शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

कर्णधारपद प्रदीर्घ कालावधीत न मिळाल्याने निराश : तेंडुलकर

By admin | Updated: March 14, 2015 00:07 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याने खूप निराश झालो होतो आणि त्यातून सावरणे खूपच कठीण होते,

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याने खूप निराश झालो होतो आणि त्यातून सावरणे खूपच कठीण होते, असा गौप्यस्फोट केला आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने.तेंडुलकरवर त्याच्या २४ वर्षांच्या चमकदार कारकिर्दीदरम्यान दोनदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली; परंतु त्यात तो फारसा यशस्वी ठरला नाही. तो पहिल्यांदा १९९६ मध्ये कर्णधार झाला; परंतु संघाच्या सुमार कामगिरीमुळे त्याला १९९७ मध्ये या पदावरून हटवण्यात आले. तथापि, कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याची खंत सचिन तेंडुलकरने शुक्रवारी व्यक्त केली.तेंडुलकर म्हणाला, ‘‘क्रिकेट हा वैयक्तिक नसून सांघिक खेळ आहे. एक वेळ येते तेव्हा कर्णधार त्याची भूमिका बजावतो. तो मैदानावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतो; परंतु अखेर फलंदाजांनाच धावा उभाराव्या लागतात आणि गोलंदाजांना योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागते. कर्णधारपद भूषवण्याच्या माझ्या सुरुवातीच्या कालखंडातील १२ ते १३ महिन्यांनंतर पदावरून हटवण्यात आले, ही बाब निराशाजनक होती. कारण तुम्ही संघाला पुढे न्याल, या विचारानेच तुम्हाला कर्णधार बनवले जाते आणि जर तुमचा कार्यकाळ प्रदीर्घ नसला तर यशाचा दर शून्य होतो. तुम्ही चार सामने खेळता आणि त्यातील दोन सामने जिंकलात तर तुमच्या यशाचा दर ५० टक्के होते. कर्णधार म्हणून माझा कालावधी प्रदीर्घ नव्हता आणि त्यातून सावरणे माझ्यासाठी खूपच मोठे आव्हान होते.’’सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या नेतृत्वाची तुलना भारताच्या २०११ च्या इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दौऱ्याशी केली. तेंडुलकरला सध्या आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ जिंकेल? असा प्रश्न छेडण्यात आला तेव्हा तो म्हणाला, ‘‘भारताची सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याकडे वाटचाल सुरू आहे. भारत ज्याप्रमाणे खेळत आहे त्यावर आपण खूप प्रभावित आहोत. आम्ही चांगली गोलंदाजी करीत आहोत आणि फलंदाजी व क्षेत्ररक्षणही चांगले होत आहे. असा कोणताही विभाग नाही, की ज्यात आमची कामगिरी खराब होत आहे. आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करीत आहोत.’’तेंडुलकर फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या वनडेतील नियमात झालेल्या बदलाबाबत जास्त खूश नाही.तो म्हणाला, की क्रिकेटमध्ये बदल होत आहे आणि हे बदल गोलंदाजांसाठी जास्त कठोर आहेत. जेव्हा सर्कलच्या आत पाच क्षेत्ररक्षक होते तेव्हा स्कोर २६० किंवा २७० पर्यंत पोहोचत होता. आता ही धावसंख्या ३१० पर्यंत पोहोचली आहे. एवढेच नव्हे; तर २९० धावांचाही यशस्वीपणे पाठलाग होऊ शकतो, असे समालोचक म्हणतात. (वृत्तसंस्था)