शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

द्विवेदी-चावला यांनी दमवले

By admin | Updated: November 10, 2015 02:03 IST

एकलव्य द्विवेदी आणि पीयूष चावला यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बलाढ्य मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफी

मुंबई : एकलव्य द्विवेदी आणि पीयूष चावला यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बलाढ्य मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५० धावांची मजल मारली. मुंबईने उभारलेल्या ६१० धावांचा पाठलाग करणारा उत्तर प्रदेश संघ २६० धावांनी पिछाडीवर असून, फॉलोआॅन टाळण्यासाठी त्यांना अजूनही १११ धावांची गरज आहे, तसेच एकूणच फलंदाजांचे वर्चस्व राहिलेला हा सामना अनिर्णितकडे झुकला असून, मंगळवारी मुंबईकर उत्तर प्रदेशवर फॉलोआॅन देण्याचा जोरदार प्रयत्न करतील.वानेखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशने बिनबाद ५१ या धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली. तन्मय श्रीवास्तव बलविंदर संधूच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्यानंतर हिमांशू असनोरा आणि उमंग शर्मा यांनी ९२ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. अर्धशतक झळकावल्यानंतर शर्मा लगेच धावबाद होऊन परतला. यानंतर आलेल्या कर्णधार सुरेश रैनावर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, अवघ्या ९ धावा काढून तो दाभोळकरचा शिकार ठरला. यानंतर असनोराही सर्वाधिक ९२ धावा काढून बाद झाला. यावेळी मुंबईकर वर्चस्व गाजवणार असे दिसत असताना, सरफराज खान या ‘माजी मुंबईकर’ने आपल्या जुन्या सहकाऱ्यांना चोप देण्यास सुरुवात केली. खेळपट्टी व प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या माहितीचा फायदा घेत, सरफराजने ४ चौकार व २ षटकार खेचत ५१ चेंडूत ४४ धाव फटकावल्या. अभिषेक नायरने त्याला पायचीत करुन मुंबईतील अडसर दूर केला. ५ बाद २४६ अशा अडचणीत असलेल्या उत्तर प्रदेशला मुंबईकर किती धावांत गुंडाळणार अशी उत्सुकता असताना द्विवेदी आणि चावला यांनी मुंबईकरांना यानंतर यश मिळवून दिले नाही.या दोघांनीही शानदार नाबाद अर्धशतकी खेळी करून सहाव्या विकेटसाठी नाबाद १०४ धावांची भागीदारी केली. द्विवेदी ८८ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ५० धावांवर, तर चावला ५५ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ५४ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे. मुंबईकडून अष्टपैलू अभिषेक नायरने ३७ धावांत २ बळी घेतले असून, विशाल दाभोळकर आणि बलविंदर संधू यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई (पहिला डाव) : १५३ षटकांत ९ बाद ६१० धावाउत्तर प्रदेश (पहिला डाव) : तन्मय श्रीवास्तव त्रि. गो. संधू ३७, हिमांशू असनोरा त्रि. गो. नायर ९२, उमंग शर्मा धावबाद (कुलकर्णी) ५३, सुरेश रैना यष्टिचित तरे गो. दाभोळकर ९, सरफराज खान पायचीत गो. नायर ४४, एकलव्य द्विवेदी खेळत आहे ५०, पीयूष चावला खेळत आहे ५४. अवांतर - ११. एकूण : ११७ षटकांत ५ बाद ३५० धावा.गोलंदाजी : विशाल दाभोळकर २६-६-१००-१, शार्दुल ठाकूर १७-३-५१-०; धवल कुलकर्णी १९-५-५५-०; बलविंदर संधू २४-७-५४-१; अभिषेक नायर १८-५-३७-२, रोहित शर्मा १३-३-४३-०