांनी चौथ्या गड्यासाठी ३३ आणि ड्युमिनीसोबत पाचव्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी केली. एल्गरने ८१ चेंडूंत ३८ आणि ड्युमिनीने १५ धावांचे योगदान दिले. द. आफ्रिकेचे पहिले पाच फलंदाज १२० धावांत बाद झाले होते. रबाडाला जडेजाने भोपळा न फोडू देता चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केले. अखेरचे पाच फलंदाजदेखील फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)धावफलकद. आफ्रिका पहिला डाव : स्टियान वान झिल पायचित गो. आश्विन १०, डीन एल्गर त्रि. गो. जडेजा ३८, फाफ डुप्लेसिस झे. पुजारा गो. आश्विन ०, हाशीम आमला त्रि. गो. अ‍ॅरोन ७, एबी डिव्हिलियर्स झे. साहा गो. जडेजा ८५, जेपी ड्युमिनी झे. रहाणे गो. आश्विन १५, डेन विलास झे. आणि गो. जडेजा १५, काइल अ‍ॅबोट धावबाद १४, कासिगो रबाडा झे. पुजारा गो. जडेजा ०, मोर्ने मोर्केल झे. बिन्नी गो. आश्विन २२, इम्रान ताहीर नाबाद ०, अवांतर : ८, एकूण : ५९ षटकांत सर्व बाद २१४ धावा. गडी बाद क्रम : १/१५, २/१५, ३/४५, ४/७८, ५/१२०, ६/१५९, ७/१७७, ८/१७७, ९/२१४. गोलंदाजी : ईशांत १३-३-४०-०, बिन्नी ३-२-१-०, आश्विन १८-२-७०-४, अ‍ॅरोन ९-०-५१-१, जडेजा १६-२-५०-४.भारत बिनबाद ८० धावाभारत पहिला डाव : मुरली विजय खेळत आहे २८, शिखर धवन खेळत आहे ४५, अवांतर : ७, एकूण २२ षटकांत बिनबाद ८० धावा. गोलंदाजी : मोर्केल ७-१-२३-०, अ‍ॅबोट ६-१-१८-०, रबाडा ५-१-१७-०, ड्युमिनी २-०-९-०, ताहीर २-०-९-०. अमित मिश्रावर अन्यायबेंगळुरू : जगातील सर्वांत धोकादायक फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा ज्या गोलंदाजाने एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावांत त्रिफळा उडवला त्या गोलंदाजाला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले. याला अन्याय नाहीतर दुसरे काय म्हणता येईल? भारतीय लेगस्पिनर अमित मिश्राने मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सर्वांत धोकादायक फलंदाज डिव्हिलियर्सला दोन्ही डावात क्लीन बोल्ड केले होते. भारताच्या विजयाचे हे सर्वांत महत्त्वाचे कारण ठरले होते, पण बेंगळुरूमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात मिश्राला वगळण्याचा आश्चर्यचकित करणारा निर्णय घेण्यात आला. त्याच्या जागी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला संधी देण्यात आली. स्टुअर्ट बिन्नीने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात केवळ तीन षटके गोलंदाजी केली तर आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनने १८ तर डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने १६ षटके गोलंदाजी केली. या दोघांनी प्रत्येकी चार बळी घेतले. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात २१४ धावा फटकावल्या. त्यात डिव्हिलियर्सने एकाकी झुंज देताना ८५ धावांची खेळी केली. मिश्राच्या जागी बिन्नीची निवड करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहे.बीसीसीआयने अलीकडे मुंबईत झालेल्या वार्षिक आमसभेमध्ये हितसंबंध जोपासले जात असल्याच्या मुद्यावर राष्ट्रीय निवड समितीतून रॉजर बिन्नी यांना वगळले. स्टुअर्ट बिन्नीवर राष्ट्रीय निवड समिती सदस्याचा मुलगा असल्याचा ठपका लागला आहे. त्यामुळे रॉजर बिन्नी यांना निवड समितीतून वगळण्यात आले.