शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!

By admin | Updated: March 14, 2016 00:04 IST

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.
आदिवासी एकता परिषदेच्या वतीने रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानात राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सुभाष नाईक होते. तर आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.महेश मोरे, जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, महानगराध्यक्ष करण सोनवणे, कार्याध्यक्ष आत्माराम पवार, सचिव डोंगर बागुल, आदिवासी तडवी भिल्ल मंचचे उपाध्यक्ष इब्राहीम तडवी, उत्तम निकम, जिल्हा सचिव जया सोनवणे, धनसिंग ठाकरे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमित तडवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून परिषदेचे उद्घाटन झाले. त्यानंतर सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जया सोनवणे यांनी केले.
या विषयांवर झाले परिषदेत मंथन
आदिवासी बांधवांकडून बेकायदेशीररीत्या हस्तांतरीत केलेल्या जमिनी त्यांना सन्मानपूर्वक परत करण्यात याव्यात, आदिवासी व वनविभाग क्षेत्रासह गैर आदिवासी क्षेत्रातील धरण व जलाशयांचे अधिकार आदिवासींना देण्यात यावेत, शेतीच्या उद्देशाने आदिवासींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, २४ डिसेंबर १९९६ रोजी भुरिया समितीने केलेल्या पेसा संदर्भातील शिफारसींमध्ये कोणताही बदल न करता त्या त्वरित लागू कराव्यात, प्रत्येक भूमिहीन आदिवासीला किमान ५ एकर जमीन द्यावी, अशा विषयांवर परिषदेत मंथन झाले.
आदिवासी संस्कृती सर्वश्रेष्ठ : वाहरू सोनवणे
आदिवासी संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. या प्राचीन संस्कृतीवर गैर आदिवासींकडून अतिक्रमण केले जात आहे. हे अतिक्रमण आपल्याला रोखायचे आहे. गैर आदिवासींमुळे खर्‍या आदिवासींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. आदिवासींना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हे स्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत वाहरू सोनवणे यांनी व्यक्त केले.