शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सरकारची परवानगी आवश्यक

By admin | Updated: December 11, 2015 00:31 IST

भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारत- पाक मालिकेबाबत सरकार जोवर निर्णय घेत नाही, तोपर्यंत बीसीसीआय काहीच करू शकत नाही. गेल्या वर्षी ९ एप्रिल रोजी आयसीसी वेळापत्रकानुसार भारताला पुढच्या ८ वर्षांत पाकविरुद्ध ६ मालिका खेळायच्या होत्या. याअंतर्गत पाकला डिसेंबर महिन्यात यूएईत मालिकेचे आयोजन करायचे आहे. अलीकडे बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबी प्रमुख शहरयार खान हे दुबईत भेटले तेव्हा लहान मालिकेचे आयोजन लंकेत करण्याविषयी एकमत झाले. आम्ही संघाच्या परवानगीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर कुठलेही उत्तर मिळालेले नाही. मालिका खंडित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या ३० वर्षांत विविध कारणांस्तव अनेकदा मालिका होऊ शकलेली नाही.’’परराष्ट्रमंत्र्यांच्या पाक दौऱ्यामुळे मालिका आयोजनाची आशा पल्लवित झाली होती; पण सरकार हिरवी झंडी देत नसल्याने सर्व थांबले असल्याचे सांगून ठाकूर म्हणाले, ‘‘शहरयार खान यांनी दोन दिवसांची मुदत दिल्याचे मीडियातून कळाले; अधिकृत पत्र मिळालेले नाही. मालिका आयोजनाची पीसीबीची वेळ असल्याने मालिका कधी आयोजित करायची, हा त्यांचा प्रश्न आहे.’’मालिका आयोजनाला फार कमी वेळ असल्याबद्दल विचारताच राजीव शुक्ला म्हणाले, ‘‘आम्ही सरकारला वेळेची मर्यादा देऊ शकत नाही. निर्णय घेणे सरकारचे काम आहे. सरकारचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल. सरकारचा निर्णय येईपर्यंत मालिकेच्या भविष्यावर बोलणे अर्थहीन ठरेल.’’ (वृत्तसंस्था) ...तर क्रिकेट संपेल काय?:युसूफकराची : भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका झाली नाही, तरी विश्व क्रिकेटला फरक पडणार नाही. भारत पाकसोबत खेळलाच, तर पाकची तिजोरी भरण्यापलीकडे काहीही होणार नाही. पाक क्रिकेटला लाभ होणार नाही.