शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

भारताचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: October 3, 2015 00:26 IST

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये १२ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाला यजमान चीनचे कडवे आव्हान पेलता आले नाही.

चांगशा (चीन) : आशियाई चॅम्पियनशिपमध्ये १२ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाला यजमान चीनचे कडवे आव्हान पेलता आले नाही. चीनने ही लढत १0४-५८ अशा मोठ्या फरकाने जिंकली.चीनने गुरुवारी झालेल्या या एकतर्फी लढतीत भारताला पराभूत करीत पुढील फेरीतील जागा पक्की केली. आता चीनची लढत इराण संघाविरुद्ध होईल, तर भारतीय संघ पाचव्या ते आठव्या स्थानासाठी कोरियाविरुद्ध दोन हात करील.१२ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आशियाई चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या टीम इंडियाला चारही सत्रात आपला खेळ उंचावता आला नाही. चीनने प्रारंभापासूनच वर्चस्व राखताना २७-१५, २९-१४, १९-११ आणि २९-१८ असा विजय मिळवला.सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांपर्यंत भारतीय संघ पुढे होता; परंतु त्यानंतर चीनने भारतीय खेळाडूंना डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. चीनचे नेतृत्व करणाऱ्या माजी एनबीए खेळाडू यी जियानलियान याने सर्वाधिक २१ गुण नोंदवले, तर भारताकडून कर्णधार विशेष भृगुवंशीने सर्वाधिक २२ गुण नोंदवले. या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक स्कोअरर ठरणारे अमज्योतसिंह आणि फॉरवर्ड यारविंदरसिंह यांनीदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले; परंतु ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. गतवर्षी फिबा एशियाकपमध्ये भारताने चीनला ६५-५८ असे नमवले होते; परंतु या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. भारताने त्यांच्या पहिल्या क्लासिफिकेशन सामन्यात कोरियावर विजय मिळवला, तर ते दुसऱ्या क्लासिफिकेशन सामन्यात कतार आणि लेबनॉन यांच्यातील विजयी संघाविरुद्ध पाचव्या व सहाव्या स्थानासाठी खेळतील. जर भारताने दुसरीही लढत जिंकली तर ते स्पर्धेतील सहावे स्थान प्राप्त करतील व त्यांची ही १९८९ नंतरची सर्वोत्तम कामगिरी ठरेल. (वृत्तसंस्था)