शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

सरकारची परवानगी आवश्यक

By admin | Updated: December 11, 2015 00:31 IST

भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारत- पाक मालिकेबाबत सरकार जोवर निर्णय घेत नाही, तोपर्यंत बीसीसीआय काहीच करू शकत नाही. गेल्या वर्षी ९ एप्रिल रोजी आयसीसी वेळापत्रकानुसार भारताला पुढच्या ८ वर्षांत पाकविरुद्ध ६ मालिका खेळायच्या होत्या. याअंतर्गत पाकला डिसेंबर महिन्यात यूएईत मालिकेचे आयोजन करायचे आहे. अलीकडे बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबी प्रमुख शहरयार खान हे दुबईत भेटले तेव्हा लहान मालिकेचे आयोजन लंकेत करण्याविषयी एकमत झाले. आम्ही संघाच्या परवानगीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर कुठलेही उत्तर मिळालेले नाही. मालिका खंडित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या ३० वर्षांत विविध कारणांस्तव अनेकदा मालिका होऊ शकलेली नाही.’’परराष्ट्रमंत्र्यांच्या पाक दौऱ्यामुळे मालिका आयोजनाची आशा पल्लवित झाली होती; पण सरकार हिरवी झंडी देत नसल्याने सर्व थांबले असल्याचे सांगून ठाकूर म्हणाले, ‘‘शहरयार खान यांनी दोन दिवसांची मुदत दिल्याचे मीडियातून कळाले; अधिकृत पत्र मिळालेले नाही. मालिका आयोजनाची पीसीबीची वेळ असल्याने मालिका कधी आयोजित करायची, हा त्यांचा प्रश्न आहे.’’मालिका आयोजनाला फार कमी वेळ असल्याबद्दल विचारताच राजीव शुक्ला म्हणाले, ‘‘आम्ही सरकारला वेळेची मर्यादा देऊ शकत नाही. निर्णय घेणे सरकारचे काम आहे. सरकारचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल. सरकारचा निर्णय येईपर्यंत मालिकेच्या भविष्यावर बोलणे अर्थहीन ठरेल.’’ (वृत्तसंस्था) ...तर क्रिकेट संपेल काय?:युसूफकराची : भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका झाली नाही, तरी विश्व क्रिकेटला फरक पडणार नाही. भारत पाकसोबत खेळलाच, तर पाकची तिजोरी भरण्यापलीकडे काहीही होणार नाही. पाक क्रिकेटला लाभ होणार नाही.