शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

चार दिवसांचा खेळ पाण्यात

By admin | Updated: November 19, 2015 04:49 IST

संततधार पावसामुळे मैदान निसरडे झाल्याने अखेरचे चार दिवस खेळच होऊ शकला नाही. अशा अवस्थेत बुधवारी भारत-द. आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णीत

बंगळुरू : संततधार पावसामुळे मैदान निसरडे झाल्याने अखेरचे चार दिवस खेळच होऊ शकला नाही. अशा अवस्थेत बुधवारी भारत-द. आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णीत संपविण्यात आला. चार सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने पुढे आहे. तिसरा सामना नागपुरात २५ नोव्हेंबरपासून खेळला जाईल.चार दिवसांत एकही चेंडू न पडणे ही भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. एका दशकाआधी चेन्नईत भारत-श्रीलंकादरम्यान झालेल्या कसोटीत तीन दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता. पाचव्या दिवशी सकाळी हलक्या सरी आल्या; पण रात्रभर झालेल्या पावसामुळे अखेरचा दिवसही पाण्यात जाणार हे निश्चित होते. मैदानावर ज्या ठिकाणी कव्हर नव्हते तेथे पाण्याचे डबके साचले होते. मैदान कर्मचाऱ्यांनी आपल्या पद्धतीने पाणी काढण्याची मेहनत केली. सुपर सोकर्सचा उपयोगदेखील करण्यात आला; पण क्षेत्ररक्षकांसाठी धोकादायक असल्याचे पंचांच्या लक्षात येताच सामना संपविण्याची घोषणा करण्यात आली. द. आफ्रिकेचा स्टार एबी डिव्हिलियर्स याचा हा शंभरावा सामना होता.गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली. द. आफ्रिकेला तीन सत्रांत बाद करणे फार कमी वेळा घडते. आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताच अनेकांना आश्चर्य वाटले. बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते; पण येथे गोलंदाजांनी कमाल केली. भक्कम स्थितीत असताना चार दिवस वाया गेल्याची निराशा आहे. शिखरचा फॉर्म परतला ही आणखी समाधान देणारी बाब. आम्ही काहीही बदल केला नाही. मोहालीत मिळालेल्या आत्मविश्वासामुळे बंगळुरू येथे पहिल्याच दिवशी चमकदार कामगिरी बजावली. संघ चांगल्या मूडमध्ये असल्याने पुढे व्यत्यय येणार नाही, या आशेसह नागपुरात कौशल्य पणाला लावून दिमाखदार विजय नोंदविणार आहोत.- विराट कोहली, कर्णधार भारत.चार दिवस क्रिकेट खेळू शकलो नाही याची निराशा आहे. हा सामना दोन्ही संघांकडे झुकू शकला असता. एबीने शतकी कसोटीत ८५ धावा केल्याचा आनंद झाला. त्याच्यासोबत या क्षणाचा आनंद लुटला; पण दुर्दैवाने आमची फलंदाजी ढेपाळली. जितका वेळ होता तो पाहता हा सामना बरोबरीचा होता, असे म्हणावे लागेल.- हशिम अमला, कर्णधार, द. आफ्रिका.