शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धवनची दीडशतकी खेळी

By admin | Updated: September 29, 2015 00:10 IST

कर्णधार शिखर धवनची दीडशतकी खेळी आणि करुण नायर व विजय शंकर यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या भारत

बंगळुरू : कर्णधार शिखर धवनची दीडशतकी खेळी आणि करुण नायर व विजय शंकर यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या भारत ‘अ’ संघाने सोमवारी दुसऱ्या दिवशी बांगलादेश ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात २ बाद ३६ अशी अवस्था केली. येथे खेळल्या जात असलेल्या तीनदिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात आज पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या दिवसअखेर भारत ‘अ’ संघाने वर्चस्व मिळवले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे जवळजवळ अडीच तासांचा खेळ वाया गेला असला तरी भारत ‘अ’ संघाने सामन्यावर पकड मजबूत करण्यात यश मिळवले आहे. धवनने रविवारी पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले होते. त्याने १५० धावांची खेळी केली, तर तमिळनाडूचा अष्टपैलू नायरने ७१ व विजय शंकरने ८६ धावांचे योगदान दिले. भारत ‘अ’ संघाने पहिला डाव ५ बाद ४११ धावसंख्येवर घोषित करीत पहिल्या डावात १८३ धावांची दमदार आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेश ‘अ’ संघाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद ३६ धावांची मजल मारली होती. डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप १४७ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी कर्णधार मोमिनुल हक (९) अणि यष्टिरक्षक फलंदाज लिट्टन दास (७) खेळपट्टीवर होते. त्याआधी, कालच्या वैयक्तिक ११६ धावसंख्येवरून पुढे खेळताना धवनने काही चांगले फटके लगावले. वैयक्तिक १५० धावा फटकावल्यानंतर सकलेन साजिबच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो पायचित झाला. धवनने १४६ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व ३ षटकार लगावले. धवन बाद झाल्यानंतर श्रेयांश अय्यरही (३८) झटपट बाद झाला. त्यानंतर नायर व विजय शंकर यांनी चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. नमन ओझाने (नाबाद २५) शंकरच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर असतानाच पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. पुन्हा खेळ प्रारंभ झाल्यानंतर भारत ‘अ’ संघाने लवकरच डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशतर्फे लेगस्पिनर जुबेर हुसेनने दोन बळी घेतले. त्याने नायर व शंकर यांना तंबूचा मार्ग दाखवला. बांगलादेश ‘अ’ संघाची दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. ईश्वर पांडेने (४ धावांत १ बळी) तिसऱ्या षटकात अनामुल हक (०) याला माघारी परतवले. सौम्या सरकारला (१९) जयंत यादवने बाद केले. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळपूर्वीच थांबविण्यात आला. (वृत्तसंस्था)----संक्षिप्त धावफलक : बांगलादेश अ पहिला डाव : ५२.४ षटकात सर्व बाद २२८; दुसरा डाव : ११ षटकांत २ बाद ३६. भारत पहिला डाव : ८६.१ षटकांत ५ बाद ४११ घोषित : शिखर धवन १५०, अभिनव मुकुंद ३४, श्रेयांश अय्यर ३८, करुण नायर ७१, विजय शंकर ८६, नमन ओझा नाबाद २५, जुबेर हुसेन २/७६).