शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती - अर्जुन रणतुंगा

By admin | Updated: July 14, 2017 17:30 IST

श्रीलंकेचे दोन महान क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा आणि कुमार संगकारा यांच्यात सध्या शाब्दीक लढाई जुंपली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

कोलंबो, दि. 14 - श्रीलंकेचे दोन महान क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा आणि कुमार संगकारा यांच्यात सध्या शाब्दीक लढाई जुंपली असून, दोघांनी क्रिकेटप्रेमींच्या मनात संशय निर्माण होतील असे गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. 2011 वर्ल्डकपचा  भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला अंतिम सामना फिक्स होता. या मॅचची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अर्जुन रणतुंगा यांनी केली आहे.  53 वर्षीय रणतुंगा सध्या श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री आहेत. 
 
त्याचवेळी कुमार संगकाराने 2009 चा श्रीलंका संघाचा पाकिस्तान दौरा कोणाच्या सांगण्यावरुन ठरवण्यात आला होता त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 2009 सालच्या पाकिस्तान दौ-यात श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सकाळच्या समयी खेळाडू बसने स्टेडियमकडे निघाले असताना दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये सहा पाकिस्तान पोलीस ठार झाले तर, काही खेळाडू जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर कुठल्याही देशाने पाकिस्तानचा दौरा केला नाही. 
 
आणखी वाचा 
बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी
ख्रिस गेलनं भारतात खरेदी केली कंपनी
सचिन, सौरव आणि लक्ष्मण कोच निवडीच्या लायकीचे नाहीत - संदीप पाटील
 
त्याचवेळी रणतुंगा यांनी भारत-श्रीलंकेमधला 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला आहे. या सामन्याच्यावेळी मी समालोचकांच्या पॅनलमध्ये होतो. श्रीलंकेच्या कामगिरीने मला खूपच निराश केले होते. त्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी या फायनल मॅचच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून चौकशी केली पाहिजे असे रणतुंगा म्हणाले. 
 
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कुमार संगकाराच्या नेतृत्वाखाली खेळणा-या  श्रीलंकेच्या संघाने  अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. महेला जयवर्धनेच्या नाबाद (103) धावांच्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताला विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य दिले. गौतम गंभीरच्या (97) आणि महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद (91) धावांच्या बळावर भारताने हे लक्ष्य सहज पार केले.