शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

जड बॅटमुळे खेळाचे तंत्र बदलले

By admin | Updated: December 16, 2015 03:33 IST

भारतामध्ये शालेय स्तरावर क्रिकेट खेळणाऱ्यांची कमतरता नाही. पण त्यांच्यात संयमाची कमतरता जाणवते. अलीकडे जगभरातील फलंदाज जड बॅट वापरतात. त्यामुळे फलंदाजीतील

- शिवाजी गोरे ल्ल पुणे

भारतामध्ये शालेय स्तरावर क्रिकेट खेळणाऱ्यांची कमतरता नाही. पण त्यांच्यात संयमाची कमतरता जाणवते. अलीकडे जगभरातील फलंदाज जड बॅट वापरतात. त्यामुळे फलंदाजीतील तंत्रच बदलले आहे, असे निरीक्षण सिडनी विद्यापीठाचे क्रिकेट मार्गदर्शक डॉ. रेने फर्डिनान्स यांनी ‘लोकमत’कडे नोंदवले. रेने काही दिवसांसाठी पुण्यात क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर शालेय मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. ते म्हणाले, ‘‘भारतात मी आतापर्यंत मुंबई, दिल्ली, बंगळुरू या शहरांमध्ये गेलो आहे. तेथे मी जेव्हा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले, तेव्हा लक्षात आले, की खेळाडूंमध्ये गुणवत्ता खूप आहे. पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. पालकांना हे लक्षात येत नाही, की आपण आपल्या पाल्याला कोणत्या मार्गदर्शकाकडे पाठवावे. दुसरे, पालकांना त्यांच्या मुलाकडून लगेच रिझल्ट हवा असतो. आज तो खेळायला गेला, की काही महिन्यांत त्याने जिल्हा किंवा राज्याच्या संघाकडून खेळावे असे त्यांना वाटते. आज मैदानावर खेळायला गेल्यावर काही महिन्यांत आपण अव्वल क्रिकेटपटू झालो, असे युवा खेळाडूंना वाटते. यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो.’’सध्याच्या क्रिकेटमध्ये स्किल, टेक्निक आणि स्टॅमिना आवश्यक...सिडनी येथे क्रिकेटमध्ये बायोमेकॅनिक शास्त्रात पीएच. डी. केलेले रेने म्हणाले, ‘‘क्रिकेटमध्ये आता यशस्वी होण्यासाठी खेळाडूकडे स्किल, टेक्निक आणि स्टॅमिना हवा. त्यांच्याकडे संयमसुद्धा तेवढाच पाहिजे. खेळपट्टीवर असताना गोलंदाज कोणत्या प्रकारचा चेंडू टाकणार आहे, हे त्याच्या गोलंदाजी शैलीवरून ओळखण्याची कुवत फलंदाजाकडे असली पाहिजे; अन्यथा पूर्वी आपल्याविरुद्ध गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांची व्हिडिओ क्लिप त्याने पाहिलेली असणे आवश्यक आहे. पण, शालेयस्तरावर हे कोण पाहते? लहान वयातच क्रिकेटपटूंना हे सर्व मार्गदर्शकांनी सांगणे गरजेचे आहे. त्यांनी मुलाची कुवत पाहून त्याच्या अंगकाठीनुसार व्यायाम करवून घ्यायला हवा. जेणेकरून तो क्रिकेट वा अन्य खेळाचा सराव आनंदाने आणि आत्मीयतेने करेल. शालेय स्तरावर आवश्यक त्या बाबींचे ज्ञान मिळाल्यास खेळाडू वरिष्ठ गटात गेल्यावर ताण जाणवणार नाही.’’मार्गदर्शकाने स्वत: अपडेट असणे महत्त्वाचेशालेय स्तरावर मार्गदर्शक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्याच्या मार्गदर्शनाने क्रिकेटपटू घडत असतो. सरांचे माझ्याकडे लक्ष नाही, असे खेळाडूला कधीच वाटायला नको. मार्गदर्शकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण पुढील पिढी तयार करीत आहोत, हे मार्गदर्शकाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. त्याने क्रिकेटपटूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले पाहिजे. यासाठी मार्गदर्शकाने स्वत: अपडेट असणे, ही स्पर्धेच्या युगात काळाची गरज बनली असल्याचे फर्डिनान्स यांनी स्पष्ट केले.भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज ही जगातील एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. तिचे फलंदाजीचे तंत्र वाखाणण्याजोगे आहे. तिच्या फलंदाजीत काही तांत्रिक त्रुटी मला जाणवल्या. त्या सुधारण्यासाठी मी मार्गदर्शन केले. काही चुका या सराव करताना दुरूस्त होतील, तर काहींसाठी थोडा वेळ जावा लागेल. फलंदाजीतील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने नियमित सराव आवश्यक आहे. मितालीने या त्रुटी दूर केल्यास तिची फलंदाजी आणखी बहरेल. भारतीय संघातील निरंजना नागराजन हीसुद्धा चांगली वेगवान गोलंदाज आहे. - डॉ. रेने फर्डिनान्स