शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

दरवर्षी एक हजार खेळाडूंना प्रत्येकी ५ लाखांची शिष्यवृत्ती, सुधारित ‘खेलो इंडिया’, २० विद्यापीठांना विशेष प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:53 IST

देशाच्या तरुण पिढीमध्ये खेळांची संस्कृती रुजावी आणि त्यातून विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे नाव गाजविणारे जिगरबाज खेळाडू तयार व्हावेत यासाठी पुढील दोन वर्षे सुधारित ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम राबविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यासाठी १७५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नवी दिल्ली : देशाच्या तरुण पिढीमध्ये खेळांची संस्कृती रुजावी आणि त्यातून विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे नाव गाजविणारे जिगरबाज खेळाडू तयार व्हावेत यासाठी पुढील दोन वर्षे सुधारित ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम राबविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यासाठी १७५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.देशपातळीवर ही शिष्यवृत्ती नव्या ‘खेलो इंडिया’चे वैशिष्ट्य असेल. त्यानुसार विविध क्रीडा प्रकारांतील एक हजार तरुण व प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून त्यांना सलग आठ वर्षे प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. मुलांमधील क्रीडा कौशल्य लहान वयातच हेरून दीर्घकालीन प्रशिक्षणाने गुणवान खेळाडू घडविण्याची अशी योजना देशात प्रथमच राबविली जात आहे. यातून जागतिक स्पर्धांसाठी मातब्बर खेळाडूंची पळी उपलब्ध होऊ शकेल, अशी सरकारला खात्री आहे.देशभरातील निवडक २० विद्यापीठांना ‘क्रीडा नैपुण्याची केंद्रे’ (स्पोर्टिंग एक्क्सलन्स हब) म्हणून विकसित करण्याचाही या कार्यक्रमात समावेश आहे. त्यामुळे गुणवान खेळाडूंना त्यांच्या क्रीडाप्रकारातील निपुणता प्राप्त करत असतानाच जोडीला औपचारिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे सुलभ होईल.या कार्यक्रमाद्वारे क्रीडा क्षेत्राच्या समग्र विकासाकडे लक्ष दिले जाईल. त्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, तरुणांमध्ये खेळांची आवड निर्माण करणे, प्रतिभावान खेळाडू हुडकून त्यांना प्रशिक्षण देणे, दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करणे व एकूणच खेळांची किफायतशीर अर्थव्यवस्था निर्माण करणे इत्यादींचा समावेश असेल. याच कार्यक्रमात १० ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘राष्ट्रीय तंदुरुस्ती मोहीम’ हाती घेतली जाईल. शरीराने धट्टीकट्टी व खेळांमध्ये रस घेणारी तरुण पिढी निर्माण करणे हा याचा हेतू आहे.कार्यक्रमाची इतर उद्दिष्टेलैंगिक व सामाजिक भेदाभेद न मानता समाजाच्या सर्व थरांना सामावून घेऊन खेळांव्दारे सामाजिक अभिसरण करणे.अशांत व मागासलेल्या भागांतील तरुणांना खेळांकडे आकर्षित करून त्यांना विघातक कारवायांपासून परावृत्त करणे.शाळा व कॉलेज पातळीपासूनच क्रीडास्पर्धांचा दर्जा उंचावणे.व्यक्ती, समाज व देशाच्या विकासाचे एक साधन म्हणून खेळांचा उपयोग करणे.