शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

पदक जिंकण्याची चांगली संधी : श्रीकांत

By admin | Updated: July 2, 2017 00:21 IST

पुढील महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याची भारतीय खेळाडूंना चांगली संधी असल्याचे इंडोनेशियन आणि आॅस्ट्रेलियन

नवी दिल्ली : पुढील महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याची भारतीय खेळाडूंना चांगली संधी असल्याचे इंडोनेशियन आणि आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिजचा विजेता किदाम्बी श्रीकांत याचे मत आहे.श्रीकांतसह बी. साईप्रणित आणि अजय जयराम हे पुरुष एकेरीत या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेचे आयोजन ग्लास्गो येथे २१ ते २७ आॅगस्टरम्यान होईल. क्रीडामंत्री विजय गोयल यांच्याकडून सन्मान स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रीकांत म्हणाला, ‘आम्ही सर्व खेळाडू चांगला खेळ करीत आहोत. पदके जिंकूच असे हमखास सांगणार नाही पण आमच्याकडे संधी आहे. त्यासाठी सामन्याच्या दिवशी शंभर टक्के योगदान गरजेचे असेल. इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी सर्वच खेळाडू कठोर तयारी करतात हे ध्यानात ठेवूनच आम्ही खेळणार आहोत.’या स्पर्धेत उतरणारे आघाडीचे ३०-३५ खेळाडू कुणावरही मात करण्यास सज्ज असतात. इंडोनेशिया ओपनमध्ये याची प्रचिती आली. २९ व्या स्थानावरील प्रणयने चेन लोंग आणि ली चें वेई यांना पाठोपाठ हरविले. माझा खेळ विश्व चॅम्पियनशिप आधी बहरणे हे देशाच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे, असे श्रीकांत म्हणाला. गुंटूरच्या या २४ वर्षांच्या खेळाडूला रिओ आॅलिम्पिकनंतर जखम झाली होती. पाच महिने स्पर्धेबाहेर राहिल्यानंतरही स्वत:च्या क्षमतेवर विश्वास राखल्यामुळे यशस्वी पुनरागमन करणे शक्य होऊ शकल्याचे श्रीकांतने सांगितले. (वृत्तसंस्था)