शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

धोनी, विराट आणि सौरवमध्ये हे आहेत समान गुण

By admin | Updated: June 16, 2017 15:21 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 16 - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तिघांचा महत्वाचा वाटा आहे. फलंदाज म्हणून संघाच्या विजयात त्यांचे जितके योगदान आहे तितकेच कर्णधार म्हणून भारतीय संघाच्या उभारणीत या तिघांनी मोलाची भूमिका बजावली आहे. या तीन महान फलंदाजांमध्ये कर्णधार म्हणून काही समान गोष्टी आहेत. जाणून घेऊया काय आहेत  समान गोष्टी. 
 
- सौरव गांगुलीपासून ख-या अर्थाने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलण्यास सुरुवात झाली. सौरवने टीम इंडियामध्ये जिंकण्याची जिद्द, आक्रमकता निर्माण केली. कर्णधारपदी असताना सौरवने विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, आशिष नेहरा आणि एमएस धोनी या युवा क्रिकेटपटूंना पूर्ण पाठिंबा दिला. एखाद-दुस-या खराब परफॉर्मन्समुळे त्यांना संघातून डच्चू दिला नाही. परिमाणस्वरुप आज हे सर्व खेळाडू वर्ल्डक्लास प्लेयर्स म्हणून ओळखले जातात. 
 
- एमएस धोनी आणि विराट कोहलीमध्ये सुद्धा हाच गुण आहे. 2011 वर्ल्डकप नंतर धोनीने नव्याने संघ बांधला. त्याने रविंद्र जाडेजा, आर.अश्विन यांना वारंवार संधी देऊन आत्मविश्वास निर्माण केला. एमएस धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला त्यावेळी विराटला एक तरुण संघ मिळाला. विराटही आज त्याचप्रमाणे केदार जाधव, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्यावर विश्वास ठेवत आहे. 
 
- 1999 च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात सौरव गांगुलीने 183 धावांची विक्रमी खेळी केली. वर्ल्डकप इतिहासातील ही सर्वोत्तम इनिंग्जपैकी एक आहे. चामिंडा वास, मुरलीधरन या लंकेच्या अव्वल गोलंदाजाचा सौरवने अक्षरश कचरा केला होता. 
 
- सौरव प्रमाणेच धोनीनेही 2005 साली श्रीलंकेविरुद्ध जयपूरमध्ये नाबाद 183 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेचे 299 धावांचे लक्ष्य गाठताना 15 चौकार आणि 10 षटकार लगावले होते. 
 
- 2012 साली आशियाकपमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीनेही शानदार फलंदाजी केली होती. विराटच्या 183 धावांच्या खेळीमुळे भारताला या सामन्यात विजय मिळवता आला. 
 
- धोनीच्या तुलनेत सौरव आणि विराट प्रचंड आक्रमक आहेत. आक्रमकता जसा दोघांना प्लसपॉईंट आहे तसेच शांतपणा धोनींचा प्लसपॉईंट आहे. संघाला गरज असताना तिघांनी नेहमीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. 
 
- सौरव आणि विराट नेहमीच प्रतिस्पर्ध्यांच्या शाब्दीक बाचबाचीला पुरुन उरले आहेत.