शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये : शहरयार

By admin | Updated: October 1, 2015 22:41 IST

भारत सरकारने क्रिकेटसंबंध पूर्ववत करण्यासाठी पावले उचलावित, असा आग्रह करीत पीसीबी अध्यक्ष शहरयान खान यांनी क्रिकेटमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ नये

कोलकाता : भारत सरकारने क्रिकेटसंबंध पूर्ववत करण्यासाठी पावले उचलावित, असा आग्रह करीत पीसीबी अध्यक्ष शहरयान खान यांनी क्रिकेटमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. उभय देशांत लवकरात लवकर मालिका सुरू व्हावी, यावर त्यांनी भर दिला.शहरयार सध्या कोलकाता येथे आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही दोन्ही देशांनी सहा मालिका आयोजित करण्याचा करार केला होता. यातील पहिल्या मालिकेचे आयोजन डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहे. बीसीसीआय कराराचे पालन करेल आणि मालिकेत सहभागी होईल, अशी आशा आहे. उभय देशांतील क्रिकेट चाहत्यांना भारत-पाक क्रिकेट सामने पाहण्याची उत्कंठा आहे. खेळ आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी असल्याने दोहोंची सरमिसळ होऊ नये.’भारताला डिसेंबरमध्ये पाकविरुद्ध मालिका खेळायची असली, तरी दहशतवादामुळे मालिकेवर अनिश्चिततेचे संकट कायम आहे. उभय देशांत बोलचाल बंद असली, तरी क्रिकेटमध्ये राजकारण आणले जाऊ नये, असे शहरयार यांना वाटते. दहशतवादाची सर्वाधिक झळ पाकला बसत असल्याने आम्ही कुठल्याही खेळाचे आयोजन करू शकत नाही. दहशतवाद आमच्यातर्फे पुरस्कृत नसून आम्ही नियंत्रित करण्याचाच प्रयत्न करीत आहोत हे भारताने समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.आयसीसीद्वारे होणाऱ्या स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यासंदर्भात शहरयार यांना छेडताच कोलांटउडी घेत ते म्हणाले,‘मी असे कधीही बोललो नाही. खरेतर डिसेंबरमध्ये आयोजित मालिकेसाठी पीसीबी बीसीसीआयकडून येणाऱ्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहे.’ (वृत्तसंस्था)