शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

कर्णधारपद प्रदीर्घ कालावधीत न मिळाल्याने निराश : तेंडुलकर

By admin | Updated: March 14, 2015 00:07 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याने खूप निराश झालो होतो आणि त्यातून सावरणे खूपच कठीण होते,

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याने खूप निराश झालो होतो आणि त्यातून सावरणे खूपच कठीण होते, असा गौप्यस्फोट केला आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने.तेंडुलकरवर त्याच्या २४ वर्षांच्या चमकदार कारकिर्दीदरम्यान दोनदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली; परंतु त्यात तो फारसा यशस्वी ठरला नाही. तो पहिल्यांदा १९९६ मध्ये कर्णधार झाला; परंतु संघाच्या सुमार कामगिरीमुळे त्याला १९९७ मध्ये या पदावरून हटवण्यात आले. तथापि, कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याची खंत सचिन तेंडुलकरने शुक्रवारी व्यक्त केली.तेंडुलकर म्हणाला, ‘‘क्रिकेट हा वैयक्तिक नसून सांघिक खेळ आहे. एक वेळ येते तेव्हा कर्णधार त्याची भूमिका बजावतो. तो मैदानावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतो; परंतु अखेर फलंदाजांनाच धावा उभाराव्या लागतात आणि गोलंदाजांना योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागते. कर्णधारपद भूषवण्याच्या माझ्या सुरुवातीच्या कालखंडातील १२ ते १३ महिन्यांनंतर पदावरून हटवण्यात आले, ही बाब निराशाजनक होती. कारण तुम्ही संघाला पुढे न्याल, या विचारानेच तुम्हाला कर्णधार बनवले जाते आणि जर तुमचा कार्यकाळ प्रदीर्घ नसला तर यशाचा दर शून्य होतो. तुम्ही चार सामने खेळता आणि त्यातील दोन सामने जिंकलात तर तुमच्या यशाचा दर ५० टक्के होते. कर्णधार म्हणून माझा कालावधी प्रदीर्घ नव्हता आणि त्यातून सावरणे माझ्यासाठी खूपच मोठे आव्हान होते.’’सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या नेतृत्वाची तुलना भारताच्या २०११ च्या इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दौऱ्याशी केली. तेंडुलकरला सध्या आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ जिंकेल? असा प्रश्न छेडण्यात आला तेव्हा तो म्हणाला, ‘‘भारताची सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याकडे वाटचाल सुरू आहे. भारत ज्याप्रमाणे खेळत आहे त्यावर आपण खूप प्रभावित आहोत. आम्ही चांगली गोलंदाजी करीत आहोत आणि फलंदाजी व क्षेत्ररक्षणही चांगले होत आहे. असा कोणताही विभाग नाही, की ज्यात आमची कामगिरी खराब होत आहे. आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करीत आहोत.’’तेंडुलकर फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या वनडेतील नियमात झालेल्या बदलाबाबत जास्त खूश नाही.तो म्हणाला, की क्रिकेटमध्ये बदल होत आहे आणि हे बदल गोलंदाजांसाठी जास्त कठोर आहेत. जेव्हा सर्कलच्या आत पाच क्षेत्ररक्षक होते तेव्हा स्कोर २६० किंवा २७० पर्यंत पोहोचत होता. आता ही धावसंख्या ३१० पर्यंत पोहोचली आहे. एवढेच नव्हे; तर २९० धावांचाही यशस्वीपणे पाठलाग होऊ शकतो, असे समालोचक म्हणतात. (वृत्तसंस्था)