शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये : शहरयार

By admin | Updated: October 1, 2015 22:41 IST

भारत सरकारने क्रिकेटसंबंध पूर्ववत करण्यासाठी पावले उचलावित, असा आग्रह करीत पीसीबी अध्यक्ष शहरयान खान यांनी क्रिकेटमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ नये

कोलकाता : भारत सरकारने क्रिकेटसंबंध पूर्ववत करण्यासाठी पावले उचलावित, असा आग्रह करीत पीसीबी अध्यक्ष शहरयान खान यांनी क्रिकेटमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. उभय देशांत लवकरात लवकर मालिका सुरू व्हावी, यावर त्यांनी भर दिला.शहरयार सध्या कोलकाता येथे आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही दोन्ही देशांनी सहा मालिका आयोजित करण्याचा करार केला होता. यातील पहिल्या मालिकेचे आयोजन डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहे. बीसीसीआय कराराचे पालन करेल आणि मालिकेत सहभागी होईल, अशी आशा आहे. उभय देशांतील क्रिकेट चाहत्यांना भारत-पाक क्रिकेट सामने पाहण्याची उत्कंठा आहे. खेळ आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी असल्याने दोहोंची सरमिसळ होऊ नये.’भारताला डिसेंबरमध्ये पाकविरुद्ध मालिका खेळायची असली, तरी दहशतवादामुळे मालिकेवर अनिश्चिततेचे संकट कायम आहे. उभय देशांत बोलचाल बंद असली, तरी क्रिकेटमध्ये राजकारण आणले जाऊ नये, असे शहरयार यांना वाटते. दहशतवादाची सर्वाधिक झळ पाकला बसत असल्याने आम्ही कुठल्याही खेळाचे आयोजन करू शकत नाही. दहशतवाद आमच्यातर्फे पुरस्कृत नसून आम्ही नियंत्रित करण्याचाच प्रयत्न करीत आहोत हे भारताने समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.आयसीसीद्वारे होणाऱ्या स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यासंदर्भात शहरयार यांना छेडताच कोलांटउडी घेत ते म्हणाले,‘मी असे कधीही बोललो नाही. खरेतर डिसेंबरमध्ये आयोजित मालिकेसाठी पीसीबी बीसीसीआयकडून येणाऱ्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहे.’ (वृत्तसंस्था)