शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आयपीएलच्या अंतिम टप्प्यात चुरस वाढणार

By admin | Updated: May 9, 2017 08:39 IST

आयपीएलचे दहावे पर्व आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. स्पर्धेतील प्लेआॅफचे संघ कोणते असतील, हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे.

आयपीएलचे दहावे पर्व आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. स्पर्धेतील प्लेआॅफचे संघ कोणते असतील, हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. प्लेआॅफचे स्वप्न दृष्टिक्षेपाच्या पलीकडे गेलेल्या गुजरातने रविवारी पंजाबला हरवून त्यांची वाट खडतर केली. आता पंजाबला उर्वरीत सामने जिंकावे लागतील. माझ्या मते, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या तीन संघांचे प्लेआॅफमध्ये पोहोचणे नक्की आहे, चौथ्या क्रमांकावर उरलेल्या संघांपैकी हैदराबादला चांगली संधी आहे. आता या चार संघांचा टॉप टूमध्ये येण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण टॉप टू संघाला फायनलमध्ये पोहोचण्याच्या दोन संधी मिळतात. गुणतालिकेतील अव्वल संघांच्या कामगिरीकडे पाहिल्यास त्यांनी खडतर परिश्रम केल्यामुळेच ते तेथे पोहोचले असल्याचे लक्षात येते. त्यांची वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी चांगली आहे, संघात एकजुटीची भावना रुजली आहे. बेन स्टोक्स आणि इम्रान ताहिर हे दोन खेळाडू शेवटच्या टप्प्यात परत जाणार असल्यामुळे पुणेसारख्या संघांना थोडासा त्रास होऊ शकतो. त्यांची कमतरता भरून काढण्याचे आव्हान संघव्यवस्थापनापुढे असू शकते. शिवाय त्यांचे चाहतेही त्यांना मिस करतील.कामगिरीचा विचार करता या वेळी सर्वात निराशाजनक कामगिरी केली आहे ती रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. संघातील खेळाडूंच्या नामावलीवर नजर टाकली, की अनेक महान खेळाडूंची नावे त्यात दिसतात, पण विराट कोहली, ख्रिस गेल, ए. बी. डिव्हीलियर्स या दिग्गज खेळाडूंपैकी एक जणही चालू शकला नाही. गोलंदाजीतही निराशाच झाली. बँगलोरने ज्याप्रमाणे एकापाठोपाठ एक सामने हरले ते पाहता, केवळ स्टार खेळाडू संघात असले तर ते सामने जिंकून देतील, याची खात्री देता येत नाही. बँगलोरच्या फलंदाजीला कोणते दुखणे लागले आहे, हे समजून आले नाही, पण त्यामुळे गेल्यावर्षीचा उपविजेता असलेला संघ यंदा तळाच्या स्थानावर आहे. बँगलोरबरोबच दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही थोड्याफार प्रमाणात निराशा केली आहे. एका सामन्यात त्यांच्या ऋषभ पंत, संजू सॅमसन यांच्यासारख्या युवा खेळाडूंची कामगिरी पाहिली तर हा संघ चॅम्पियन असल्यासारखा भासतो, पण पुढच्याच सामन्यात हा संघ शंभरच्या आत गारद होतो. कामगिरीतील असातत्य हे त्यांच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणावे लागेल. सातत्याचा विचार केल्यास मुंबई आणि केकेआर या संघाने ते टिकवून ठेवले आहे, असेच म्हणावे लागेल. केकेआरने केलेला प्रायोगिक जुगार प्रचंड यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. सुनील नरेनला सलामीला पाठवण्याची त्यांची कल्पना भन्नाट यशस्वी झाल्याचे दिसते. आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम नरेनने केला आहे. मुंबई इंडियन्स संघाने जबरदस्त सांघिक कामगिरी करून अव्वल स्थानापर्यंत मुसंडी मारली आहे. अनेक अवघड सामने त्यांनी लिलया जिंकले आहेतच शिवाय अटीतटीच्या लढतीत मुंबई संघ ज्याप्रमाणे खेळतो आणि जिंकतो ते निश्चितच कौतुकास्पद आहे. पुणे आणि हैदराबादने आपल्या होमग्राऊंडवर चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या मैदानात ते अपयशी ठरल्याचे दिसतात.