शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

सरकारची परवानगी आवश्यक

By admin | Updated: December 11, 2015 00:31 IST

भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारत- पाक मालिकेबाबत सरकार जोवर निर्णय घेत नाही, तोपर्यंत बीसीसीआय काहीच करू शकत नाही. गेल्या वर्षी ९ एप्रिल रोजी आयसीसी वेळापत्रकानुसार भारताला पुढच्या ८ वर्षांत पाकविरुद्ध ६ मालिका खेळायच्या होत्या. याअंतर्गत पाकला डिसेंबर महिन्यात यूएईत मालिकेचे आयोजन करायचे आहे. अलीकडे बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबी प्रमुख शहरयार खान हे दुबईत भेटले तेव्हा लहान मालिकेचे आयोजन लंकेत करण्याविषयी एकमत झाले. आम्ही संघाच्या परवानगीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर कुठलेही उत्तर मिळालेले नाही. मालिका खंडित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या ३० वर्षांत विविध कारणांस्तव अनेकदा मालिका होऊ शकलेली नाही.’’परराष्ट्रमंत्र्यांच्या पाक दौऱ्यामुळे मालिका आयोजनाची आशा पल्लवित झाली होती; पण सरकार हिरवी झंडी देत नसल्याने सर्व थांबले असल्याचे सांगून ठाकूर म्हणाले, ‘‘शहरयार खान यांनी दोन दिवसांची मुदत दिल्याचे मीडियातून कळाले; अधिकृत पत्र मिळालेले नाही. मालिका आयोजनाची पीसीबीची वेळ असल्याने मालिका कधी आयोजित करायची, हा त्यांचा प्रश्न आहे.’’मालिका आयोजनाला फार कमी वेळ असल्याबद्दल विचारताच राजीव शुक्ला म्हणाले, ‘‘आम्ही सरकारला वेळेची मर्यादा देऊ शकत नाही. निर्णय घेणे सरकारचे काम आहे. सरकारचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल. सरकारचा निर्णय येईपर्यंत मालिकेच्या भविष्यावर बोलणे अर्थहीन ठरेल.’’ (वृत्तसंस्था) ...तर क्रिकेट संपेल काय?:युसूफकराची : भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका झाली नाही, तरी विश्व क्रिकेटला फरक पडणार नाही. भारत पाकसोबत खेळलाच, तर पाकची तिजोरी भरण्यापलीकडे काहीही होणार नाही. पाक क्रिकेटला लाभ होणार नाही.