शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

धोनी, कोहलीला मिळणार विश्रांती?

By admin | Updated: June 29, 2015 03:45 IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आज बीसीसीआयची संघनिवड समिती मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे.

नवी दिल्ली : झिम्बाब्वे दौºयासाठी आज (दि. २९) बीसीसीआयची संघनिवड समिती मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. ही निवड होताना सातत्याने क्रिकेट खेळून दमलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्याची दाट शक्यता असल्याने संघात नव्या चेहºयांना संधी मिळू शकते. येत्या १० जुलैपासून सुरू होणाºया या दौºयात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह दोन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. भारतीय क्रिकेटपटू मागील सात महिन्यांपासून व्यस्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघनिवड समिती कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली व रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. प्रदीर्घ काळापासून राष्ट्रीय संघात नसलेला रॉबिन उथप्पा व आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा अनुभवी हरभजन सिंग यांची झिम्बाब्वे दौठयासाठी निवड होते काय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. युवा खेळाडूंमध्ये दिल्ली डेअरडेविल्सचा फलंदाज श्रेयस अय्यर, विजय हजारे चषकात उत्तुंग कामगिरी करणारा सय्यद मुश्ताक अली व देवधर चषक स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजीने लक्ष वेधून घेणारा मयांक अग्रवाल, दुखापतीमुळे टीम इंडियातील स्थान पक्के करू न शकलेला मनोज तिवारी, स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा पंकज सिंग आणि नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा संदीप शर्मा यांच्यापैकी कोणाची हिंदुस्थानी संघात निवड करायची, यासाठी संघनिवड समितीचा कस लागणार आहे. परवेझ रसुल व हरभजन सिंग यांच्यात कोणाला घ्यायचे, हे कोडेही निवड समितीला सोडवायचे आहे. स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू व मोहित शर्मा यांची निवड जवळपास निश्चित समजली जाते. आघाडीवीर शिखर धवन व वेगवान गोलंदाज उमेश यादव यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. (वृत्तसंस्था)

रोहित शर्मा, सुरेश रैना कर्णधारपदाच्या शर्यतीत

धोनी व कोहलीला विश्रांती दिल्यास आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनविणारा रोहित शर्मा याच्यावर भारतीय कर्णधारपदाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. मात्र, सुरेश रैनाने याआधी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीच्या गैरहजेरीत नेतृत्व केलेले आहे. विशेष म्हणजे २०१० च्या झिम्बाब्वे दौºयावर रैना प्रभारी कर्णधार होता. मात्र, त्यावेळी श्रीलंका संघाचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत भारताला अंतिम लढतीपर्यंत मजल मारता आली नव्हती. त्यामुळे कर्णधारपदाची लॉटरी रोहितला की रैनाला लागणार, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.