शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

इंग्लंड संघ चांगला, पण भारत बलाढ्य

By admin | Updated: January 14, 2017 01:13 IST

इतक्या वर्षांच्या निरीक्षणानंतर मी हे सांगू शकतो की इंग्लंड संघाने काही नवे मार्ग शोधले आहेत. वन-डेत इंग्लंड संघ भक्कम आहे; पण भारत

हर्षा भोगले लिहितो...

इतक्या वर्षांच्या निरीक्षणानंतर मी हे सांगू शकतो की इंग्लंड संघाने काही नवे मार्ग शोधले आहेत. वन-डेत इंग्लंड संघ भक्कम आहे; पण भारत त्यांच्यापेक्षा वरचढ आहे. याआधीच्या तुलनेत सध्याचा इंग्लंड संघ सर्वोत्कृष्ट आहे यात शंका नाही. त्यांचे खेळाडू जुन्या क्रिकेटपटूंच्या तुलनेत अधिक स्थिरावलेले वाटतात. वन-डे आणि टी-२० या दोन्ही प्रकारांत दमदार ठरतील असेच खेळाडू पाहुण्या संघाने निवडले आहेत. २०१५च्या विश्वचषकात मी इंग्लिश खेळाडूंना पाहिले त्यावेळी असे वाटले की हे खेळाडू आधुनिक क्रिकेटच्या महामार्गावर जणू काही रिक्षा चालवीत आहेत. पण, त्या त्रासातही त्यांनी चांगले बीजारोपण केल्यामुळेच आजचा त्यांचा संघ अत्याधुनिक वाटत आहे. विविध खेळपट्ट्यांवर विविध वातावरणात इंग्लंडला येथे तगड्या भारताचे आव्हान लीलया पेलण्याची किमया साधावी लागणार आहे.इंग्लंड संघ वन-डे आणि टी-२० प्रकारात अशा संघाविरुद्ध खेळेल की ज्यांच्या डीएनएमध्येच मर्यादित षटकांचे क्रिकेट सामावले आहे. ज्या संघाकडे विराट आणि धोनी हे सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत. हे दोघेही गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकारात प्रभावी जाणवले. पण, ५० षटकांच्या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास दोघांच्याची कर्तृत्वाची पातळी एकसारखीच दिसते. माझ्या मते युवराजसिंग याच्या कामगिरीकडेदेखील अनेकांची नजर असेल. त्यामागे विविध कारणे आहेत. पण, माझी नजर मात्र महेंद्रसिंग धोनीवरच असेल. धोनीला कुठल्या स्थानावर खेळवावे यावरून काही वेळेसाठी मोठी चर्चा किंवा वादविवाद होऊ शकतो. पण, सर्वोत्तम फिनिशर असलेल्या धोनीला चौथ्या स्थानावर खेळविण्याची शिफारस अनेकजण करतील, अशी स्थिती आहे. धोनी जलद धाव घेण्यात तरबेज आहे. अझहरुद्दीन असाच खेळायचा. धोनी उत्कृष्ट फिनिशर असल्याने या मालिकेत तो हीच भूमिका वठवीत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. तो चौथ्या स्थानावर खेळायला आल्यास आणखी काही शतके देखील झळकवू शकतो. (पीएमजी/ईएसपी)