शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

राष्ट्रकुल स्पर्धेचा शेवट शानदार करायचा आहे - सीमा पूनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:42 IST

सीमा पुनिया ही डोपिंगमुळे चर्चेत राहिली आहे; परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंत ती पदकांची सर्वोत्तम दावेदार आहे आणि थाळीफेकमध्ये या स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीची शानदार अखेर करण्यास ती कटिबद्ध आहे.

नवी दिल्ली : सीमा पुनिया ही डोपिंगमुळे चर्चेत राहिली आहे; परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंत ती पदकांची सर्वोत्तम दावेदार आहे आणि थाळीफेकमध्ये या स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीची शानदार अखेर करण्यास ती कटिबद्ध आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सीमा ही भारताची सर्वात यशस्वी अ‍ॅथलिट म्हणून गणली जाते. तिने जेव्हा-जेव्हा या स्पर्धेत सहभाग घेतला तेव्हा तिने पदक जिंकले आहे. सीमाने सर्वात आधी मेलबर्न २00६ मध्ये सहभाग घेतला तेव्हा रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर तिने २0१0 आणि २0१४ मध्येदेखील पदकांची कमाई केली. आता ती ३४ वर्षांची आहे आणि असे असले तरी ती गोल्डकोस्टमध्ये होणाºया स्पर्धेत पदक जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे.सीमाने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत तीन आॅलिम्पिक (२0१४, २0१२ आणि २0१६), एक आशियाई स्पर्धा (२0१४) आणि तीन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत सहभाग नोंदवला आहे. तिचे लक्ष आता २0२0 च्या आॅलिम्पिककडेही लागून राहिले आहे.सीमा सध्या अमेरिकेत सराव करीत आहे. ती म्हणाली, ‘ही माझी चौथी राष्ट्रकुल स्पर्धा असेल आणि मी गोल्डकोस्टमध्ये पदक जिंकू शकते याचा मला पूर्ण विश्वास आहे. तथापि, पदकाचा रंग कोणता असेल हे मी सांगू शकत नाही. हा माझ्यासाठी प्रदीर्घ प्रवास आहे. २0२0 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकेल की नाही हे मला माहीत नाही; परंतु मी २0२0 आॅलिम्पिकपर्यंत खेळात असणार आहे. माझी कारकीर्द अद्याप संपलेली नाही.’(वृत्तसंस्था)२0२0 आॅलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीचा विश्वास..!हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील खेवडा येथे जन्म झालेल्या सीमा हिने ११ व्या वर्षीच अ‍ॅथलेटिक्समध्ये प्रवेश केला होता. तिने वयाच्या १७ व्या वर्षी विश्व ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये थाळीफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते; परंतु डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे तिचे हे पदक हिसकावून घेण्यात आले होते.’ सर्दी-खोकल्याच्या उपचारासाठी सीमाने स्युडोफेडरिन सेवन केले होते.तेव्हा आयएएएफच्या नियमानुसार तिला ताकीद देऊन सोडण्यात आले. आॅलिम्पिक २0१२ आणि २0१६ मध्ये ती पात्रता फेरीमध्येच बाद झाली. त्याची खंत तिच्या मनात आजही घर करून आहे. ती म्हणाली, ‘मला माझ्या कारकीर्दीविषयी विशेष खंत नाही; परंतु आॅलिम्पिकमधील अपयश हे मला अजूनही जिव्हारी लागले आहे. त्यामुळे मी २0२0 आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊन तेथे चांगली कामगिरी करू इच्छिते.’

टॅग्स :Sportsक्रीडा