शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

छ. शिवाजी महाराजांमुळेच मी मजबूत आहे

By admin | Updated: July 26, 2016 21:28 IST

२०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर मला नोकरीत बढती देण्याबाबत अनेक आश्वासनं देण्यात आली. मात्र तेव्हापासून काहीच पावले उचलली गेली नाहीत

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ : २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर मला नोकरीत बढती देण्याबाबत अनेक आश्वासनं देण्यात आली. मात्र तेव्हापासून काहीच पावले उचलली गेली नाहीत. मला कोणी प्रायोजकही नसल्याने अनेकांनी मला बॉक्सिंग सोडण्याबाबत सल्ले दिले. मात्र मी त्यांचे ऐकले नाही. माझी नाळ ही मराठ्यांशी जोडली गेली आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी खूप प्रेरीत असल्यानेच मानसिकरीत्या मजबूत आणि जिद्दि आहे, असे वक्तव्य रिओ आॅलिम्पिकमध्ये ६४ किलोवजनी गटात भारताचे प्रतिनिधित्त्व करणारआ बॉक्सर मनोज कुमारने केले.

आॅलिम्पिकसाठी भारतीय संघातील सदस्य असलेला मनोज तब्बल सहा वर्षांपासून नोकरीतील बढतीच्या प्रतिक्षेत आहे. २०१० साली राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये तृतीय श्रेणीचा कर्मचारी असलेल्या मनोजला बढती देण्याबाबत आश्वासने देण्यात आली. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री ममता बॅनर्जी यांनी मनोजला आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे यानंतर सात मंत्र्यांनी हे पद सांभाळले, पण मनोजला मिळालेले आश्वासन पुर्ण झाले नाही.

नोकरीतील बढतीबाबत मी मुकुल राय यांच्यापासून विद्यमान मंत्री सुरेश प्रभू यांच्यापर्यंत सर्वांना पत्र लिहिले. प्रत्येकाने मला याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले, मात्र, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. शिवाय प्रायोजक मिळवण्यासाठी मी अनेक मोठमोठ्या कंपन्यांना पत्र लिहून कळवले. परंतु, त्यांना वाटले असेल की मी इतका पुढे जाऊ शकणार नाही. शिवाय माझ्याकडे माझ्याविषयी बोलणारे कोणीही नसल्याने ही गोष्टही माझ्याविरुध्दच गेली,ह्णह्ण अशी खंतही मनोजने यावेळी मांडली. यानंतरही बॉक्सिंग का सोडली नाही, यावर मनोज म्हणाला, ह्यह्यएक सेकंदपण मी असा विचार केला नाही. लोकांना चुकीचे ठरवण्यामध्ये खूप आनंद मिळतो. मी कोणाच्याही समर्थनाशिवाय आज यश मिळवले आहे. माझ्याकडे केवळ कोच आणि मोठा भाऊ राजेशची साथ आहे.