शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

धोनी, विराट आणि सौरवमध्ये हे आहेत समान गुण

By admin | Updated: June 16, 2017 15:21 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 16 - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे. फलंदाज म्हणून संघाच्या विजयात त्यांचे जितके योगदान आहे तितकेच कर्णधार म्हणून भारतीय संघाच्या उभारणीत या तिघांनी मोलाची भूमिका बजावली आहे. या तीन महान फलंदाजांमध्ये कर्णधार म्हणून काही समान गोष्टी आहेत. जाणून घेऊया काय आहेत  समान गोष्टी. 
 
- सौरव गांगुलीपासून ख-या अर्थाने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलण्यास सुरुवात झाली. सौरवने टीम इंडियामध्ये जिंकण्याची जिद्द, आक्रमकता निर्माण केली. कर्णधारपदी असताना सौरवने विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, आशिष नेहरा आणि एमएस धोनी या युवा क्रिकेटपटूंना पूर्ण पाठिंबा दिला. एखाद-दुस-या खराब परफॉर्मन्समुळे त्यांना संघातून डच्चू दिला नाही. परिमाणस्वरुप आज हे सर्व खेळाडू वर्ल्डक्लास प्लेयर्स म्हणून ओळखले जातात. 
 
- एमएस धोनी आणि विराट कोहलीमध्ये सुद्धा हाच गुण आहे. 2011 वर्ल्डकप नंतर धोनीने नव्याने संघ बांधला. त्याने रविंद्र जाडेजा, आर.अश्विन यांना वारंवार संधी देऊन आत्मविश्वास निर्माण केला. एमएस धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला त्यावेळी विराटला एक तरुण संघ मिळाला. विराटही आज त्याचप्रमाणे केदार जाधव, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्यावर विश्वास ठेवत आहे. 
 
- 1999 च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात सौरव गांगुलीने 183 धावांची विक्रमी खेळी केली. वर्ल्डकप इतिहासातील ही सर्वोत्तम इनिंग्जपैकी एक आहे. चामिंडा वास, मुरलीधरन या लंकेच्या अव्वल गोलंदाजाचा सौरवने अक्षरश कचरा केला होता. 
 
- सौरव प्रमाणेच धोनीनेही 2005 साली श्रीलंकेविरुद्ध जयपूरमध्ये नाबाद 183 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेचे 299 धावांचे लक्ष्य गाठताना 15 चौकार आणि 10 षटकार लगावले होते. 
 
- 2012 साली आशियाकपमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीनेही शानदार फलंदाजी केली होती. विराटच्या 183 धावांच्या खेळीमुळे भारताला या सामन्यात विजय मिळवता आला. 
 
- धोनीच्या तुलनेत सौरव आणि विराट प्रचंड आक्रमक आहेत. आक्रमकता जसा दोघांना प्लसपॉईंट आहे तसेच शांतपणा धोनींचा प्लसपॉईंट आहे. संघाला गरज असताना तिघांनी नेहमीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. 
 
- सौरव आणि विराट नेहमीच प्रतिस्पर्ध्यांच्या शाब्दीक बाचबाचीला पुरुन उरले आहेत.