शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाकडे प्रयोग करण्याची चांगली संधी

By admin | Updated: June 28, 2017 00:43 IST

वेस्ट इंडिज दौऱ्यावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने जिंकला आहे, तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने जिंकला आहे, तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. पण, माझ्यामते तो सामनाही भारताने जिंकला असता. कारण, वेस्ट इंडिजचा संघ खूप कमजोर आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली नाही. त्याशिवाय अफगाणिस्तान सारख्या नवख्या संघाविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यावर त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे हा संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बिघडलेला दिसत आहे. कारण, त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु ती गुणवत्ता राष्ट्रीय संघासाठी खेळत नाहीए. ख्रिस गेल, सुनिल नरेन, द्वेन ब्रावो यांसारखे अनेक खेळाडू अनेक काळापासून वेस्ट इंडिजसाठी कधी खेळतात, तर कधी खेळत नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचे क्रिकेट खूप बिघडले आहे. काही लोकांचे मत आहे की, भारतीय क्रिकेट संघाला विंडिज दौऱ्यावर जाऊन काय मिळाले? परंतु, माझ्या मते भलेही विंडिज संघ कमजोर असेल, पण ही मालिका भारतीय संघासाठी, खेळाडूंसाठी आणि कर्णधारासाठी खूप महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे प्रयोग करण्याची संधी आहे. जे खेळाडू संघाबाहेर बसलेत, त्यांना संधी देणे किंवा आणखी १०-१२ खेळाडू असे आहेत, जे भारतीय संघातून खेळू शकतात, अशा खेळाडूंना संधी देता येऊ शकते. त्यामुळे म्हणावा तसा मजबूत प्रतिस्पर्धी नसलेल्या संघाच्या दौऱ्यावर प्रयोग करण्याची उत्तम संधी भारताकडे आहे. त्याशिवाय, आपण २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी तंदुरुस्त आहोत, हे सिध्द करण्यासाठी काही खेळाडूंवर दबाव असेल. राहुल द्रविडने तर युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांना इशारा देत नुकतीच एक प्रतिक्रीयाही दिली. त्यामुळे वाढत्या वयाचा या दिग्गज खेळाडूंवरही दबाव असेल. तसेच, अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूला संधी मिळाल्यानंतर त्याने शतक झळकावले. तो आता आघाडीच्या फळीमध्ये कोणाचीही जागा घेऊ शकतो. गोलंदाजीमध्ये दोन वर्षांपुर्वी मोहम्मद शमी आणि उमेश यादव प्रमुख गोलंदाज होते, पण आता ती जागा भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी घेतली आहे. त्यामुळे संघात अनेक उलटफेर होऊ शकतात. या सर्व घडामोडी लक्षात घेऊनच निवडकर्ते आणि कर्णधाराला पुढे जावं लागेल. कर्णधाराच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, ही मालिका कर्णधारासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. गेल्या काही दिवसांमध्ये कर्णधार कोहलीचा माजी प्रशिक्षक कुंबळेसह जो काही वाद झाला, तो वाद मागे टाकून संघाला पुन्हा एकदा विजयी प्रवाहामध्ये आणण्याचे मुख्य लक्ष्य कोहलीपुढे असेल. यामुळे त्याचा आणि संघाचाही आत्मविश्वास वाढेल.