शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

भारतापुढे नतमस्तक होऊ नका : आफ्रिदी

By admin | Updated: September 19, 2015 03:52 IST

यूएई येथे डिसेंबर महिन्यात भारत-पाक क्रिकेट मालिका आयोजित करण्यासाठी भारताकडे आग्रह करा; पण त्यांची मनधरणी करू नका, असा सल्ला पाक टी-२० संघाचा कर्णधार शाहीद

कराची : यूएई येथे डिसेंबर महिन्यात भारत-पाक क्रिकेट मालिका आयोजित करण्यासाठी भारताकडे आग्रह करा; पण त्यांची मनधरणी करू नका, असा सल्ला पाक टी-२० संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने पाक बोर्डाला दिला आहे.लाहोर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरादरम्यान पत्रकारांशी बोलताना शाहीद म्हणाला, ‘भारताची मनधरणी करण्याऐवजी पीसीबीने अन्य संघांना पाक दौराकरण्यासाठी आमंत्रण द्यावे. भारताविरुद्ध खेळण्यास अपेक्षेपेक्षा अधिक महत्त्व देण्यास अर्थ नाही,’ असे माझे स्पष्ट मत आहे.मालिका आयोजनासाठी आम्ही नेहमी भारतापुढे लोटांगण का घालतो, हेच माझ्या समजण्यापलीकडचे असल्याचे आफ्रिदीने सांगितले. भारत आमच्याविरुद्ध खेळण्यास तयार नसेल, तर आम्ही तुमच्याविरुद्ध खेळण्यास आतूर आहोत, हेवारंवार सांगण्याची गरज नाही, या शब्दांत आफ्रिदीने बोर्डाला सुनावले. आमची जितकी गरज आहे तितकीच भारताचीही गरज असायला हवी, असे तो म्हणाला. भारत-पाक दरम्यान २००७ आणि २०१२-१३ या वर्षांत मर्यादित षटकांच्या मालिकेचा अपवाद वगळता द्विपक्षीय मालिका आयोजित झालेली नाही. उभय संघांदरम्यान २०१५ ते २०२३ या काळात सहा मालिकांचे आयोजन प्रस्तावित आहे. (वृत्तसंस्था)सलमान बटने मागितली आफ्रिदीची माफीमॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकचा फलंदाज सलमान बट याने माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याची माफी मागितली आहे. लाहोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दोन्ही खेळाडू एकमेकांपुढे आले, त्या वेळी बटने आफ्रिदीची क्षमायाचना केली. या घटनेचे साक्षीदार असलेल्यांनी सांगितले की, स्पॉट फिक्सिंग कांड घडले त्या वेळी कर्णधार असलेला सलमान बट एनसीएत आफ्रिदीशी भेटला.