शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
3
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
4
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
5
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
6
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
7
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
8
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
9
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
10
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
11
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
12
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
13
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
14
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
15
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
16
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
17
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
18
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
19
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
20
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

धोनी, कोहलीला मिळणार विश्रांती?

By admin | Updated: June 29, 2015 03:45 IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आज बीसीसीआयची संघनिवड समिती मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे.

नवी दिल्ली : झिम्बाब्वे दौºयासाठी आज (दि. २९) बीसीसीआयची संघनिवड समिती मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. ही निवड होताना सातत्याने क्रिकेट खेळून दमलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्याची दाट शक्यता असल्याने संघात नव्या चेहºयांना संधी मिळू शकते. येत्या १० जुलैपासून सुरू होणाºया या दौºयात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह दोन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. भारतीय क्रिकेटपटू मागील सात महिन्यांपासून व्यस्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघनिवड समिती कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली व रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. प्रदीर्घ काळापासून राष्ट्रीय संघात नसलेला रॉबिन उथप्पा व आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा अनुभवी हरभजन सिंग यांची झिम्बाब्वे दौठयासाठी निवड होते काय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. युवा खेळाडूंमध्ये दिल्ली डेअरडेविल्सचा फलंदाज श्रेयस अय्यर, विजय हजारे चषकात उत्तुंग कामगिरी करणारा सय्यद मुश्ताक अली व देवधर चषक स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजीने लक्ष वेधून घेणारा मयांक अग्रवाल, दुखापतीमुळे टीम इंडियातील स्थान पक्के करू न शकलेला मनोज तिवारी, स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा पंकज सिंग आणि नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा संदीप शर्मा यांच्यापैकी कोणाची हिंदुस्थानी संघात निवड करायची, यासाठी संघनिवड समितीचा कस लागणार आहे. परवेझ रसुल व हरभजन सिंग यांच्यात कोणाला घ्यायचे, हे कोडेही निवड समितीला सोडवायचे आहे. स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू व मोहित शर्मा यांची निवड जवळपास निश्चित समजली जाते. आघाडीवीर शिखर धवन व वेगवान गोलंदाज उमेश यादव यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. (वृत्तसंस्था)

रोहित शर्मा, सुरेश रैना कर्णधारपदाच्या शर्यतीत

धोनी व कोहलीला विश्रांती दिल्यास आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनविणारा रोहित शर्मा याच्यावर भारतीय कर्णधारपदाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. मात्र, सुरेश रैनाने याआधी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीच्या गैरहजेरीत नेतृत्व केलेले आहे. विशेष म्हणजे २०१० च्या झिम्बाब्वे दौºयावर रैना प्रभारी कर्णधार होता. मात्र, त्यावेळी श्रीलंका संघाचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत भारताला अंतिम लढतीपर्यंत मजल मारता आली नव्हती. त्यामुळे कर्णधारपदाची लॉटरी रोहितला की रैनाला लागणार, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.