शहरं
Join us  
Trending Stories
1
दीड वर्षांचं प्लॅनिंग... 117 ड्रोनचा वापर! युक्रेनने रशियाची 41 लढाऊ विमानं, 5 एअरबेस केले उद्ध्वस्त; कसा ठरला प्लॅन? झेलेन्स्की यांनी सांगितलं
2
नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाउन सुरू; नामकरणाचे काय? कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार
3
पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी
4
नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला, २ किलो सोनं आणि रोकड घेऊन लंपास
5
तुर्कस्तानला झटक्यावर झटका.., पाकिस्तानची साथ पडतेय भारी; आता Air India नं घेतला मोठा निर्णय 
6
राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी"
7
'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल
8
ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्मवरून घसरला, RPF कॉन्स्टेबलने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण
9
Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स २३७ अंकांनी आपटला, आयटी-मेटल स्टॉक्समध्ये विक्री
10
ठाण्यात हिऱ्याच्या नावे बनावट खडे; १० काेटी ५० लाखांचा गंडा, एक हजार गुंतवणूकदारांची फसवणूक
11
मुक्काम पोस्ट, महामुंबई: नालेसफाईची पोलखोल! आता अधिकाऱ्यांचा पगारही ठेकेदारांनी द्यायचा का?
12
एकदा पैसे गुंतवा, आयुष्यभरासाठी ₹१,४२,५०० चं पेन्शन पक्कं; LIC ची ही स्कीम बहुतेकांना माहितच नाही
13
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर-बस यांचा भीषण अपघात; वाहनांचे नुकसान, एक ठार
14
नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!
15
युक्रेनची मोठी कारवाई, रशियावर केला एअर स्ट्राईक; उद्ध्वस्त केली ४१ लढाऊ विमाने
16
एका वर्षापूर्वी दुबईतून चोरी झालेले एअरपॉड्स थेट पोहोचले पाकिस्तानात! ट्रॅक करणारा तरुण म्हणाला... 
17
भारतासोबत पुन्हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान; दुसऱ्या देशात जाऊन काश्मीर प्रश्न उपस्थित केला अन्... 
18
"महिला बसल्या आहेत, लघवी करु नका"; तरुणाच्या विनंतीनंतर तिघांनी झाडल्या गोळ्या, जामखेडमधील प्रकार
19
आजचे राशीभविष्य : ०२ जून २०२५; कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, प्रगतीच्या संधी येतील
20
VIDEO: बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने घेतला पराभवाचा बदला; मॅग्नस कार्लसनने असा व्यक्त केला राग

धवन, रोहित, रैनाची बॅट आता तरी चालणार ?

By admin | Updated: March 30, 2016 12:45 IST

धोनीला विजयी संघ कायम ठेवून खेळायला आवडत असले तरी, त्या संघातील काही खेळाडूंना वारंवार संधी देऊनही ते निष्प्रभ ठरत असतील तर संघामध्ये बदल करायला नको ?.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३०  -  विजयानंतर प्रश्न निर्माण होत नसतात, प्रश्न निर्माण होतात ते पराभवानंतर. सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ जिंकत असल्यामुळे धोनीची संघनिवड आणि रणनितीवर अजूनही कडाडून टीका झालेली नाही. धोनीला विजयी संघ कायम ठेवून खेळायला आवडत असले तरी, त्या संघातील काही खेळाडूंना वारंवार संधी देऊनही ते निष्प्रभ ठरत असतील तर संघामध्ये बदल करायला नको ?. 
 
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयात सांघिक योगदानापेक्षा विराट कोहलीचे योगदान सर्वाधिक आहे. या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून  रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना सातत्याने अपयशी ठरत आहेत. या तिघांना एकाही सामन्यात मोठी आणि विजयाची पायाभरणी करणारी खेळी करता आलेली नाही. 
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतका अनुभव गाठीशी असणा-या रोहित शर्माकडून भरपूर अपेक्षा आहेत. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याने आपली विकेट फेकल्याचे दिसले आहे. रोहितने वर्ल्डकपच्या चार सामन्यांमध्ये फक्त ४५ धावा केल्या आहेत. विराट आणि शिखरने एकाही सामन्यात दणदणीत सलामी दिलेली नाही. शिखरने वर्ल्डकपमध्ये फक्त ४३ तर, रैनाने ४१ धावा केल्या आहेत. हे तिघे झटपट बाद होत असल्यामुळे मधल्याफळीतील फलंदाजांवर दबाव वाढत आहे. 
 
विजयी संघ न बदलण्याच्या धोनीच्या  ह्ट्टामुळे एखादा दिवस खराब असेल तर, संघ अडचणीत सापडू शकतो. सुरेश रैनाच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी द्यावी असे क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे. धोनीकडे युवराज सारखा चांगला फिरकी गोलंदाज असूनही त्याने त्याचा वापर केला नव्हता. 
 
अखेर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात संधी मिळताच युवराजने आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात कर्णधार स्टीव्हन स्मिथलाच तंबूची वाट दाखवली होती.