शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धोनी, विराट आणि सौरवमध्ये हे आहेत समान गुण

By admin | Updated: June 16, 2017 15:21 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 16 - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे. फलंदाज म्हणून संघाच्या विजयात त्यांचे जितके योगदान आहे तितकेच कर्णधार म्हणून भारतीय संघाच्या उभारणीत या तिघांनी मोलाची भूमिका बजावली आहे. या तीन महान फलंदाजांमध्ये कर्णधार म्हणून काही समान गोष्टी आहेत. जाणून घेऊया काय आहेत  समान गोष्टी. 
 
- सौरव गांगुलीपासून ख-या अर्थाने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलण्यास सुरुवात झाली. सौरवने टीम इंडियामध्ये जिंकण्याची जिद्द, आक्रमकता निर्माण केली. कर्णधारपदी असताना सौरवने विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, आशिष नेहरा आणि एमएस धोनी या युवा क्रिकेटपटूंना पूर्ण पाठिंबा दिला. एखाद-दुस-या खराब परफॉर्मन्समुळे त्यांना संघातून डच्चू दिला नाही. परिमाणस्वरुप आज हे सर्व खेळाडू वर्ल्डक्लास प्लेयर्स म्हणून ओळखले जातात. 
 
- एमएस धोनी आणि विराट कोहलीमध्ये सुद्धा हाच गुण आहे. 2011 वर्ल्डकप नंतर धोनीने नव्याने संघ बांधला. त्याने रविंद्र जाडेजा, आर.अश्विन यांना वारंवार संधी देऊन आत्मविश्वास निर्माण केला. एमएस धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला त्यावेळी विराटला एक तरुण संघ मिळाला. विराटही आज त्याचप्रमाणे केदार जाधव, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्यावर विश्वास ठेवत आहे. 
 
- 1999 च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात सौरव गांगुलीने 183 धावांची विक्रमी खेळी केली. वर्ल्डकप इतिहासातील ही सर्वोत्तम इनिंग्जपैकी एक आहे. चामिंडा वास, मुरलीधरन या लंकेच्या अव्वल गोलंदाजाचा सौरवने अक्षरश कचरा केला होता. 
 
- सौरव प्रमाणेच धोनीनेही 2005 साली श्रीलंकेविरुद्ध जयपूरमध्ये नाबाद 183 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेचे 299 धावांचे लक्ष्य गाठताना 15 चौकार आणि 10 षटकार लगावले होते. 
 
- 2012 साली आशियाकपमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीनेही शानदार फलंदाजी केली होती. विराटच्या 183 धावांच्या खेळीमुळे भारताला या सामन्यात विजय मिळवता आला. 
 
- धोनीच्या तुलनेत सौरव आणि विराट प्रचंड आक्रमक आहेत. आक्रमकता जसा दोघांना प्लसपॉईंट आहे तसेच शांतपणा धोनींचा प्लसपॉईंट आहे. संघाला गरज असताना तिघांनी नेहमीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. 
 
- सौरव आणि विराट नेहमीच प्रतिस्पर्ध्यांच्या शाब्दीक बाचबाचीला पुरुन उरले आहेत.