शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दीपा मलिक यांच्या रौप्यपदकाने नगरमध्ये जल्लोष

By admin | Updated: September 14, 2016 05:08 IST

रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या दीपा मलिक यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या भिंगार येथील राहत्या घरी जल्लोष झाला.

सुदाम देशमुख/अनिल साठे , अहमदनगररिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या दीपा मलिक यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या भिंगार येथील राहत्या घरी जल्लोष झाला. सोशल मीडियावरूनही मलिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. मलिक यांच्या कामगिरीमुळे अहमदनगरचे नाव पुन्हा एकदा क्रीडाविश्वात झळकल्याने नगरमध्ये चैतन्य संचारले आहे.पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या मलिक या भारताच्या पहिल्या महिला ठरल्या असून, त्या अहमदनगरच्या रहिवासी असल्याचा आनंद नगरिकांना झाला आहे. दीपा मलिक यांचे वडील बिक्रमसिंह हे नगर येथील मिलिटरीमध्ये होते. निवृत्त झाल्यानंतर ते भिंगारला स्थायिक झाले. मलिक यांना बालपणापासूनच खेळाची आवड आहे. त्यांना हे पदक मिळाल्याचे समजताच नगर, छावणी मंडळ परिसरात एकच जल्लोष सुरू झाला. सासर व माहेरची मंडळी देशसेवेतदीपा यांचे वडील बालकिशन नागपाल व सासरे मे.जन. बी. एस. मलिक यांनी लष्करात देशसेवा केली आहे. अन्य नातेवाईक लष्करात मोठ्या हुद्द्यावर आहेत. सर्वांची प्रेरणा व दीपा यांची जिद्द, कोच बाबर यांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्या पदकापर्यंत पोहोचू शकल्या आहेत. सूनबाईने देशाच्या लौकिकास साजेसा खेळ केला आहे, याचा अभिमान वाटतो.- सत्या मलिक, दीपा मलिक यांच्या सासूअपंग खेळाडूंना प्रशिक्षण देताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. लष्करातील विविध स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. सौंदर्य स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अशी खेळाडू माझी शिष्या असल्याचा मोठा अभिमान आहे. रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्यपदक मिळवल्याने आनंद झाला आहे. भारतामध्ये दाखल झाल्यावर नगर शहरात मोठे जंगी स्वागत करून सत्कार करणार आहे. - रावसाहेब बाबर, प्रशिक्षक अपंगत्व तरीही जिद्द...मूळच्या राजस्थानच्या रहिवासी असलेल्या दीपा मलिक यांना शालेय जीवनात बास्केटबॉलची विशेष रुची होती. शालेय जीवनात सुरू झालेली पदकांची लयलूट अपंगत्व येऊनही तशीच सुरू ठेवत पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू म्हणून त्यांनी मान मिळविला आहे. अहमदनगर जवळील भिंगारमधील वैद्य कॉलनीमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. बाळंतपणात पाठीला आलेल्या ट्युमरच्या आजारात तीन वेळा शस्रक्रिया झाली. त्यात चुकीच्या औषधोपचारामुळे कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्या होत्या. याच दरम्यान त्यांचे पती कर्नल विक्रांत मलिक हे लष्करात होते. कारगिल युद्धात ते कर्तव्य करीत होते. दीपा यांची माहिती मिळताच युद्धानंतर वरिष्ठांनी त्यांना रजा मंजूर केली होती. मलिक यांचे खचलेले धैर्य पाहून त्यांनी नव्या उमेदीने सराव करण्यास प्रोत्साहन दिले. पत्नीला आलेले अपंगत्व व खेळाची आवड पाहून विक्रांत यांनी लष्कर सेवेचा राजीनामा दिला होता. २००५ साली त्यांनी गोळाफेक सरावाला सुरुवात केली होती. त्यांना प्रशिक्षक रावसाहेब बाबर यांचे मार्गदर्शन लाभले. भालाफेकमध्ये त्यांनी आशियाई स्पर्धेत कांस्य, तर विश्व चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती, तर भारत सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.