शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

धोनी, कोहलीला मिळणार विश्रांती?

By admin | Updated: June 29, 2015 03:45 IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आज बीसीसीआयची संघनिवड समिती मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे.

नवी दिल्ली : झिम्बाब्वे दौºयासाठी आज (दि. २९) बीसीसीआयची संघनिवड समिती मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. ही निवड होताना सातत्याने क्रिकेट खेळून दमलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्याची दाट शक्यता असल्याने संघात नव्या चेहºयांना संधी मिळू शकते. येत्या १० जुलैपासून सुरू होणाºया या दौºयात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह दोन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. भारतीय क्रिकेटपटू मागील सात महिन्यांपासून व्यस्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघनिवड समिती कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली व रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. प्रदीर्घ काळापासून राष्ट्रीय संघात नसलेला रॉबिन उथप्पा व आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा अनुभवी हरभजन सिंग यांची झिम्बाब्वे दौठयासाठी निवड होते काय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. युवा खेळाडूंमध्ये दिल्ली डेअरडेविल्सचा फलंदाज श्रेयस अय्यर, विजय हजारे चषकात उत्तुंग कामगिरी करणारा सय्यद मुश्ताक अली व देवधर चषक स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजीने लक्ष वेधून घेणारा मयांक अग्रवाल, दुखापतीमुळे टीम इंडियातील स्थान पक्के करू न शकलेला मनोज तिवारी, स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा पंकज सिंग आणि नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा संदीप शर्मा यांच्यापैकी कोणाची हिंदुस्थानी संघात निवड करायची, यासाठी संघनिवड समितीचा कस लागणार आहे. परवेझ रसुल व हरभजन सिंग यांच्यात कोणाला घ्यायचे, हे कोडेही निवड समितीला सोडवायचे आहे. स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू व मोहित शर्मा यांची निवड जवळपास निश्चित समजली जाते. आघाडीवीर शिखर धवन व वेगवान गोलंदाज उमेश यादव यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. (वृत्तसंस्था)

रोहित शर्मा, सुरेश रैना कर्णधारपदाच्या शर्यतीत

धोनी व कोहलीला विश्रांती दिल्यास आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनविणारा रोहित शर्मा याच्यावर भारतीय कर्णधारपदाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. मात्र, सुरेश रैनाने याआधी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीच्या गैरहजेरीत नेतृत्व केलेले आहे. विशेष म्हणजे २०१० च्या झिम्बाब्वे दौºयावर रैना प्रभारी कर्णधार होता. मात्र, त्यावेळी श्रीलंका संघाचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत भारताला अंतिम लढतीपर्यंत मजल मारता आली नव्हती. त्यामुळे कर्णधारपदाची लॉटरी रोहितला की रैनाला लागणार, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.