शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कुंबळेची जागा भरून काढणे कठीण - वीरेंद्र सेहवाग

By admin | Updated: June 21, 2017 21:44 IST

भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबऴेच्या राजीनामानाट्यानंतर प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत असलेल्या वीरेंद्र सेहवागने प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबऴेच्या राजीनामानाट्यानंतर प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत असलेल्या वीरेंद्र सेहवागने प्रथमच आपली  प्रतिक्रिया दिली आहे. अनिल कुंबळेच्या राजीनाम्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावर निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे, असे वीरूने म्हटले आहे. 
वीरू म्हणाला की, " मी प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली खेळलो नाही. पण त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. तो माझा सिनियर होता. इतकेच नाही तर माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन त्याच्याच कर्णधारपदाखाली झाले होते. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली आहे. आता त्याच्या राजीनाम्यानंतर जो कोणी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारेल, त्याच्यासाठी कुंबळेसारखी कामगिरी करणे कठीण असेल."  
अनिल कुंबळेने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या  श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. कुंबळे प्रशिक्षक म्हणून यशस्वी ठरला असला तरी त्याला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत चांगले संबंध राखता आले नव्हते. अखेर परिस्थिती चिघळल्यावर त्याने संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला.