शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

सोनेरी स्वप्नाची पुनरावृत्ती

By admin | Updated: February 11, 2015 07:00 IST

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११मध्ये केली. प्रत्येक क्षणाला ज्याने भारताला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न पाहिले अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी

‘त्याने कधी १०० शतकं बनविण्याचा विचार केला नाही... १०,००० हून अधिक धावा करण्याचेही त्याच्या ध्यानी मनी नव्हते... त्याचे केवळ एकच स्वप्न होते आणि ते म्हणजे भारताला विश्वचषक जिंकून देण्याचे...’ २०११ मध्ये सचिन तेंडुलकरचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले ते महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघाने. प्रदीर्घ कारकिर्दीत सचिनला एकही विश्वचषक जिंकता न येणे, ही त्याच्या चाहत्यांना आणि त्याला गुरू मानणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला अमान्य होती. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूने २०११चा विश्वचषक जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले. सचिनला गुरू मारणारा एकलव्य युवराज सिंह याने कॅन्सर असूनही गुरूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली खेळी ही अतुलनीयच होती. याच अतुलनीय कामगिरीच्या बळावर २८ वर्षांनंतर भारताने विश्वचषक उंचावला. फॉर्मात असलेल्या युवीला मागे टाकून धोनीचे वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणे... अप्रतीम खेळ करून त्याने खेचलेला तो विजयी षटकार आणि युवीचे त्याला मिठी मारून ढसाढसा रडणे... पॅव्हेलियनमधून खेळाडूंनी उडी मारून मैदानाकडे घेतलेली धाव व सचिनला खांद्यावर घेत हरभजन सिंग व विराट कोहली यांनी स्टेडियमवर काढलेली मिरवणूक... हे सारे आजही आपल्यासमोर आहे. चला मग या प्रवासवाटेच्या पाऊलखुणांवर पुन्हा एकदा चालूया...१९ फेब्रुवारी २०११ : वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांच्या शतकी खेळीने भारताने मिरपूर येथे खेळविलेल्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशसमोर ३७० धावांचा डोंगर उभा केला. भारताने जिंकलेल्या या लढतीत बांगलादेशने कडवा संघर्ष करत ९ बाद २८३ धावांची अनपेक्षित झेप घेतली. २७ फेब्रुवारी २०११ : शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारताला बरोबरी राखण्यात यश मिळाले. विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना मुनाफने मात्र चतुराईने गोलंदाजी करून अखेरच्या तीन चेंडूंत केवळ चार धावा दिल्या आणि सामना बरोबरीत सुटला. ६ मार्च २०११ : आयर्लंडचा कर्णधार पोर्टेफिल्ड (७५) आणि नील ओब्रायन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करून संघाला २०७ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. युवराजच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने ५ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य ४६ षटकांतच पूर्ण केले. ९ मार्च २०११ : झहीर खान, युवराज सिंग आणि पीयूष चावला यांनी अप्रतीम गोलंदाजी करून नेदरलँडची अवस्था ६ बाद १०८ धावा अशी केली, मात्र, दयनीय अवस्थेत कर्णधार पीटर बोरेन याने ३८ धावा चोपून संघाला १८९ धावांची मजल मारून दिली. हा सामनाही भारताने जिंकला.१२ मार्च २०११ : द. आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात सचिन तेंडुलकरने कारकिर्दीतले ९९वे शतक झळकावले. सचिनच्या शतकी खेळीला वीरेंद्र सेहवागची (६६ चेंडूंत ७३ धावा) साथ मिळाल्याने भारताने पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली. मात्र, डेल स्टेन (५-५०) आणि रॉबीन पीटरसन (२-५२) यांच्या स्पेलने भारताचा संपूर्ण डाव ४८.४ षटकांत २९६ धावांतच गडगडला. जॅक कॅलिस, हाशिम आमला आणि एबी डिव्हीलियर्स, डू-प्लेसिस, जोहान बोथा आणि रॉबीन पीटरसन यांनी तडाखेबाज खेळी करून भारताला पराभवाची चव चाखवली.२० मार्च २०११ : युवीने १२३ चेंडूंत ११३ धावा चोपून विराट कोहलीसह (५९) तिसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी करून संघाला २६८ धावांची मजल मारून दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा डाव १८८ धावांवरच कोसळला. २४ मार्च २०११ : उपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीत आॅस्ट्रेलिया संघाचे आव्हान होते. आऊट आॅफ फॉर्म असलेल्या रिकी पाँटिंगला नेमका याच लढतीत सूर गवसला आणि त्याच्या १०४ धावांच्या खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने २६१ धावांचे लक्ष्य उभे केले. हे लक्ष्य ४८व्या षटकांतच पूर्ण करीत भारताने आॅस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडले. ३० मार्च २०११ : मोहालीचे स्टेडियम खचाखच भरले होते... या हाय व्होल्टेज सामन्यात इतिहासाचा दाखला देत भारत बाजी मारणार हे निश्चित मानले जात होते. झालेही तसेच, परंतु पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे ही लढत भारताच्या पारड्यात पडली. सचिन तेंडुलकरला जवळपास पाच जीवदान देऊन पाकने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. सचिनने ११५ चेंडूंत ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला ९ बाद २६० धावांची मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकने चांगली सुरुवात केली खरी; परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. कर्णधार मिसबाह उल हकने ७६ चेंडूंत ५६ धावा करून एकाकी झुंज दिली. मात्र, संथ खेळीमुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. पाकला हा सामना २९ धावांनी गमवावा लागला. २ एप्रिल २०११ : हा दिवस भारतीय इतिहासातील न विसरणारा दिवस ठरला आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी लॉर्डच्या त्या बाल्कनीत संघसहकाऱ्यांसोबत विश्वचषक उंचावला होता. त्याच क्षणाची पुनरावृत्ती महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११मध्ये केली. प्रत्येक क्षणाला ज्याने भारताला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न पाहिले अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी हा अविस्मरणीय क्षण होता. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा यांनी संघाला मजबुती मिळवून दिली. त्यांच्या या पायावर माहेला जयवर्धने याने १०३ धावांची भक्कम इमारत उभी केली आणि संघाला २७५ धावांचा पल्ला उभा करून दिला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सचिन तेंडुलकरला घरच्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ‘सचिन... सचिन’ या जयघोषाने स्टेडियम दुमदुमले. मात्र, सातव्याच षटकांत स्टेडियम निशब्द झाले. लसिथ मलिंगाने सचिनला बाद करून भारताला धक्का दिला. २००३ नंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्याची चालून आलेली संधी हुकते की काय असे चित्र चटकन डोळ््यांसमोर उभे राहिले. मात्र, गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या पक्क्या निर्धाराने भारताला पुन्हा विजयी ट्रॅकवर आणले. ३५ धावांवर विराट माघारी परतल्यानंतर स्टार युवी उतरेल असे वाटत असताना महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला. अचानक फलंदाजीचा क्रम बदलल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले तरी, विजय आपलाच हा निर्धार या निर्णयाने पक्का झाला होता. धोनीने ४९व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर खणखणीत षट्कार खेचून भारताला विश्वजेतेपदाचा मान मिळवून दिला. धोनीचा तो षट्कार प्रेक्षकांमध्ये जाताच फटाक्यांची आतषबाजी झाली आणि युवीने गुरू सचिनला अनमोल गुरुदक्षिणाच दिली. सोनेरी स्वप्नाची पुनरावृत्ती झाली.