शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

द्विवेदी-चावला यांनी दमवले

By admin | Updated: November 10, 2015 02:03 IST

एकलव्य द्विवेदी आणि पीयूष चावला यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बलाढ्य मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफी

मुंबई : एकलव्य द्विवेदी आणि पीयूष चावला यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बलाढ्य मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५० धावांची मजल मारली. मुंबईने उभारलेल्या ६१० धावांचा पाठलाग करणारा उत्तर प्रदेश संघ २६० धावांनी पिछाडीवर असून, फॉलोआॅन टाळण्यासाठी त्यांना अजूनही १११ धावांची गरज आहे, तसेच एकूणच फलंदाजांचे वर्चस्व राहिलेला हा सामना अनिर्णितकडे झुकला असून, मंगळवारी मुंबईकर उत्तर प्रदेशवर फॉलोआॅन देण्याचा जोरदार प्रयत्न करतील.वानेखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशने बिनबाद ५१ या धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली. तन्मय श्रीवास्तव बलविंदर संधूच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्यानंतर हिमांशू असनोरा आणि उमंग शर्मा यांनी ९२ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. अर्धशतक झळकावल्यानंतर शर्मा लगेच धावबाद होऊन परतला. यानंतर आलेल्या कर्णधार सुरेश रैनावर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, अवघ्या ९ धावा काढून तो दाभोळकरचा शिकार ठरला. यानंतर असनोराही सर्वाधिक ९२ धावा काढून बाद झाला. यावेळी मुंबईकर वर्चस्व गाजवणार असे दिसत असताना, सरफराज खान या ‘माजी मुंबईकर’ने आपल्या जुन्या सहकाऱ्यांना चोप देण्यास सुरुवात केली. खेळपट्टी व प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या माहितीचा फायदा घेत, सरफराजने ४ चौकार व २ षटकार खेचत ५१ चेंडूत ४४ धाव फटकावल्या. अभिषेक नायरने त्याला पायचीत करुन मुंबईतील अडसर दूर केला. ५ बाद २४६ अशा अडचणीत असलेल्या उत्तर प्रदेशला मुंबईकर किती धावांत गुंडाळणार अशी उत्सुकता असताना द्विवेदी आणि चावला यांनी मुंबईकरांना यानंतर यश मिळवून दिले नाही.या दोघांनीही शानदार नाबाद अर्धशतकी खेळी करून सहाव्या विकेटसाठी नाबाद १०४ धावांची भागीदारी केली. द्विवेदी ८८ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ५० धावांवर, तर चावला ५५ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ५४ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे. मुंबईकडून अष्टपैलू अभिषेक नायरने ३७ धावांत २ बळी घेतले असून, विशाल दाभोळकर आणि बलविंदर संधू यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई (पहिला डाव) : १५३ षटकांत ९ बाद ६१० धावाउत्तर प्रदेश (पहिला डाव) : तन्मय श्रीवास्तव त्रि. गो. संधू ३७, हिमांशू असनोरा त्रि. गो. नायर ९२, उमंग शर्मा धावबाद (कुलकर्णी) ५३, सुरेश रैना यष्टिचित तरे गो. दाभोळकर ९, सरफराज खान पायचीत गो. नायर ४४, एकलव्य द्विवेदी खेळत आहे ५०, पीयूष चावला खेळत आहे ५४. अवांतर - ११. एकूण : ११७ षटकांत ५ बाद ३५० धावा.गोलंदाजी : विशाल दाभोळकर २६-६-१००-१, शार्दुल ठाकूर १७-३-५१-०; धवल कुलकर्णी १९-५-५५-०; बलविंदर संधू २४-७-५४-१; अभिषेक नायर १८-५-३७-२, रोहित शर्मा १३-३-४३-०