शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गौरवच्या कारकिर्दीला मिळाली नवी उभारी, जागतिक स्पर्धेतील यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 02:11 IST

कंबरदुखी आणि सातत्याने थोडक्यात होणारे पराभव यामुळे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी गौरव बिधूडी याने आत्मविश्वास गमावला होता.

हॅम्बर्ग : कंबरदुखी आणि सातत्याने थोडक्यात होणारे पराभव यामुळे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी गौरव बिधूडी याने आत्मविश्वास गमावला होता. परंतु, आता यंदाच्या स्पर्धेत भारतासाठी एकमेव पदक निश्चित केल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला नवी उभारी मिळाली आहे. विशेष म्हणजे जुलै अखेरपर्यंत गौरवचा भारतीय संघात समावेश नव्हता. मात्र, आशियाई बॉक्सिंग संघटनेने त्याला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला. ही मिळालेली संधी साधताना गौरवने दिमाखदार कामगिरी केली.देशासाठी पदक निश्चित केल्यानंतर गौरवने म्हटले की, ‘जेव्हा मला वाईल्ड कार्ड मिळाल्याची माहिती मिळाली, तेव्हा मी प्रत्येक प्रशिक्षकाला याबाबत विचारत होतो. मी सर्वांना विचारत होतो आणि जेव्हा प्रत्येकाने ही खरी माहिती असल्याचे सांगितले तेव्हा मी नि:श्वास टाकला.गौरवने पुढे सांगितले की, ‘मी प्रत्येक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच हरलो. जागतिक स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक नकारात्मक विचार आले होते. पण, नंतर माझ्या मनात वेगळे विचार आले आणि मी हे चक्र तोडू शकतो असा विश्वास स्वत:ला दिला.’ त्याचप्रमाणे, ‘एका खेळाडूला आपल्या मनावर ताबा ठेवणे खूप कठीण असते. माझ्या डोक्यातही अनेक विचार येत होते,’ असेही गौरवने सांगितले.गौरव बिधूडीच्या आधी विजेंदर सिंग (२००९), विकास कृष्णन (२०११) आणि शिव थापा (२०१५) यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी कांस्य पटकावले आहे. गुरुवारी होणाºया लढतीत बाजी मारून या तिघांहून अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न गौरव करेल. ‘या कामगिरीमुळे याआधीच्या स्पर्धांमध्ये सातत्याने उपांत्यपूर्व फेरीत हरण्याचे दु:ख संपेल,’ असे गौरवने म्हटले.देशांतर्गत स्पर्धांमध्ये गौरव नेहमी चर्चाविषय ठरत असे. कारण, प्रत्येक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बाद होण्याचा त्याचा रेकॉर्ड आहे. तसेच, ताश्कंद आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी गमावली होती.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गौरव कांस्यपेक्षा अधिक वरचे पदक जिंकण्यात यशस्वी ठरला, तर अशी कामगिरी करणारा तो पहिला बॉक्सर ठरेल.