शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

चार दिवसांचा खेळ पाण्यात

By admin | Updated: November 19, 2015 04:49 IST

संततधार पावसामुळे मैदान निसरडे झाल्याने अखेरचे चार दिवस खेळच होऊ शकला नाही. अशा अवस्थेत बुधवारी भारत-द. आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णीत

बंगळुरू : संततधार पावसामुळे मैदान निसरडे झाल्याने अखेरचे चार दिवस खेळच होऊ शकला नाही. अशा अवस्थेत बुधवारी भारत-द. आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णीत संपविण्यात आला. चार सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने पुढे आहे. तिसरा सामना नागपुरात २५ नोव्हेंबरपासून खेळला जाईल.चार दिवसांत एकही चेंडू न पडणे ही भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. एका दशकाआधी चेन्नईत भारत-श्रीलंकादरम्यान झालेल्या कसोटीत तीन दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता. पाचव्या दिवशी सकाळी हलक्या सरी आल्या; पण रात्रभर झालेल्या पावसामुळे अखेरचा दिवसही पाण्यात जाणार हे निश्चित होते. मैदानावर ज्या ठिकाणी कव्हर नव्हते तेथे पाण्याचे डबके साचले होते. मैदान कर्मचाऱ्यांनी आपल्या पद्धतीने पाणी काढण्याची मेहनत केली. सुपर सोकर्सचा उपयोगदेखील करण्यात आला; पण क्षेत्ररक्षकांसाठी धोकादायक असल्याचे पंचांच्या लक्षात येताच सामना संपविण्याची घोषणा करण्यात आली. द. आफ्रिकेचा स्टार एबी डिव्हिलियर्स याचा हा शंभरावा सामना होता.गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली. द. आफ्रिकेला तीन सत्रांत बाद करणे फार कमी वेळा घडते. आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताच अनेकांना आश्चर्य वाटले. बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते; पण येथे गोलंदाजांनी कमाल केली. भक्कम स्थितीत असताना चार दिवस वाया गेल्याची निराशा आहे. शिखरचा फॉर्म परतला ही आणखी समाधान देणारी बाब. आम्ही काहीही बदल केला नाही. मोहालीत मिळालेल्या आत्मविश्वासामुळे बंगळुरू येथे पहिल्याच दिवशी चमकदार कामगिरी बजावली. संघ चांगल्या मूडमध्ये असल्याने पुढे व्यत्यय येणार नाही, या आशेसह नागपुरात कौशल्य पणाला लावून दिमाखदार विजय नोंदविणार आहोत.- विराट कोहली, कर्णधार भारत.चार दिवस क्रिकेट खेळू शकलो नाही याची निराशा आहे. हा सामना दोन्ही संघांकडे झुकू शकला असता. एबीने शतकी कसोटीत ८५ धावा केल्याचा आनंद झाला. त्याच्यासोबत या क्षणाचा आनंद लुटला; पण दुर्दैवाने आमची फलंदाजी ढेपाळली. जितका वेळ होता तो पाहता हा सामना बरोबरीचा होता, असे म्हणावे लागेल.- हशिम अमला, कर्णधार, द. आफ्रिका.