शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

दिवसअखेर श्रीलंकेच्या ६७ धावा, ३१९ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: August 31, 2015 18:09 IST

तिस-या कसोटी सामन्यात दिवसअखेर श्रीलंकेने १८.१ षटकात तीन बाद ६७ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर विजयासाठी ३१९ धावांचे आव्हान आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. ३१ - तिस-या कसोटी सामन्यात दिवसअखेर श्रीलंकेने १८.१ षटकात तीन बाद ६७ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर विजयासाठी ३१९ धावांचे आव्हान आहे. 

सुरुवातील श्रीलंकेची बिकट सुरुवात झाली. पहिल्या दहा षटकातच २६ धावांवर तीन बाद अशी स्थिती होती.  ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर उपुल थरंगा शून्यावर बाद झाल्याने श्रीलंकेला पहिला धक्का बसला. दिमुथ करुणारत्ने हा सुद्धा शून्यावर बाद झाला त्याला यादवने त्याला बाद केले. दिनेश चांदीमल हा १८ धावांवर झेलबाद झाला. कौशल सिल्वा (२४) आणि  अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज () खेऴत आहेत.  याआधी रोहित शर्मा (५०) व आर. अश्विन (५८) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर भारताचा दुसरा डाव २७४ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रसाद व प्रदीने प्रत्येकी ४ तर हेराने १ बळी टिपला. 

कोलंबोत सुरु असलेल्या तिस-या व निर्णायक कसोटीचा चौथ्या दिवसाचा खेळ लवकर सुरु झाला. ३ बाद २१ धावांवरुन पुढे खेळताना विराट कोहली व रोहित शर्मा ही जोडी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. भारताच्या ६४ धावा झाल्या असताना विराट कोहली झेलबाद झाला. श्रीलंकेचा गोलंदाज नुवान प्रदीपने कोहलीचा अडथळा दूर केला. कोहली २१ धावांवर बाद झाला. यानंतर रोहित शर्माने स्टुअर्ट बिन्नीच्या साथीने भारताला शंभर धावांचा पल्ला गाठून दिला. रोहित शर्माने अर्धशतक ठोकल्यानंतर भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र रोहित ५० धावांवर असताना धम्मिका प्रसादने त्याला बाद केले व भारताची अवस्था ५ बाद १३२ अशी झाली. त्यानंतर बिन्नी (४९),  नमन ओझा (३५), अमित मिश्रा (३९), उमेश यादव (४) आणि आर. अश्विन (५८) धावावर बाद झाले. इशांत शर्मा २ धावांवर नाबाद राहिला.

पहिल्या डावात भारताने ३१२ धावा केल्या असून श्रीलंकेचा पहिला डाव २०१ धावांवरच आटोपल्याने भारताला १११ धावांची आघाडी मिळाली होती. मात्र दुस-या डावात भारतीय फलंदाजी ढेपाळल्याने सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत - श्रीलंकेने १-१ अशी बरोबरी साधली आहे.