शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डोंबिवलीकर जलतरणपटूंचा दबदबा

By मुरलीधर भवार | Updated: April 25, 2024 15:27 IST

या स्पर्धेत एकूण ६१० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

डोंबिवली- केरळमधील कोची येथील पेरियार नदीत लांब पल्ल्याची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा नुकतीच पार पडली. या जलतरण स्पर्धेत डोंबिवलीतील यश जिमखान्याच्या ६ जलतरणपटूंनी बाजी मारली आहे. २१ एप्रिलस रोजी पार पडलेल्या स्पर्धेत भारत, मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते. 

या स्पर्धेत एकूण ६१० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये १६ किमी , १० किमी , ६ किमी , २ किमी आणि ४०० मिटर अशा विविध अंतराच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ४ देशातील एकूण ६१० स्पर्धकांचा समावेश होता. यात डोंबिवलीतील यश जिमखान्याचे जलतरणपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत १६ किमी गटात यश जिमखानाची कु. ध्रुही राजेश पाटील हिने ३ रा क्रमांक पटकावला आहे. कु. श्रावणी संदीप भारती हिने १० किलोमीटर स्पर्धेत २ रा क्रमांक पटकावला आहे. कु. गितीशा प्रवीण भंडारे हीने १० किलोमीटर स्पर्धेत ३ रा क्रमांक पटकावला आहे. 

कु. जिया भानुशाली हिने ६ किलोमीटर स्पर्धेत २ रा क्रमांक पटकावला आहे. कु. निर्भय संदीप भारती याने १६ किलोमीटर मध्ये ५ वा क्रमांकआणि कु. नैतिक निलेशकुमार हरगे याने १६ किलोमीटरमध्ये ६ वा क्रमांक पटकावला आहे. हे सर्व जलतरणपटू प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत. या सर्वांनी या आधीही सागरी जलतरण स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकावली आहेत. तसेच समद्रातील मोठ पर्सनल इव्हेंट देखील केलेले आहेत. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली