शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ द्या

By admin | Updated: June 8, 2017 04:16 IST

मेजर ध्यानचंद यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याचा आग्रह केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राद्वारे केला आहे

नवी दिल्ली : भारतीय हॉकीचे महान सुपुत्र मेजर ध्यानचंद यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याचा आग्रह केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राद्वारे केला आहे. या महान खेळाडूला सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्याचे मंत्रालयाचे हे नवे प्रयत्न आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याची माहिती क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली. ते म्हणाले, ‘ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्याची विनंती आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे केली आहे. त्यांना मरणोपरांत हा सन्मान देणे हीच त्यांच्या कर्तत्वाला खरी श्रद्धांजली ठरेल.’ १९२८, १९३२ आणि १९३६ असे ओळीने आॅलिम्पिक हॉकी सुवर्ण मिळवून देणाऱ्या ध्यानचंद यांना हा सन्मान देण्याची क्रीडा मंत्रालयाद्वारे मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१३ मध्ये यूपीए सरकारने ध्यानचंद यांच्याऐवजी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ने सन्मानित केले होते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच काही तासातच भारतरत्न मिळविणारा सचिन पहिला खेळाडू ठरणार असल्याची त्यावेळी घोषणा करण्यात आली होती.ध्यानचंद यांना तेंडुलकरपूर्वी हा सन्मान मिळायला हवा होता असे वाटत नाही काय, या प्रश्नाच्या उत्तरात गोयल म्हणाले, ‘मी या वादात पडू इच्छित नाही. महान खेळाडूंबाबत वक्तव्य करणे योग्य नाही. कुठल्याही पुरस्कारापेक्षा ध्यानचंद मोठे आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची तुलना पुरस्कारांशी होऊ शकणार नाही.’ मी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली आहे. अंतिम निर्णय मोदी घेतील. भारत क्रीडा क्षेत्रात नवी ताकद म्हणून पुढे यावा, अशी इच्छा असल्याने विविध खेळांच्या विकासावर सरकार भर देत आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयाला विनंतीपत्र लिहिण्याचा निर्णय झाला, असे गोयल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार आणि अन्य माजी खेळाडूंनी सातत्याने ही मागणी लावून धरली आहे. माजी कर्णधार राहिलेले अशोक कुमार, अजितपालसिंग, जफर इक्बाल, दिलीप तिर्की यांच्यासह शंभर खेळाडूंनी ध्यानचंद यांच्याकडे डोळेझाक केल्याबद्दल उपोषणदेखील केले होते.याआधी २०११ मध्ये ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्याची लेखी मागणी ८२ खासदारांनी सरकारकडे केली, पण ती फेटाळण्यात आली होती.