शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

महाराष्ट्राची आकांक्षा; तर केरळचा साजन सर्वोत्कृष्ट खेळाडू

By admin | Updated: February 16, 2015 02:44 IST

१४ दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशातील ९ हजार खेळाडूंनी ४१२ विविध क्रीडाप्रकारांत १,३६३ पदकांसाठी एकमेकांविरुद्ध झुंज दिली

तिरुअनंतपुरम : महाराष्ट्राची जलपरी आकांक्षा व्होराला महिलांमध्ये; तर केरळचा जलतणपटू साजन प्रकाशला पुरुष गटात ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आले. १४ दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशातील ९ हजार खेळाडूंनी ४१२ विविध क्रीडाप्रकारांत १,३६३ पदकांसाठी एकमेकांविरुद्ध झुंज दिली. आकांशा महाराष्ट्रात परतल्यामुळे तिच्या वतीने पुरस्कार महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व पथकप्रमुख अ‍ॅड. धनंजय भोसले यांनी स्वीकारला. ला रांची येथे २०११ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. महाराष्ट्राला या स्पर्धेत ३० सुवर्ण, ४३ रौप्य व ५० कास्यपदके जिंकून चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शनिवारी सायंकाळी झालेल्या समारोपात सहभागी सर्व खेळाडूंनी एकत्रित संचलन केले. संचलनाचा पहिला मान यजमान केरळ संघाला मिळाला. चौदा दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पेटविण्यात आलेली क्रीडाज्योत विझविण्यात आली. समारोपाच्या घोषणेनंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ध्वज उतरवून पुढील स्पर्धा आयोजन करणाऱ्या गोवा राज्याच्या प्रतिनिधींकडे सोपविण्यात आला. कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, केरळचे राज्यपाल, निवृत्त न्यायाधीश पी. सदाशिवम, केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी, भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे पदधिकारी आणि केरळसह देशातील आजी-माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. (वृत्तसंस्था)