शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

राखीव असूनही असुरक्षित वाटले नाही

By admin | Updated: July 16, 2017 02:03 IST

मार्च महिन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले तर जूनमध्ये १२ वा खेळाडू या नात्याने राखीव बाकावर बसलो. या दोन्ही भूमिका स्वीकारणे सोपी बाब नाही

नवी दिल्ली: मार्च महिन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले तर जूनमध्ये १२ वा खेळाडू या नात्याने राखीव बाकावर बसलो. या दोन्ही भूमिका स्वीकारणे सोपी बाब नाही. अजिंक्य रहाणे मात्र समर्पित खेळाडू आहे. त्याच्या मते ‘भारताचा टी-शर्ट घातल्यानंतर असुरक्षा आणि अहंकार दूरच ठेवावा लागतो.’धर्मशाळा येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीत रहाणे भारतीय संघाचा कर्णधार होता. भारताने ही कसोटी जिंकून मालिका देखील खिशात घातली होती.चॅम्पियन्स ट्रॉफीत रहाणेला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसल्याने १२ व्या खेळाडूच्या भूमिकेत वावरावे लागले. अजिंक्यने वेस्ट इंडिज दौऱ्यात पाच सामन्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ६७.२० च्या सरासरीने ३३६ धावा ठोकल्या. तो म्हणाला, ‘विंडीजविरुद्धची मालिका माझ्यासाठी विशेष होती. सातत्यपूर्ण कामगिरीसह धावा काढल्याचे समाधान आहे. फलंदाजीतील विविध पैलू पडताळण्याची संधी या निमित्ताने मिळाली.’ खेळात तांत्रिक बदल करण्याऐवजी मानसिकतेत बदल घडवून आणणे माझ्या मते मोठे काम असल्याचे रहाणेने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.विंडीजमध्ये खेळपट्ट्या फलंदाजीसाठी पूरक नसल्याने तेथे माझी प्रत्येक खेळी विशेष अशीच होती. पोर्ट आॅफ स्पेन आणि अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर तर अक्षरश: तारांबळ उडाल्याचे रहाणेने सांगितले. (वृत्तसंस्था)मी कसोटी संघाचा उपकर्णधार असेल तर याचा अर्थ असा नव्हे की वन डे त १२ वा खेळाडू राहू शकणार नाही. देशाचे प्रतिनिधित्व करताना तुम्हाला जे काम सोपविण्यात आले आहे ते पूर्ण करावे लागते. मी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान अनेक सामन्यात ड्रिंक्स घेऊन मैदानावर गेलो तेव्हा अहंकार मनाला शिवला देखील नाही. मी अहंकार जोपासणारा खेळाडू नाही.