शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!

By admin | Updated: March 14, 2016 00:04 IST

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.
आदिवासी एकता परिषदेच्या वतीने रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानात राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सुभाष नाईक होते. तर आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.महेश मोरे, जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, महानगराध्यक्ष करण सोनवणे, कार्याध्यक्ष आत्माराम पवार, सचिव डोंगर बागुल, आदिवासी तडवी भिल्ल मंचचे उपाध्यक्ष इब्राहीम तडवी, उत्तम निकम, जिल्हा सचिव जया सोनवणे, धनसिंग ठाकरे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमित तडवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून परिषदेचे उद्घाटन झाले. त्यानंतर सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जया सोनवणे यांनी केले.
या विषयांवर झाले परिषदेत मंथन
आदिवासी बांधवांकडून बेकायदेशीररीत्या हस्तांतरीत केलेल्या जमिनी त्यांना सन्मानपूर्वक परत करण्यात याव्यात, आदिवासी व वनविभाग क्षेत्रासह गैर आदिवासी क्षेत्रातील धरण व जलाशयांचे अधिकार आदिवासींना देण्यात यावेत, शेतीच्या उद्देशाने आदिवासींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, २४ डिसेंबर १९९६ रोजी भुरिया समितीने केलेल्या पेसा संदर्भातील शिफारसींमध्ये कोणताही बदल न करता त्या त्वरित लागू कराव्यात, प्रत्येक भूमिहीन आदिवासीला किमान ५ एकर जमीन द्यावी, अशा विषयांवर परिषदेत मंथन झाले.
आदिवासी संस्कृती सर्वश्रेष्ठ : वाहरू सोनवणे
आदिवासी संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. या प्राचीन संस्कृतीवर गैर आदिवासींकडून अतिक्रमण केले जात आहे. हे अतिक्रमण आपल्याला रोखायचे आहे. गैर आदिवासींमुळे खर्‍या आदिवासींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. आदिवासींना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हे स्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत वाहरू सोनवणे यांनी व्यक्त केले.