शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये : शहरयार

By admin | Updated: October 1, 2015 22:41 IST

भारत सरकारने क्रिकेटसंबंध पूर्ववत करण्यासाठी पावले उचलावित, असा आग्रह करीत पीसीबी अध्यक्ष शहरयान खान यांनी क्रिकेटमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ नये

कोलकाता : भारत सरकारने क्रिकेटसंबंध पूर्ववत करण्यासाठी पावले उचलावित, असा आग्रह करीत पीसीबी अध्यक्ष शहरयान खान यांनी क्रिकेटमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. उभय देशांत लवकरात लवकर मालिका सुरू व्हावी, यावर त्यांनी भर दिला.शहरयार सध्या कोलकाता येथे आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही दोन्ही देशांनी सहा मालिका आयोजित करण्याचा करार केला होता. यातील पहिल्या मालिकेचे आयोजन डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहे. बीसीसीआय कराराचे पालन करेल आणि मालिकेत सहभागी होईल, अशी आशा आहे. उभय देशांतील क्रिकेट चाहत्यांना भारत-पाक क्रिकेट सामने पाहण्याची उत्कंठा आहे. खेळ आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी असल्याने दोहोंची सरमिसळ होऊ नये.’भारताला डिसेंबरमध्ये पाकविरुद्ध मालिका खेळायची असली, तरी दहशतवादामुळे मालिकेवर अनिश्चिततेचे संकट कायम आहे. उभय देशांत बोलचाल बंद असली, तरी क्रिकेटमध्ये राजकारण आणले जाऊ नये, असे शहरयार यांना वाटते. दहशतवादाची सर्वाधिक झळ पाकला बसत असल्याने आम्ही कुठल्याही खेळाचे आयोजन करू शकत नाही. दहशतवाद आमच्यातर्फे पुरस्कृत नसून आम्ही नियंत्रित करण्याचाच प्रयत्न करीत आहोत हे भारताने समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.आयसीसीद्वारे होणाऱ्या स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यासंदर्भात शहरयार यांना छेडताच कोलांटउडी घेत ते म्हणाले,‘मी असे कधीही बोललो नाही. खरेतर डिसेंबरमध्ये आयोजित मालिकेसाठी पीसीबी बीसीसीआयकडून येणाऱ्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहे.’ (वृत्तसंस्था)