शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ द्या

By admin | Updated: June 8, 2017 04:16 IST

मेजर ध्यानचंद यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याचा आग्रह केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राद्वारे केला आहे

नवी दिल्ली : भारतीय हॉकीचे महान सुपुत्र मेजर ध्यानचंद यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याचा आग्रह केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राद्वारे केला आहे. या महान खेळाडूला सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्याचे मंत्रालयाचे हे नवे प्रयत्न आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याची माहिती क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली. ते म्हणाले, ‘ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्याची विनंती आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे केली आहे. त्यांना मरणोपरांत हा सन्मान देणे हीच त्यांच्या कर्तत्वाला खरी श्रद्धांजली ठरेल.’ १९२८, १९३२ आणि १९३६ असे ओळीने आॅलिम्पिक हॉकी सुवर्ण मिळवून देणाऱ्या ध्यानचंद यांना हा सन्मान देण्याची क्रीडा मंत्रालयाद्वारे मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१३ मध्ये यूपीए सरकारने ध्यानचंद यांच्याऐवजी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ने सन्मानित केले होते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच काही तासातच भारतरत्न मिळविणारा सचिन पहिला खेळाडू ठरणार असल्याची त्यावेळी घोषणा करण्यात आली होती.ध्यानचंद यांना तेंडुलकरपूर्वी हा सन्मान मिळायला हवा होता असे वाटत नाही काय, या प्रश्नाच्या उत्तरात गोयल म्हणाले, ‘मी या वादात पडू इच्छित नाही. महान खेळाडूंबाबत वक्तव्य करणे योग्य नाही. कुठल्याही पुरस्कारापेक्षा ध्यानचंद मोठे आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची तुलना पुरस्कारांशी होऊ शकणार नाही.’ मी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली आहे. अंतिम निर्णय मोदी घेतील. भारत क्रीडा क्षेत्रात नवी ताकद म्हणून पुढे यावा, अशी इच्छा असल्याने विविध खेळांच्या विकासावर सरकार भर देत आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयाला विनंतीपत्र लिहिण्याचा निर्णय झाला, असे गोयल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार आणि अन्य माजी खेळाडूंनी सातत्याने ही मागणी लावून धरली आहे. माजी कर्णधार राहिलेले अशोक कुमार, अजितपालसिंग, जफर इक्बाल, दिलीप तिर्की यांच्यासह शंभर खेळाडूंनी ध्यानचंद यांच्याकडे डोळेझाक केल्याबद्दल उपोषणदेखील केले होते.याआधी २०११ मध्ये ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्याची लेखी मागणी ८२ खासदारांनी सरकारकडे केली, पण ती फेटाळण्यात आली होती.