शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची परवानगी आवश्यक

By admin | Updated: December 11, 2015 00:31 IST

भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारत- पाक मालिकेबाबत सरकार जोवर निर्णय घेत नाही, तोपर्यंत बीसीसीआय काहीच करू शकत नाही. गेल्या वर्षी ९ एप्रिल रोजी आयसीसी वेळापत्रकानुसार भारताला पुढच्या ८ वर्षांत पाकविरुद्ध ६ मालिका खेळायच्या होत्या. याअंतर्गत पाकला डिसेंबर महिन्यात यूएईत मालिकेचे आयोजन करायचे आहे. अलीकडे बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबी प्रमुख शहरयार खान हे दुबईत भेटले तेव्हा लहान मालिकेचे आयोजन लंकेत करण्याविषयी एकमत झाले. आम्ही संघाच्या परवानगीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर कुठलेही उत्तर मिळालेले नाही. मालिका खंडित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या ३० वर्षांत विविध कारणांस्तव अनेकदा मालिका होऊ शकलेली नाही.’’परराष्ट्रमंत्र्यांच्या पाक दौऱ्यामुळे मालिका आयोजनाची आशा पल्लवित झाली होती; पण सरकार हिरवी झंडी देत नसल्याने सर्व थांबले असल्याचे सांगून ठाकूर म्हणाले, ‘‘शहरयार खान यांनी दोन दिवसांची मुदत दिल्याचे मीडियातून कळाले; अधिकृत पत्र मिळालेले नाही. मालिका आयोजनाची पीसीबीची वेळ असल्याने मालिका कधी आयोजित करायची, हा त्यांचा प्रश्न आहे.’’मालिका आयोजनाला फार कमी वेळ असल्याबद्दल विचारताच राजीव शुक्ला म्हणाले, ‘‘आम्ही सरकारला वेळेची मर्यादा देऊ शकत नाही. निर्णय घेणे सरकारचे काम आहे. सरकारचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल. सरकारचा निर्णय येईपर्यंत मालिकेच्या भविष्यावर बोलणे अर्थहीन ठरेल.’’ (वृत्तसंस्था) ...तर क्रिकेट संपेल काय?:युसूफकराची : भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका झाली नाही, तरी विश्व क्रिकेटला फरक पडणार नाही. भारत पाकसोबत खेळलाच, तर पाकची तिजोरी भरण्यापलीकडे काहीही होणार नाही. पाक क्रिकेटला लाभ होणार नाही.