शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धोनी, कोहलीला मिळणार विश्रांती?

By admin | Updated: June 29, 2015 03:45 IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आज बीसीसीआयची संघनिवड समिती मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे.

नवी दिल्ली : झिम्बाब्वे दौºयासाठी आज (दि. २९) बीसीसीआयची संघनिवड समिती मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. ही निवड होताना सातत्याने क्रिकेट खेळून दमलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्याची दाट शक्यता असल्याने संघात नव्या चेहºयांना संधी मिळू शकते. येत्या १० जुलैपासून सुरू होणाºया या दौºयात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह दोन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. भारतीय क्रिकेटपटू मागील सात महिन्यांपासून व्यस्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघनिवड समिती कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली व रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. प्रदीर्घ काळापासून राष्ट्रीय संघात नसलेला रॉबिन उथप्पा व आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा अनुभवी हरभजन सिंग यांची झिम्बाब्वे दौठयासाठी निवड होते काय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. युवा खेळाडूंमध्ये दिल्ली डेअरडेविल्सचा फलंदाज श्रेयस अय्यर, विजय हजारे चषकात उत्तुंग कामगिरी करणारा सय्यद मुश्ताक अली व देवधर चषक स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजीने लक्ष वेधून घेणारा मयांक अग्रवाल, दुखापतीमुळे टीम इंडियातील स्थान पक्के करू न शकलेला मनोज तिवारी, स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा पंकज सिंग आणि नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा संदीप शर्मा यांच्यापैकी कोणाची हिंदुस्थानी संघात निवड करायची, यासाठी संघनिवड समितीचा कस लागणार आहे. परवेझ रसुल व हरभजन सिंग यांच्यात कोणाला घ्यायचे, हे कोडेही निवड समितीला सोडवायचे आहे. स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू व मोहित शर्मा यांची निवड जवळपास निश्चित समजली जाते. आघाडीवीर शिखर धवन व वेगवान गोलंदाज उमेश यादव यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. (वृत्तसंस्था)

रोहित शर्मा, सुरेश रैना कर्णधारपदाच्या शर्यतीत

धोनी व कोहलीला विश्रांती दिल्यास आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनविणारा रोहित शर्मा याच्यावर भारतीय कर्णधारपदाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. मात्र, सुरेश रैनाने याआधी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीच्या गैरहजेरीत नेतृत्व केलेले आहे. विशेष म्हणजे २०१० च्या झिम्बाब्वे दौºयावर रैना प्रभारी कर्णधार होता. मात्र, त्यावेळी श्रीलंका संघाचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत भारताला अंतिम लढतीपर्यंत मजल मारता आली नव्हती. त्यामुळे कर्णधारपदाची लॉटरी रोहितला की रैनाला लागणार, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.