शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

gaurav-bidhuri_भारताची कामगिरी समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 03:24 IST

हॅम्बुर्ग : भारताने एकच कास्यपदक जिंकले असले तरी बॉक्सिंग प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी १९ व्या विश्व चॅम्पियनशिपदरम्यान काही सकारात्मक बाबी राहिल्या असून, त्यात चीनसारखा ‘पॉवर हाऊस’ देश देखील एकही पदक जिंकू शकला नाही, असे म्हटले आहे.गौरव बिधुडी (५६ किलो) याने देशासाठी एकमेव कास्यपदक जिंकले आहे. यासह तो विजेंदरसिंह (२००९), विकास ...

हॅम्बुर्ग : भारताने एकच कास्यपदक जिंकले असले तरी बॉक्सिंग प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी १९ व्या विश्व चॅम्पियनशिपदरम्यान काही सकारात्मक बाबी राहिल्या असून, त्यात चीनसारखा ‘पॉवर हाऊस’ देश देखील एकही पदक जिंकू शकला नाही, असे म्हटले आहे.गौरव बिधुडी (५६ किलो) याने देशासाठी एकमेव कास्यपदक जिंकले आहे. यासह तो विजेंदरसिंह (२००९), विकास कृष्ण (२०११) आणि शिव थापा (२०१५) या विश्व स्पर्धेत पदक जिंकणाºयांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. प्रगतीच्या दृष्टिकोनातून भारताचे तीन मुष्टियोद्ध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आणि त्यानुसार भारत रशिया आणि युक्रेनच्या बरोबरीने राहिला. एवढेच नव्हे तर भारत बॉक्सिंगमध्ये दिग्गज असलेले इंग्लंड आयर्लंड, दक्षिण कोरिया व मंगोलियाच्या बरोबरीत राहिला. या देशाचेही एकच खेळाडू उपांत्य फेरी गाठू शकले.नीवा पुढे म्हणाले, ‘काही प्रमाणात मी समाधानी आहे. आम्ही स्पर्धेसाठी काही व्यूहरचना आखली होती, त्यापैकी काहींची अंमलबजावणी झाली. आता आम्हाला जी व्यूहरचना आखली जाईल ती पूर्णपणे कार्यान्वित करण्याविषयी निश्चित प्रयत्न करावे लागेल. आम्हाला एक पदक मिळाले आणि आम्ही आणखी जिंकू इच्छित होतो; परंतु चीनसारखे बलाढ्य संघ एकही पदक जिंकू शकले नाही. त्यामुळे भारताची कामगिरी खूप निराशाजनक झालेली नाही.’’नीवा यांनी एप्रिलमध्ये भारताच्या विदेशी प्रशिक्षकाची जबाबदारी पेलली होती आणि संघासोबत त्यांची ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. (वृत्तसंस्था)