शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पराभवासाठी धोनी एकटा जबाबदार नाही, गावसकरांनी केला बचाव

By admin | Updated: July 5, 2017 16:11 IST

पराभवासाठी महेंद्रसिंग धोनीला जबाबदार धरण्यात येत आहे. मात्र, आता भारताचा माजी कर्णधार सुनिल गावसकर धोनीच्या बचावासाठी पुढे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - रविवारी वेस्ट इंडिजविरूद्ध शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताला वेस्ट इंडिजकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. विंडीजने दिलेल्या 190 या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे दिग्गज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर केवळ 178 धावांमध्येच ढेपाळले. या पराभवासाठी महेंद्रसिंग धोनीला जबाबदार धरण्यात येत आहे. मात्र, आता भारताचा माजी कर्णधार सुनिल गावसकर धोनीच्या बचावासाठी पुढे आला आहे. 
 
एनडीटीव्हीसोबत बोलताना गावसकरांनी पराभवासाठी धोनी एकटा जबाबादार नसल्याचं म्हटलं आहे. हे सगळ्या संघाचं अपयश आहे, पराभवाला संपूर्ण टीम जबाबादार आहे. संघाने केलेल्या 178 धावांमध्ये केवळ दोन जणांचं अर्धशतक आहे, बाकी 9 जणांचं प्रदर्शन वाईट झालं. पण टीम इंडियाच्या फॉर्मबाबत अजिबात चिंता वाटत नाही कारण तो केवळ एक वाईट दिवस होता. पराभवासाठी एकट्या धोनीला जबाबदार धरणं चुकीचं आहे अशा शब्दांमध्ये गावसकारांनी धोनीची पाठराखण केली.  
(धोनीची कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी)
(रहाणे-धोनीचा खेळ संघासाठी की जागा टिकवण्यासाठी)
(धोनी म्हणतो, मी आहे जुन्या मद्याप्रमाणे !)
या सामन्यात पाच बळी टिपणारा कर्णधार जेसन होल्डर वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आपली पिछाडी 1-2 अशी कमी केली.
 
प्रशिक्षकपद रवी शास्त्रीला मिळण्याची शक्यता : गावसकर
एकेकाळी भारतीय संघातील माझे माजी सहकारी रवी शास्त्री भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्याचे प्रबळ दावेदार आहेत, असे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
 
शास्त्री यांनी बीसीसीआयकडे अर्ज सादर करण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे. त्यानंतर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत शास्त्री सर्वांत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.
 
शास्त्री यांनी आॅगस्ट २०१४ ते जून २०१६ या कालावधीत भारतीय संघाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. कर्णधार विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंसोबत शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत.
 
शास्त्री यांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत भारतीय संघाने २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका जिंकली होती. त्यानंतर विश्वकप आणि विश्व टी-२० स्पर्धेत (अनुक्रमे २०१५ व २०१६) भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली होती. श्रीलंकेविरुद्ध त्यांच्याच देशात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने आॅस्ट्रेलियाला आॅस्ट्रेलियात टी-२० मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी केली.
 
यापूर्वी, वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, व्यंकटेश प्रसाद, रिचर्ड पायबस, डोडा गणेश फिल सिमन्स आणि लालचंद राजपूत यांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत.
 
शास्त्री यांनी संघाच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, २०१४ मध्ये भारतीय संघाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर बीसीसीआयने शास्त्री यांना संघाचे संचालकपद स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर संघाचे नशीब बदलले. आता त्यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असून त्यांची नक्कीच या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
 
- सुनील गावसकर