शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

भारतापुढे बरोबरीचे आव्हान

By admin | Updated: January 15, 2016 02:25 IST

सलामीच्या लढतीत मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियाने बोध घेतलेला दिसतो. आज (शुक्रवारी) गाबा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या

ब्रिस्बेन : सलामीच्या लढतीत मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियाने बोध घेतलेला दिसतो. आज (शुक्रवारी) गाबा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून बरोबरी साधण्यासाठी आॅस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजीत सुधारणा करावीच लागेल. छोटीशी चूक घडली तरी सामन्यात परतणे कठीण होईल, याची जाणीव भारताला झाली असावी.विजयासाठी ३१० धावांचा पाठलाग करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताला ५ गड्यांनी नमवून मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. वाका मैदानावर भारतीय गोलंदाजी सपशेल ढेपाळली. आश्विन आणि जडेजा हे फिरकी गोलंदाज महागडे ठरले. ईशांत शर्मा फिट झाल्याने धोनी भुवनेश्वरऐवजी ईशांतला संधी देऊ शकतो. वाकाची खेळपट्टी अपेक्षेनुरूप मंद होती; पण गाबाच्या खेळपट्टीवर धोनी ४ वेगवान गोलंदाजांसह खेळू शकतो. पर्थमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर सरन याने लक्ष वेधले. त्याने ५६ धावांत ३ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून पुनरावृत्तीची अपेक्षा राहील. दुसरीकडे, भुवनेश्वर आणि यादव यांनी भरपूर धावा मोजल्या. भारतीय संघ स्मिथच्या खेळीमुळे धास्तावला आहे. त्याने १४९ धावा ठोकून विजय साकारला होता. गेल्या काही सामन्यांत त्याच्या नाबाद १६२, १३३, २८, १९२, १४, ११७, ४७, १०५, आणि १४९ अशी खेळी राहिली. पाच सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियावर सरशी साधायची असल्यास स्मिथला आवरण्याचे अवघड आव्हान भारतीय गोलंदाजांपुढे असेल. दुसरा शतकवीर जॉर्ज बेली हादेखील धोकादायक फलंदाज आहे. याशिवाय, फॉर्ममध्ये असलेला उस्मान ख्वाजा व मधल्या फळीसाठी अष्टपैलू जॉन हेस्टिंग्ज यांना पाचारण करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था) संघ यातून निवडणारभारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, गुरकिरत मान, रिषी धवन, आर. आश्विन, रवींद्र्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव व बरिंदर सरन.आॅस्ट्रेलिया : स्टीह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, अ‍ॅरोन फिंच, जॉर्ज बेली, जॉन हेस्टिंग्स, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉल्कनर, मॅथ्यू वेड, जोश हेजलवूड, जोएल पेरिस, स्कॉट बोलँड, शॉन मार्श व केन रिचर्डसन.मधल्या षटकांत विकेट घेणे शिकावे लागेल : रोहितब्रिस्बेन : पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतरही गोलंदाजांनी मधल्या टप्प्यातील खेळात गडी बाद करण्यात चुकारपणा केल्यामुळे पराभवाची वेळ आली. यातून बोध घेऊन आॅस्ट्रेलियावर विजय मिळविण्यासाठी मधल्या षटकांत गोलंदाजांनी यजमान फलंदाजांवर दडपण आणण्याची कला अवगत करावी, असे सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने म्हटले आहे.पर्थवर आम्ही ३००चा पल्ला गाठला ही सकारात्मक बाब होती; पण गोलंदाजांनी बचाव न केल्याने आॅस्ट्रेलियाला आवर घालण्यात अपयश आले, असे सांगून विजयासाठी मधल्या टप्प्यात बळी घेऊन दडपण निर्माण करण्याची संघाला गरज असल्याचे मत रोहितने व्यक्त केले.गाबा मैदानावरील खेळपट्टी सपाट असेल; पण वाकाच्या तुलनेत येथे चढाओढ राहील. ब्रिस्बेनमध्येदेखील धावांचा पाऊस पडण्याची शक्यता नाकाराता येत नाही. पहिल्या सामन्यात सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. येथे तसे घडणार नाही. आम्ही सामन्यागणिक डावपेच आखत असल्याने विजयासाठी खेळणार आहोत.- जेम्स फॉल्कनर, अष्टपैलू खेळाडू.सामन्याची वेळ सकाळी ८.५० पासून