शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

इंग्लंड संघ चांगला, पण भारत बलाढ्य

By admin | Updated: January 14, 2017 01:13 IST

इतक्या वर्षांच्या निरीक्षणानंतर मी हे सांगू शकतो की इंग्लंड संघाने काही नवे मार्ग शोधले आहेत. वन-डेत इंग्लंड संघ भक्कम आहे; पण भारत

हर्षा भोगले लिहितो...

इतक्या वर्षांच्या निरीक्षणानंतर मी हे सांगू शकतो की इंग्लंड संघाने काही नवे मार्ग शोधले आहेत. वन-डेत इंग्लंड संघ भक्कम आहे; पण भारत त्यांच्यापेक्षा वरचढ आहे. याआधीच्या तुलनेत सध्याचा इंग्लंड संघ सर्वोत्कृष्ट आहे यात शंका नाही. त्यांचे खेळाडू जुन्या क्रिकेटपटूंच्या तुलनेत अधिक स्थिरावलेले वाटतात. वन-डे आणि टी-२० या दोन्ही प्रकारांत दमदार ठरतील असेच खेळाडू पाहुण्या संघाने निवडले आहेत. २०१५च्या विश्वचषकात मी इंग्लिश खेळाडूंना पाहिले त्यावेळी असे वाटले की हे खेळाडू आधुनिक क्रिकेटच्या महामार्गावर जणू काही रिक्षा चालवीत आहेत. पण, त्या त्रासातही त्यांनी चांगले बीजारोपण केल्यामुळेच आजचा त्यांचा संघ अत्याधुनिक वाटत आहे. विविध खेळपट्ट्यांवर विविध वातावरणात इंग्लंडला येथे तगड्या भारताचे आव्हान लीलया पेलण्याची किमया साधावी लागणार आहे.इंग्लंड संघ वन-डे आणि टी-२० प्रकारात अशा संघाविरुद्ध खेळेल की ज्यांच्या डीएनएमध्येच मर्यादित षटकांचे क्रिकेट सामावले आहे. ज्या संघाकडे विराट आणि धोनी हे सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत. हे दोघेही गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकारात प्रभावी जाणवले. पण, ५० षटकांच्या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास दोघांच्याची कर्तृत्वाची पातळी एकसारखीच दिसते. माझ्या मते युवराजसिंग याच्या कामगिरीकडेदेखील अनेकांची नजर असेल. त्यामागे विविध कारणे आहेत. पण, माझी नजर मात्र महेंद्रसिंग धोनीवरच असेल. धोनीला कुठल्या स्थानावर खेळवावे यावरून काही वेळेसाठी मोठी चर्चा किंवा वादविवाद होऊ शकतो. पण, सर्वोत्तम फिनिशर असलेल्या धोनीला चौथ्या स्थानावर खेळविण्याची शिफारस अनेकजण करतील, अशी स्थिती आहे. धोनी जलद धाव घेण्यात तरबेज आहे. अझहरुद्दीन असाच खेळायचा. धोनी उत्कृष्ट फिनिशर असल्याने या मालिकेत तो हीच भूमिका वठवीत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. तो चौथ्या स्थानावर खेळायला आल्यास आणखी काही शतके देखील झळकवू शकतो. (पीएमजी/ईएसपी)