शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रवी शास्त्रींच्या नावाला होता गांगुलीचा ठाम विरोध

By admin | Updated: July 13, 2017 00:44 IST

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अखेर रवी शास्त्री यांची सरशी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अखेर रवी शास्त्री यांची सरशी झाली; पण त्याआधीचे नाट्य फारच गमतीशीर होते. पहिल्यांदा शास्त्रींची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत बीसीसीआयने शास्त्रींच्या नियुक्तीच्या वृत्ताचे खंडन केले. सल्लागार समिती आणि बीसीसीआय निवडीवर अजूनही चर्चा करत असल्याचे कारण त्या वेळी देण्यात आले होते. त्यानंतर रात्री बीसीसीआयनेच रवी शास्त्री यांच्या नावाची पुन्हा एकदा अधिकृतरीत्या घोषणा केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी शास्त्रींची निवड ही सर्वानुमते झाली नसल्याचे तथ्य पुढे येत आहे. क्रिकेट सल्लागार समितीच्या बैठकीत सचिन तेंडुलकरने सर्वप्रथम शास्त्री यांच्या नावाला आपली पसंती देत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. सचिनने लक्ष्मणचे मत स्वत:कडे वळविण्यात यश मिळविले होते. सौरभ गांगुली मात्र रवी शास्त्रींऐवजी टॉम मुडी यांंच्याकडे प्रशिक्षकपद सोपविण्यास उत्सुक होता.वर्षभरापूर्वी झालेल्या निवड प्रक्रि येत सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात वाद झाले होते. बँकॉकमध्ये सुटीवर असताना शास्त्रींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षकपदाची मुलाखत देण्यास गांगुलीचा विरोध होता. गांगुलीच्या मते मोठी जबाबदारी स्वीकारताना शास्त्रींनी दाखवलेला अ‍ॅप्रोच योग्य नव्हता. त्यामुळे मागच्या वर्षी सल्लागार समितीने अनिल कुंबळेंना प्रशिक्षकपद दिले.वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद मुंबईत झालेल्या बैठकीत यंदा उमटले. रवी शास्त्रींकडे संघाची जबाबादारी द्यायला सौरव गांगुली यावेळीही तयार नव्हते. तथापि, बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांनी संपूर्ण संघाला शास्त्रीच प्रशिक्षक म्हणून हवे असल्याचे निदर्शनास आणून दिले. तरीही गांगुली शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब करायला तयार नव्हते. अखेर लक्षमणने पुढाकार घेत शास्त्रींच्या नावाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करताच गांगुलीचा विरोध मावळला.कर्णधार विराट कोहलीपुढे बीसीसीआय आणि सीएसीने लोटांगण घातले असा चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी टॉम मूडी व वीरेंद्र सेहवाग यांची नावे मीडियापुढे आणण्यात आली. यामुळे प्रशिक्षक म्हणून कोण बाजी मारणार, याबाबत संभ्रम वाढत गेला. अखेर रात्री उशिरा बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी अधिकृतपणे रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली.रवी शास्त्री यांच्याप्रमाणे गोलंदाजी प्रशिक्षक जहीर खान यांच्या नावावरही एकमत झाले नसल्याचे तथ्य बाहेर आले आहे. शास्त्रींना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून बी. अरु ण हवे होते, पण गांगुलीने विराटशी चर्चा करीत जहीर खान याच्या नावाला काही विरोध आहे का हे आधीच चाचपडून पाहिले होते. कोहलीने जहीर खानच्या नावाला आक्षेप नसल्याचे सांगताच गांगुलीने शास्त्री यांना तुम्ही पसंती देत असाल तर गोलंदाजी कोच जहीरला बनवा, असा हेका कायम ठेवला. गांगुलीचा सन्मान राखणे गरजेचे झाले आहे, असे ध्यानात येताच सचिन आणि लक्ष्मण यांनी जहीरचे नाव फायनल केले. शास्त्री आणि कोहली यांच्यावर अंकुश राखता यावा म्हणून बीसीसीआयने आणखी एक खेळी खेळली. परदेशातील विशेष दौऱ्यात राहुल द्रविड यांचा सल्ला घेणे अनिवार्य राहील, अशी ही यशस्वी खेळी खेळताना द्रविडकडे फलंदाजी सल्लागारपद सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.