शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
6
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
7
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
8
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
9
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
10
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
11
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
12
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
13
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
14
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
15
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
16
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
18
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
19
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
20
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

त्यावेळी पहिली कसोटी गमावल्यानंतरही भारताने जिंकली होती कसोटी मालिका

By admin | Updated: March 3, 2017 17:15 IST

मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने याआधी केलेला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला अनपेक्षितरित्या दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघासमोरही  मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. मात्र मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने याआधी  केलेला आहे. 
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने तीनवेळा पहिली कसोटी गमावल्यानंतरही कमबॅक करत कसोटी मालिका जिंकल्या आहॆत. 1972-73 साली इंग्लंडविरुद्ध, 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 साली श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने  केला होता.
त्यापैकी 1972-73 साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दिल्लीत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने  कोलकाता आणि चेन्नईत झालेल्या दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर चौथी आणि पाचवी कसोटी अनिर्णित राखत मालिका जिंकली. 
त्यानंतर 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत मुंबईतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र गांगुलीची आक्रमक कप्तानी आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या संस्मरणीय कामगिरीच्या जोरावर भारताने कोलकाता आणि चेन्नईतील सामने जिंकत ही मालिका 2-1 अशा फरकाने खिशात घातली होती. 
गेल्यावर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला गॉल येथील पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र  कोलंबोत झालेले पुढचे दोन्ही सामने जिंकून या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला होता.