शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

दिवसअखेर श्रीलंकेच्या ६७ धावा, ३१९ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: August 31, 2015 18:09 IST

तिस-या कसोटी सामन्यात दिवसअखेर श्रीलंकेने १८.१ षटकात तीन बाद ६७ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर विजयासाठी ३१९ धावांचे आव्हान आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. ३१ - तिस-या कसोटी सामन्यात दिवसअखेर श्रीलंकेने १८.१ षटकात तीन बाद ६७ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर विजयासाठी ३१९ धावांचे आव्हान आहे. 

सुरुवातील श्रीलंकेची बिकट सुरुवात झाली. पहिल्या दहा षटकातच २६ धावांवर तीन बाद अशी स्थिती होती.  ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर उपुल थरंगा शून्यावर बाद झाल्याने श्रीलंकेला पहिला धक्का बसला. दिमुथ करुणारत्ने हा सुद्धा शून्यावर बाद झाला त्याला यादवने त्याला बाद केले. दिनेश चांदीमल हा १८ धावांवर झेलबाद झाला. कौशल सिल्वा (२४) आणि  अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज () खेऴत आहेत.  याआधी रोहित शर्मा (५०) व आर. अश्विन (५८) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर भारताचा दुसरा डाव २७४ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रसाद व प्रदीने प्रत्येकी ४ तर हेराने १ बळी टिपला. 

कोलंबोत सुरु असलेल्या तिस-या व निर्णायक कसोटीचा चौथ्या दिवसाचा खेळ लवकर सुरु झाला. ३ बाद २१ धावांवरुन पुढे खेळताना विराट कोहली व रोहित शर्मा ही जोडी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. भारताच्या ६४ धावा झाल्या असताना विराट कोहली झेलबाद झाला. श्रीलंकेचा गोलंदाज नुवान प्रदीपने कोहलीचा अडथळा दूर केला. कोहली २१ धावांवर बाद झाला. यानंतर रोहित शर्माने स्टुअर्ट बिन्नीच्या साथीने भारताला शंभर धावांचा पल्ला गाठून दिला. रोहित शर्माने अर्धशतक ठोकल्यानंतर भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र रोहित ५० धावांवर असताना धम्मिका प्रसादने त्याला बाद केले व भारताची अवस्था ५ बाद १३२ अशी झाली. त्यानंतर बिन्नी (४९),  नमन ओझा (३५), अमित मिश्रा (३९), उमेश यादव (४) आणि आर. अश्विन (५८) धावावर बाद झाले. इशांत शर्मा २ धावांवर नाबाद राहिला.

पहिल्या डावात भारताने ३१२ धावा केल्या असून श्रीलंकेचा पहिला डाव २०१ धावांवरच आटोपल्याने भारताला १११ धावांची आघाडी मिळाली होती. मात्र दुस-या डावात भारतीय फलंदाजी ढेपाळल्याने सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत - श्रीलंकेने १-१ अशी बरोबरी साधली आहे.