शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

धवनची दीडशतकी खेळी

By admin | Updated: September 29, 2015 00:10 IST

कर्णधार शिखर धवनची दीडशतकी खेळी आणि करुण नायर व विजय शंकर यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या भारत

बंगळुरू : कर्णधार शिखर धवनची दीडशतकी खेळी आणि करुण नायर व विजय शंकर यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या भारत ‘अ’ संघाने सोमवारी दुसऱ्या दिवशी बांगलादेश ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात २ बाद ३६ अशी अवस्था केली. येथे खेळल्या जात असलेल्या तीनदिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात आज पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या दिवसअखेर भारत ‘अ’ संघाने वर्चस्व मिळवले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे जवळजवळ अडीच तासांचा खेळ वाया गेला असला तरी भारत ‘अ’ संघाने सामन्यावर पकड मजबूत करण्यात यश मिळवले आहे. धवनने रविवारी पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले होते. त्याने १५० धावांची खेळी केली, तर तमिळनाडूचा अष्टपैलू नायरने ७१ व विजय शंकरने ८६ धावांचे योगदान दिले. भारत ‘अ’ संघाने पहिला डाव ५ बाद ४११ धावसंख्येवर घोषित करीत पहिल्या डावात १८३ धावांची दमदार आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेश ‘अ’ संघाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद ३६ धावांची मजल मारली होती. डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप १४७ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी कर्णधार मोमिनुल हक (९) अणि यष्टिरक्षक फलंदाज लिट्टन दास (७) खेळपट्टीवर होते. त्याआधी, कालच्या वैयक्तिक ११६ धावसंख्येवरून पुढे खेळताना धवनने काही चांगले फटके लगावले. वैयक्तिक १५० धावा फटकावल्यानंतर सकलेन साजिबच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो पायचित झाला. धवनने १४६ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व ३ षटकार लगावले. धवन बाद झाल्यानंतर श्रेयांश अय्यरही (३८) झटपट बाद झाला. त्यानंतर नायर व विजय शंकर यांनी चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. नमन ओझाने (नाबाद २५) शंकरच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर असतानाच पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. पुन्हा खेळ प्रारंभ झाल्यानंतर भारत ‘अ’ संघाने लवकरच डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशतर्फे लेगस्पिनर जुबेर हुसेनने दोन बळी घेतले. त्याने नायर व शंकर यांना तंबूचा मार्ग दाखवला. बांगलादेश ‘अ’ संघाची दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. ईश्वर पांडेने (४ धावांत १ बळी) तिसऱ्या षटकात अनामुल हक (०) याला माघारी परतवले. सौम्या सरकारला (१९) जयंत यादवने बाद केले. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळपूर्वीच थांबविण्यात आला. (वृत्तसंस्था)----संक्षिप्त धावफलक : बांगलादेश अ पहिला डाव : ५२.४ षटकात सर्व बाद २२८; दुसरा डाव : ११ षटकांत २ बाद ३६. भारत पहिला डाव : ८६.१ षटकांत ५ बाद ४११ घोषित : शिखर धवन १५०, अभिनव मुकुंद ३४, श्रेयांश अय्यर ३८, करुण नायर ७१, विजय शंकर ८६, नमन ओझा नाबाद २५, जुबेर हुसेन २/७६).