शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

फ्लायवेट विरुद्ध हेविवेट

By admin | Updated: June 6, 2017 05:04 IST

चॅम्पियन्स चषकातील भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी खूपच उत्सुकता निर्माण केली गेली

- अयाझ मेमन चॅम्पियन्स चषकातील भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी खूपच उत्सुकता निर्माण केली गेली होती. दोन्ही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. दोन्हींच्या लढतींचा इतिहास मोठा आहे. आकडेवारी रंजक आहे. त्यामुळे हा सामनाही मोठ्या ईर्ष्येने खेळला जाणार असे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात सामना खूपच एकतर्फी झाला, पण हे अनपेक्षित नव्हते. यापूर्वीही मी म्हटले होते की, दोन्ही संघांत अंतर खूपच मोठे आहे. गुणवत्ता असो किंवा अलीकडील काळातील कामगिरी असो, दोन्ही संघांत कोणतीच तुलना होऊ शकत नव्हती. भारत खूपच बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो, तर पाकिस्तान त्यामानाने खूपच दुबळा संघ भासतो. रविवारच्या सामन्यातून हेच सिद्ध झाले. खूपच एकतर्फी लढत झाली. जर बॉक्सिंगच्या भाषेत सांगायचे झाल्यास फ्लायवेट विरुद्ध हेविवेट अशी ही लढत झाली. या सामन्यात कोण जिंकणार हा प्रश्नच कधी पडला नाही. प्रश्न असा पडला की, भारत किती अंतराने जिंकणार? एकदिवसीय सामन्यात १२४ धावांचे अंतर खूप मोठे मानले जाते. आतापर्यंतची एकूण आकडेवारी पाहिली तर पाकिस्तानची सरशी दिसते; परंतु अलीकडील काळातील आकडेवारी संपूर्ण त्यांच्या विरोधात दिसून येईल. भारताविरुद्ध आम्ही त्वेषाने लढून जिंकू ही पाकिस्तानी संघाची धारणा आता बदलण्याची वेळ आली आहे. कारण तुमच्याकडे जिंकण्यासाठी गुणवत्ता नाही, जोशपूर्ण उगवते युवा खेळाडू असले पाहिजेत, त्याचप्रमाणे संघात अनुभवी खेळाडूंही पाहिजेत. एकूणच संघ सर्वच पातळीवर परिपूर्ण असला पाहिजे. केवळ उन्माद दाखवून सामना जिंकता येत नाही. पाकिस्तान संघाचा दर्जा सध्या खालावला आहे. त्यांनी कमजोर कामगिरी केली असली तरी भारतीय संघाला विजयाचे श्रेय दिलेच पाहिजे. सामन्यापूर्वी भारतीय संघाबाबत अनेक प्रश्न उठवण्यात आले होते, जे ‘आयपीएल’मधील कामगिरीवर आधारित होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे भारतीय संघाने आपल्या कामगिरीने दिली आहेत. भारताची सलामी जोडी चालेल का? रोहित शर्माचा फॉर्म आहे का? युवराजची निवड का केली? त्याला खेळवणार का? खेळवणार असतील तर का खेळवणार? असे प्रश्न संघाच्या फलंदाजीसंदर्भात उठले होते. त्या सर्वांची चोख उत्तरे मिळाली. रोहित शर्माने सुंदर खेळी केली. शिखर धवनसोबत त्याने चांगली पायाभरणी केली. त्यामुळे पुढील फलंदाजांना मनसोक्त फलंदाजी करता आली. युवराज सिंगनेही जबरदस्त खेळी केली. विराट-रोहित खेळत असताना भारताची धावगती एकदम कमी झाली होती. पाकिस्तानी गोलंदाजांनी आपला फास आवळण्यास सुरुवात केली होती. याचवेळी युवराजने आपल्या अनुभवाचा फायदा घेत पाकिस्तानी गोलंदाजीवर घणाघात केला. तेथून सामना भारताच्या बाजूने वळला तो कायमचाच. म्हणूनच त्याला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आला. तो आणि विराट सुरुवातीला काहीवेळ चाचपडत आहेत असे वाटले; परंतु नंतर त्यांनी जी फलंदाजी केली, त्याला तोड नाही. हार्दिक पांड्याने युवा खेळाडूंमधील टॅलेंट दाखवून देताना फिनिशिंग कसे असावे याचा परिपाठ घालून दिला. धोनी, जडेजा, केदार यांना फलंदाजी करण्याची वेळ आलीच नाही. यातून भारतीय फलंदाजी किती मजबूत आहे हे सिद्ध झाले.गोलंदाजीतही जडेजा, भुवनेश्वर, उमेश, बुमराह यांनी आपआपल्या परीने योगदान दिले. जडेजाचे कौतुक करायला हवे. कारण त्याने गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणात आपली चमक दाखवून दिलीे. एकूणच सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळाला. जाता-जाता एक इशारा : विजयाची हवा डोक्यात जाऊ देता कामा नये. कारण आता फक्त एकच सामना जिंकलाय. अजून स्पर्धा जिंकलेली नाही. आता एक पाऊल टाकले आहे. पुढची वाटचाल आणखी दमदारपणे करायची आहे.( लेखक संपादकीय सल्लागार आहेत)