शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!

By admin | Updated: March 14, 2016 00:04 IST

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.
आदिवासी एकता परिषदेच्या वतीने रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानात राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सुभाष नाईक होते. तर आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.महेश मोरे, जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, महानगराध्यक्ष करण सोनवणे, कार्याध्यक्ष आत्माराम पवार, सचिव डोंगर बागुल, आदिवासी तडवी भिल्ल मंचचे उपाध्यक्ष इब्राहीम तडवी, उत्तम निकम, जिल्हा सचिव जया सोनवणे, धनसिंग ठाकरे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमित तडवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून परिषदेचे उद्घाटन झाले. त्यानंतर सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जया सोनवणे यांनी केले.
या विषयांवर झाले परिषदेत मंथन
आदिवासी बांधवांकडून बेकायदेशीररीत्या हस्तांतरीत केलेल्या जमिनी त्यांना सन्मानपूर्वक परत करण्यात याव्यात, आदिवासी व वनविभाग क्षेत्रासह गैर आदिवासी क्षेत्रातील धरण व जलाशयांचे अधिकार आदिवासींना देण्यात यावेत, शेतीच्या उद्देशाने आदिवासींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, २४ डिसेंबर १९९६ रोजी भुरिया समितीने केलेल्या पेसा संदर्भातील शिफारसींमध्ये कोणताही बदल न करता त्या त्वरित लागू कराव्यात, प्रत्येक भूमिहीन आदिवासीला किमान ५ एकर जमीन द्यावी, अशा विषयांवर परिषदेत मंथन झाले.
आदिवासी संस्कृती सर्वश्रेष्ठ : वाहरू सोनवणे
आदिवासी संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. या प्राचीन संस्कृतीवर गैर आदिवासींकडून अतिक्रमण केले जात आहे. हे अतिक्रमण आपल्याला रोखायचे आहे. गैर आदिवासींमुळे खर्‍या आदिवासींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. आदिवासींना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हे स्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत वाहरू सोनवणे यांनी व्यक्त केले.