शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

भारतीय संघाकडे प्रयोग करण्याची चांगली संधी

By admin | Updated: June 28, 2017 00:43 IST

वेस्ट इंडिज दौऱ्यावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने जिंकला आहे, तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने जिंकला आहे, तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. पण, माझ्यामते तो सामनाही भारताने जिंकला असता. कारण, वेस्ट इंडिजचा संघ खूप कमजोर आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली नाही. त्याशिवाय अफगाणिस्तान सारख्या नवख्या संघाविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यावर त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे हा संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बिघडलेला दिसत आहे. कारण, त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु ती गुणवत्ता राष्ट्रीय संघासाठी खेळत नाहीए. ख्रिस गेल, सुनिल नरेन, द्वेन ब्रावो यांसारखे अनेक खेळाडू अनेक काळापासून वेस्ट इंडिजसाठी कधी खेळतात, तर कधी खेळत नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचे क्रिकेट खूप बिघडले आहे. काही लोकांचे मत आहे की, भारतीय क्रिकेट संघाला विंडिज दौऱ्यावर जाऊन काय मिळाले? परंतु, माझ्या मते भलेही विंडिज संघ कमजोर असेल, पण ही मालिका भारतीय संघासाठी, खेळाडूंसाठी आणि कर्णधारासाठी खूप महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे प्रयोग करण्याची संधी आहे. जे खेळाडू संघाबाहेर बसलेत, त्यांना संधी देणे किंवा आणखी १०-१२ खेळाडू असे आहेत, जे भारतीय संघातून खेळू शकतात, अशा खेळाडूंना संधी देता येऊ शकते. त्यामुळे म्हणावा तसा मजबूत प्रतिस्पर्धी नसलेल्या संघाच्या दौऱ्यावर प्रयोग करण्याची उत्तम संधी भारताकडे आहे. त्याशिवाय, आपण २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी तंदुरुस्त आहोत, हे सिध्द करण्यासाठी काही खेळाडूंवर दबाव असेल. राहुल द्रविडने तर युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांना इशारा देत नुकतीच एक प्रतिक्रीयाही दिली. त्यामुळे वाढत्या वयाचा या दिग्गज खेळाडूंवरही दबाव असेल. तसेच, अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूला संधी मिळाल्यानंतर त्याने शतक झळकावले. तो आता आघाडीच्या फळीमध्ये कोणाचीही जागा घेऊ शकतो. गोलंदाजीमध्ये दोन वर्षांपुर्वी मोहम्मद शमी आणि उमेश यादव प्रमुख गोलंदाज होते, पण आता ती जागा भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी घेतली आहे. त्यामुळे संघात अनेक उलटफेर होऊ शकतात. या सर्व घडामोडी लक्षात घेऊनच निवडकर्ते आणि कर्णधाराला पुढे जावं लागेल. कर्णधाराच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, ही मालिका कर्णधारासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. गेल्या काही दिवसांमध्ये कर्णधार कोहलीचा माजी प्रशिक्षक कुंबळेसह जो काही वाद झाला, तो वाद मागे टाकून संघाला पुन्हा एकदा विजयी प्रवाहामध्ये आणण्याचे मुख्य लक्ष्य कोहलीपुढे असेल. यामुळे त्याचा आणि संघाचाही आत्मविश्वास वाढेल.