शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

अर्जुन पुरस्कारातून डावलल्याने गौरवचे समितीवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:33 IST

मोटर स्पोर्टस्मधील भारताचा आघाडीचा खेळाडू गौरव गिल याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून यामुळे खेळाला नुकसान होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली.

नवी दिल्ली : मोटर स्पोर्टस्मधील भारताचा आघाडीचा खेळाडू गौरव गिल याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून यामुळे खेळाला नुकसान होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली.आशिया पॅसिफिक रॅलीचा दोनदा चॅम्पियन राहिलेला गौरव म्हणाला, ‘गोल्फ, कॅरम आणि क्यू स्पोर्टस्ला सरकार मान्यता देत असेल तर शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक मोटर रेसिंगसारख्या खेळाला ओळख का मिळत नाही. गोल्फ, कॅरम आणि क्यू स्पोर्टस्मधील खेळाडूंचा मी सन्मान करतो; पण हे तिन्ही खेळ पूर्ण स्वरूपात खेळ नाहीत, असे माझे प्रांजळ मत आहे.’मोटर स्पोर्टस्ला सरकारने मान्यता दिल्यास मोठा लाभ होईल, असे सांगून ३५ वर्षांचा गौरव पुढे म्हणाला, ‘या खेळात करियर करणाºया युवकांची संख्या वाढावी यासाठी सरकारने खेळाला अर्जुन पुरस्कार जाहीर करायला हवा. क्रीडा मंत्रालयाने मोटर स्पोर्टस् फेडरेशन आणि मोटर स्पोर्टस् क्लब आॅफ इंडियाला अधिकृत मान्यता द्यावी.’ २०१० मध्ये या खेळातील नरेन कार्तिकेयनला अर्जुन पुरस्कार देण्यात आल्याचे स्मरण गौरवने करून दिले. अर्जुन पुरस्कारासाठी आशियाई, राष्टÑकुल तसेच आॅलिम्पिकमध्ये सहभागी खेळांच्या खेळाडूंचाच विचार केला जातो. (वृत्तसंस्था)क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये समावेश नाही; पण लोकप्रियतेच्या आधारे या प्रकाराचे खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरतात. याकडे लक्ष वेधून गौरव पुढे म्हणाला,‘एखादा क्रिकेटपटू कधी कधी चांगली कामगिरी करीत हा पुरस्कार जिंकतो. ही अन्य खेळाडूंची अवहेलना ठरते. माझ्या खेळात मी जगातील अतिशय उत्कृष्ट खेळाडूंसोबत चढाओढ करीत असूनही मला पाठिंबा मिळताना दिसत नाही.- गौरव गिल, मोटर स्पोर्टस् स्टार