शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

धवन, रोहित, रैनाची बॅट आता तरी चालणार ?

By admin | Updated: March 30, 2016 12:45 IST

धोनीला विजयी संघ कायम ठेवून खेळायला आवडत असले तरी, त्या संघातील काही खेळाडूंना वारंवार संधी देऊनही ते निष्प्रभ ठरत असतील तर संघामध्ये बदल करायला नको ?.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३०  -  विजयानंतर प्रश्न निर्माण होत नसतात, प्रश्न निर्माण होतात ते पराभवानंतर. सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ जिंकत असल्यामुळे धोनीची संघनिवड आणि रणनितीवर अजूनही कडाडून टीका झालेली नाही. धोनीला विजयी संघ कायम ठेवून खेळायला आवडत असले तरी, त्या संघातील काही खेळाडूंना वारंवार संधी देऊनही ते निष्प्रभ ठरत असतील तर संघामध्ये बदल करायला नको ?. 
 
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयात सांघिक योगदानापेक्षा विराट कोहलीचे योगदान सर्वाधिक आहे. या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून  रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना सातत्याने अपयशी ठरत आहेत. या तिघांना एकाही सामन्यात मोठी आणि विजयाची पायाभरणी करणारी खेळी करता आलेली नाही. 
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतका अनुभव गाठीशी असणा-या रोहित शर्माकडून भरपूर अपेक्षा आहेत. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याने आपली विकेट फेकल्याचे दिसले आहे. रोहितने वर्ल्डकपच्या चार सामन्यांमध्ये फक्त ४५ धावा केल्या आहेत. विराट आणि शिखरने एकाही सामन्यात दणदणीत सलामी दिलेली नाही. शिखरने वर्ल्डकपमध्ये फक्त ४३ तर, रैनाने ४१ धावा केल्या आहेत. हे तिघे झटपट बाद होत असल्यामुळे मधल्याफळीतील फलंदाजांवर दबाव वाढत आहे. 
 
विजयी संघ न बदलण्याच्या धोनीच्या  ह्ट्टामुळे एखादा दिवस खराब असेल तर, संघ अडचणीत सापडू शकतो. सुरेश रैनाच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी द्यावी असे क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे. धोनीकडे युवराज सारखा चांगला फिरकी गोलंदाज असूनही त्याने त्याचा वापर केला नव्हता. 
 
अखेर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात संधी मिळताच युवराजने आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात कर्णधार स्टीव्हन स्मिथलाच तंबूची वाट दाखवली होती.