शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धवन, रोहित, रैनाची बॅट आता तरी चालणार ?

By admin | Updated: March 30, 2016 12:45 IST

धोनीला विजयी संघ कायम ठेवून खेळायला आवडत असले तरी, त्या संघातील काही खेळाडूंना वारंवार संधी देऊनही ते निष्प्रभ ठरत असतील तर संघामध्ये बदल करायला नको ?.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३०  -  विजयानंतर प्रश्न निर्माण होत नसतात, प्रश्न निर्माण होतात ते पराभवानंतर. सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ जिंकत असल्यामुळे धोनीची संघनिवड आणि रणनितीवर अजूनही कडाडून टीका झालेली नाही. धोनीला विजयी संघ कायम ठेवून खेळायला आवडत असले तरी, त्या संघातील काही खेळाडूंना वारंवार संधी देऊनही ते निष्प्रभ ठरत असतील तर संघामध्ये बदल करायला नको ?. 
 
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयात सांघिक योगदानापेक्षा विराट कोहलीचे योगदान सर्वाधिक आहे. या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून  रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना सातत्याने अपयशी ठरत आहेत. या तिघांना एकाही सामन्यात मोठी आणि विजयाची पायाभरणी करणारी खेळी करता आलेली नाही. 
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतका अनुभव गाठीशी असणा-या रोहित शर्माकडून भरपूर अपेक्षा आहेत. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याने आपली विकेट फेकल्याचे दिसले आहे. रोहितने वर्ल्डकपच्या चार सामन्यांमध्ये फक्त ४५ धावा केल्या आहेत. विराट आणि शिखरने एकाही सामन्यात दणदणीत सलामी दिलेली नाही. शिखरने वर्ल्डकपमध्ये फक्त ४३ तर, रैनाने ४१ धावा केल्या आहेत. हे तिघे झटपट बाद होत असल्यामुळे मधल्याफळीतील फलंदाजांवर दबाव वाढत आहे. 
 
विजयी संघ न बदलण्याच्या धोनीच्या  ह्ट्टामुळे एखादा दिवस खराब असेल तर, संघ अडचणीत सापडू शकतो. सुरेश रैनाच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी द्यावी असे क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे. धोनीकडे युवराज सारखा चांगला फिरकी गोलंदाज असूनही त्याने त्याचा वापर केला नव्हता. 
 
अखेर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात संधी मिळताच युवराजने आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात कर्णधार स्टीव्हन स्मिथलाच तंबूची वाट दाखवली होती.