शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीची खेळपट्टीही नागपूरसारखीच : शास्त्री

By admin | Updated: November 30, 2015 00:57 IST

क्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठीची खेळपट्टीही मोहली व नागपूर येथील खेळपट्ट्यांप्रमाणे असेल

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठीची खेळपट्टीही मोहली व नागपूर येथील खेळपट्ट्यांप्रमाणे असेल, अशी आशा भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली. शास्त्री यांनी उभय संघांतील फलंदाजांवर टीका करताना फलंदाजांनी खेळपट्टीनुसार फलंदाजी केली नसल्याचे म्हटले आहे. शास्त्री यांनी सांगितले की, ‘खेळपट्टीमध्ये काहीच वाईट नव्हते. दिल्लीची खेळपट्टीही मोहाली व नागपूर येथील खेळपट्ट्यांप्रमाणे राहील, अशी आशा आहे. कसोटी क्रिकेटमध्येही फलंदाज वन-डेप्रमाणे फलंदाजी करीत आहेत. फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक वेळ घालविणे आवश्यक आहे. अमला व ड्यूप्लेसिस तिसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे फलंदाजी करीत होते ते बघितल्यानंतर खेळपट्टीमध्ये काहीच दोष नसल्याचे स्पष्ट झाले.’ शास्त्री पुढे म्हणाले, ‘माझ्या मते फलंदाजांनी खेळपट्टीचे स्वरूप ओळखत खेळ केला असता तर त्यांना ८०, ९० एवढेच नाही तर शतकही ठोकता आले असते.’दरम्यान, नागपूर कसोटी सामन्यात असमतोल उसळीमुळे खेळपट्टीबाबत चर्चा झाली, हे वक्तव्य मात्र त्यांनी फेटाळून लावले. नागपूरच्या खेळपट्टीवर असमतोल उसळी नव्हती. येथे सामन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चेंडू खाली राहण्यास सुरुवात झाली होती. तीन दिवसांमध्ये कसोटी सामने संपत असल्यामुळे शास्त्री यांना चिंता सतावत नाही. शास्त्री म्हणाले,’केवळ भारतातच नाही तर आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यादरम्यान अ‍ॅडिलेडमध्येही असेच बघायला मिळाले. तेथेही एकाच दिवशी बरेच फलंदाज बाद झाले. तीन दिवसांमध्ये सामना संपणे चुकीचे नाही.’भारत कधीच विदेशातील खेळपट्ट्यांवर आपली तुलना करीत नाही, या विराट व अश्विन यांच्या मताचे शास्त्री यांनी समर्थन केले. (वृत्तसंस्था)अश्विनमध्ये भेदकता येत आहे : अरुणनागपूर : भारतीय संघाचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची प्रशंसा केली. अरुण म्हणाले, ‘त्याची गोलंदाजी मालिकेगणिक सुधारत आहे. अश्विनच्या गोलंदाजीमध्ये विशेष बदल झालेला नाही, पण तो आपली क्षमता ओळखण्यात यशस्वी ठरत आहे. सामना जिंकण्यासाठी कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, याची त्याला कल्पना आलेली आहे. तो नेहमीच एक चांगला गोलंदाज ठरला आहे, पण सामन्यागणिक त्याचा दर्जा उंचावत आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. सध्याच्या कालावधीत अश्विन सर्वोत्तम आॅफ स्पिनरपैकी एक आहे.